शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

पालघर पोलिसांना गुन्हे उकलण्यात अपयश! मात्र २०१८ च्या तुलनेत २०१९ मध्ये गुन्हे रोखण्यात यश

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2020 00:27 IST

पालघर पोलिसांनी २०१८ सालच्या वाढत्या गुन्हेगारीच्या आकड्यांकडे जातीने लक्ष घालून २०१९ वर्षामध्ये वाढत्या गुन्हेगारीवर अंकुश लावण्यात यश मिळवले आहे

- मंगेश कराळेनालासोपारा : पालघरपोलिसांनी २०१८ सालच्या वाढत्या गुन्हेगारीच्या आकड्यांकडे जातीने लक्ष घालून २०१९ वर्षामध्ये वाढत्या गुन्हेगारीवर अंकुश लावण्यात यश मिळवले आहे, मात्र दाखल झालेल्या गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना अपयश आलेले आहे.एकीकडे पोलीस गुटखा, दारू, रेती, ड्रग्स माफिया यांच्यावर वचक ठेवत असले तरी जबरी चोरी, चेन स्नॅचिंग, दिवसा व रात्री होणाऱ्या घरफोड्या, दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या होणा-या चो-या, बलात्कार, विनयभंग, अपहरण व अपघात अशा गंभीर गुन्ह्यांच्या आकड्यांत मात्र वाढ होत आहे. २०१८ साली गुन्ह्यात वाढ झाली होती, पण उकलही चांगली झाली होती, तर २०१९ साली गुन्ह्यांत घट झाली, पण दाखल गुन्ह्यांची उकल फारशी समाधानकारक झालेली नाही.पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्याच्या अंतर्गत असलेले तुळिंज, अर्नाळा, विरार, माणिकपूर आणि वालीव या पोलीस ठाण्यांमध्ये जबरी चोरी, चेन स्नॅचिंग, दिवसा व रात्री होणा-या घरफोड्या, दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या होणा-या चो-या, बलात्कार, विनयभंग, अपहरण अशा गंभीर गुन्ह्यांची जास्त नोंद झाली आहे. संपूर्ण जिल्ह्यात २३ पोलीस ठाणी आहेत.वसई, विरार, पालघर आणि बोईसरमध्ये लोंढेचे लोंढे दररोज येत असल्याने जनसंख्या झपाट्याने या भागातील वस्ती वाढत आहे. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी पोलिसांची कुमक वाढवण्यात आली आहे. अन्य राज्यांच्या पोलीस यंत्रणा ज्या मोस्ट वाँटेड गुन्हेगारांचा शोध घेत आहेत, त्यातील अनेक गुन्हेगार पालघर जिल्ह्याच्या नालासोपारा, वसई, विरार या परिसरात बिनधास्त आश्रय घेताना आढळून येत आहेत. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सराईत गुन्हेगारांना किंवा मोस्ट वाँटेड गुन्हेगारांना लपण्यासाठी नालासोपारा शहरात स्वस्तात घरे भाड्याने उपलब्ध होत असल्याने हे शहर या गुन्हेगारांसाठी सगळ्यात सुरक्षित असल्याचे बोलले जात आहे.गेल्या काही वर्षांपासून नालासोपारा शहराचे नाव गुन्हेगारी, दहशतवादी, आतंकवादी घडामोडी, नकली नोटा, बांग्लादेशी यांच्याशी जोडले गेलेले आहे. या ना त्या घटनांमुळे नालासोपारा शहराचे नाव नेहमीच चर्चेत राहिले आहे. गुन्हेगारांचे माहेरघर म्हणजे नालासोपारा शहर अशी जणू आता नालासोपारा शहराची ओळखचनिर्माण झाली आहे.तीन हजार गाड्यांचा अद्याप शोध नाही२०१४ ते २०१९ या पाच वर्षाच्या कालावधीत पालघर जिल्ह्यातील २३ पोलीस ठाण्यांअंतर्गत हजारो वाहने चोरीला गेलेली आहेत. या चोरीला गेलेल्या दुचाकी आणि चारचाकी वाहनांपैकी ३००० वाहनांचा शोध लावण्यात पोलीस अपयशी ठरले आहेत.

टॅग्स :Policeपोलिसpalgharपालघर