शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
2
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
3
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
4
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
5
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
6
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
7
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
8
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
9
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
10
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
11
कुटुंबासोबतचे संबंधच तोडले, लालू प्रसाद यादवांच्या मुलीने आरोप केलेले रझीम कोण, राजदमध्ये काय घडलं?
12
अल फलाह युनिव्हर्सिटीवर क्राईम ब्रांचचा बडगा, UGC च्या तक्रारीवरून २ FIR दाखल
13
"अल्लाह करे भारत..."; नौगाम ब्लास्टवर फारूक अब्दुल्ला यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
14
Rohini Acharya: "मी राजकारण सोडतेय आणि कुटुंबासोबतचे संबंधही तोडत आहे", लालू प्रसाद यादवांच्या मुलीच्या पोस्टने खळबळ
15
अखेर 'या' तारखेपासून नवी मुंबई विमानतळावरुन विमाने झेपावणार! पहिल्या टप्प्यात 10 शहरांसाठी सेवा सुरू होणार
16
IPL 2026 Retain and Released Player Full List : KKR नं महागड्या खेळाडूला दिल्ला धक्का; कुणी कुणावर ठेवला भरवसा?
17
बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार? जेडीयू म्हणतोय नीतीशच राहणार, भाजप म्हणतोय आमदार ठरवणार!
18
चीन-पाकिस्तानशी 'इलेक्ट्रोमॅग्नेटिक युद्ध'?; मुंबईनजीक GPS साठी भारताकडून NOTAM जारी, अर्थ काय?
19
Viral Video : एका दिवसात किती कमाई करतो मोमो विक्रेता? आकडा ऐकून हैराण व्हाल!
20
वीज बिल न भरल्याने कनेक्शन तोडले; रागात तरुणाने अख्ख्या शहराची लाईट बंद केली, वीज कर्मचाऱ्यांना रात्रभर कामाला लावलं
Daily Top 2Weekly Top 5

पालघरमध्ये समुद्राने केले रौद्र रूप धारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2019 22:27 IST

लाटा घरांवर आदळल्या, संसार वाचवण्यासाठी ग्रामस्थांनी पिशव्यांमध्ये भरली माती

पालघर : शनिवारी सकाळपासून समुद्राने रौद्ररूप धारण केल्याने मोठ्या लाटा किनाऱ्यावरील घरावर धडकत होत्या. आपली घरे वाचवण्यासाठी घरासमोर मोठ्या पिशव्यांमध्ये माती भरून आपले संसार वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.पालघर जिल्ह्याला ११० किलोमीटरचा किनारा लाभला असून किनारपट्टीची धूप थांबून घरांना संरक्षण मिळावे यासाठी ८ ते १० गावांना धूपप्रतिबंधक बंधारे मंजूर करण्यात आले होते.मात्र हरित लवादात दाखल एका याचिकेमुळे या बंधाऱ्यांना पर्यावरण विभागाचा ना हरकत दाखला मिळत नसल्याने या बंधाºयाच्या उभारणीचे काम ठप्प पडले आहे. त्याचा मोठा फटका किनारपट्टीवरील घरांना बसू लागला आहे. जिल्ह्यात रविवारी मुसळधार पाऊस आणि वादळी वारे वाहणार असल्याचा इशारा देण्यात आला होता.गुरु वारपासून समुद्रात तुफानी लाटा उसळत असल्याने किनारपट्टीवर राहणाºया अर्नाळा, वडराई, सातपाटी, नवापूर, उच्छेळी-दांडी आदी भागातील नागरिक भयभीत झाले होते. त्यातच शनिवारी दुपारी दोनच्या सुमारास समुद्राला मोठी भरती येऊन ५.८८ मीटर उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली होती.त्यामुळे आपल्या घरांच्या संरक्षणासाठी मिळेल त्या साहित्याचा आडोसा निर्माण करण्याचे काम अनेक गावांत सुरू होते.मागच्या वर्षी भरतीने सातपाटी गावात पाणी शिरून येथील सुमारे ३०० घरातील जीवनावश्यक वस्तूंसह फर्निचर आदी वस्तूंचे मोठे नुकसान झाले होते.त्यामुळे जिल्हाधिकाºयांनी विशेष बाब म्हणून सातपाटी येथे धूपप्रतिबंधक बंधारा बांधणे अत्यावश्यक असल्याचे म्हणणे न्यायालयात मांडले होते.न्यायालयाने सातपाटी येथे बंधारा बांधण्यास परवानगी दिल्या नंतर ११०० मीटरपैकी ५०० मीटर बंधाºयाच्या कामास सरकारी पातळीवरून परवानगी मिळाली होती. त्याचे काम दांडापाडा बाजूने सुरु वात होऊन क्रांती मंडळापर्यंत संपल्याने या भागातील घरे वाचली असली तरी तकदीर मंडळ,विशाल मंडळ,भाटपाडा आदी भागातील घरात मात्र पाणी शिरून नुकसान झाले. समुद्राला आलेल्या उधाणाचे गावात शिरलेल्या पाण्यासोबतच मुसळधार पाऊस ही कोसळत असल्याने एकाचवेळी मोठ्या प्रमाणात पाणी साचून ते लोकांच्या घरात शिरले.