शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने भारताची भीती घेतली! पीओकेमधील हॉटेल्स अन् गेस्ट हाऊसमध्ये सैन्य; मदरसे बंद
2
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
3
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!
4
बजाज चेतकला एप्रिल फूल बनविले; टीव्हीएस पहिल्यांदाच नंबर १, विक्रीत ओला कुठे...
5
पाकिस्तानी हवाई क्षेत्र बंद; एअर इंडियाल 5000 कोटी रुपयांचा फटका बसण्याचा अंदाज...
6
दारूच्या व्यसनाने आई आणि चुलतीचा खून; बीड जिल्हा दोन हत्येच्या घटनांनी हादरला
7
पंकजा मुंडेंना कॉल अन् पाठवला अश्लील मेसेज, पुण्यातील तरुणाला पोलिसांनी केली अटक
8
CEOs चा १ तासाचा पगार सामान्य कर्मचाऱ्याच्या वर्षाच्या पगाराइतका, एका रिपोर्टमध्ये झाले अनेक आश्चर्यकारक खुलासे
9
अन्न पुन्हा गरम करणं आरोग्यासाठी ठरतंय घातक; 'या' ५ गोष्टी टाळाल तरच ठणठणीत राहाल
10
 संतापजनक! मासिक पाळीत स्वयंपाक करणं महिलेच्या जीवावर बेतलं,नणंद आणि सासूने खून केल्याचा आरोप, दोन मुलं अनाथ
11
नवी मुंबईत ठाकरे गटाला खिंडार! माजी नगरसेवकांचे उद्धवसेनेला जय महाराष्ट्र, शिंदेसेनेत प्रवेश
12
"मॅडम येत आहेत, त्यांना..."; पोलीस असल्याचं सांगून दुकानात घुसले अन् २ लाखांचे दागिने चोरले
13
ISI कडून मिळाले आदेश, बेताब खोऱ्यात लपवली शस्त्रे; NIA च्या अहवालात धक्कादायक खुलासा
14
संजय राऊतांनी PM मोदींच्या नेतृत्वक्षमतेवर घेतली शंका; म्हणाले, “शाह यांचा राजीनामा का घेत नाही”
15
काश्मीरात सर्च ऑपरेशन सुरूच, आतापर्यत ३००० जण ताब्यात; जंगलात लपलेत पहलगाम हल्ल्याचे दहशतवादी
16
चिनी कर्मचाऱ्यांना पगारही मिळत नाहीये, ट्रम्प टॅरिफमुळे कारखाने होताहेत बंद; कामगार उतरले रस्त्यावर
17
हॉटेलमधील 'तो' पदार्थ खाणं पडलं महागात! निक्की तांबोळीला ICU मध्ये केलं दाखल, आता कशी आहे अभिनेत्रीची तब्येत?
18
"हा, आम्ही दहशतवादी पोसले पण आता..."; संरक्षण मंत्र्यानंतर बिलावल भुट्टोनेही दिली कबुली
19
Nashik Hit and Run: भावासमोरच जयश्रीने सोडला जीव, नाशिकमध्ये पिकअपने तीन वाहनांना उडवले
20
Ganga Saptami 2025: गंगा सप्तमीला 'हे' उपाय केले असता घरात येईल सुख समृद्धी!

पालघरमध्ये समुद्राने केले रौद्र रूप धारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2019 22:27 IST

लाटा घरांवर आदळल्या, संसार वाचवण्यासाठी ग्रामस्थांनी पिशव्यांमध्ये भरली माती

पालघर : शनिवारी सकाळपासून समुद्राने रौद्ररूप धारण केल्याने मोठ्या लाटा किनाऱ्यावरील घरावर धडकत होत्या. आपली घरे वाचवण्यासाठी घरासमोर मोठ्या पिशव्यांमध्ये माती भरून आपले संसार वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.पालघर जिल्ह्याला ११० किलोमीटरचा किनारा लाभला असून किनारपट्टीची धूप थांबून घरांना संरक्षण मिळावे यासाठी ८ ते १० गावांना धूपप्रतिबंधक बंधारे मंजूर करण्यात आले होते.मात्र हरित लवादात दाखल एका याचिकेमुळे या बंधाऱ्यांना पर्यावरण विभागाचा ना हरकत दाखला मिळत नसल्याने या बंधाºयाच्या उभारणीचे काम ठप्प पडले आहे. त्याचा मोठा फटका किनारपट्टीवरील घरांना बसू लागला आहे. जिल्ह्यात रविवारी मुसळधार पाऊस आणि वादळी वारे वाहणार असल्याचा इशारा देण्यात आला होता.गुरु वारपासून समुद्रात तुफानी लाटा उसळत असल्याने किनारपट्टीवर राहणाºया अर्नाळा, वडराई, सातपाटी, नवापूर, उच्छेळी-दांडी आदी भागातील नागरिक भयभीत झाले होते. त्यातच शनिवारी दुपारी दोनच्या सुमारास समुद्राला मोठी भरती येऊन ५.८८ मीटर उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली होती.त्यामुळे आपल्या घरांच्या संरक्षणासाठी मिळेल त्या साहित्याचा आडोसा निर्माण करण्याचे काम अनेक गावांत सुरू होते.मागच्या वर्षी भरतीने सातपाटी गावात पाणी शिरून येथील सुमारे ३०० घरातील जीवनावश्यक वस्तूंसह फर्निचर आदी वस्तूंचे मोठे नुकसान झाले होते.त्यामुळे जिल्हाधिकाºयांनी विशेष बाब म्हणून सातपाटी येथे धूपप्रतिबंधक बंधारा बांधणे अत्यावश्यक असल्याचे म्हणणे न्यायालयात मांडले होते.न्यायालयाने सातपाटी येथे बंधारा बांधण्यास परवानगी दिल्या नंतर ११०० मीटरपैकी ५०० मीटर बंधाºयाच्या कामास सरकारी पातळीवरून परवानगी मिळाली होती. त्याचे काम दांडापाडा बाजूने सुरु वात होऊन क्रांती मंडळापर्यंत संपल्याने या भागातील घरे वाचली असली तरी तकदीर मंडळ,विशाल मंडळ,भाटपाडा आदी भागातील घरात मात्र पाणी शिरून नुकसान झाले. समुद्राला आलेल्या उधाणाचे गावात शिरलेल्या पाण्यासोबतच मुसळधार पाऊस ही कोसळत असल्याने एकाचवेळी मोठ्या प्रमाणात पाणी साचून ते लोकांच्या घरात शिरले.