शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
निवडणूक आयोगाने आधारहीन म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, स्पष्टीकरणासह त्या दाव्यातील हवाच काढली
3
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
4
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
5
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
6
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
7
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
8
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
9
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
10
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
11
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
12
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
13
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस
14
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
15
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
16
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
17
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!
18
VIDEO: पाकिस्तानी खेळाडूने अंपायरच्या डोक्याला मारला चेंडू, अक्रमने केली 'घाणेरडी' कमेंट
19
मंदीच्या खाईत जाणाऱ्या अमेरिकन अर्थव्यवस्थेला वाचवण्यासाठी फेडचा मोठा डाव! भारतावर होणार थेट परिणाम
20
'डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष, जगाचे सम्राट नाहीत, त्यांच्या चुकांची किंमत...'; ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी सुनावले

पालघर पोलिसांना गुन्हे उकलण्यात अपयश! मात्र २०१८ च्या तुलनेत २०१९ मध्ये गुन्हे रोखण्यात यश

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2020 00:27 IST

पालघर पोलिसांनी २०१८ सालच्या वाढत्या गुन्हेगारीच्या आकड्यांकडे जातीने लक्ष घालून २०१९ वर्षामध्ये वाढत्या गुन्हेगारीवर अंकुश लावण्यात यश मिळवले आहे

- मंगेश कराळेनालासोपारा : पालघरपोलिसांनी २०१८ सालच्या वाढत्या गुन्हेगारीच्या आकड्यांकडे जातीने लक्ष घालून २०१९ वर्षामध्ये वाढत्या गुन्हेगारीवर अंकुश लावण्यात यश मिळवले आहे, मात्र दाखल झालेल्या गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना अपयश आलेले आहे.एकीकडे पोलीस गुटखा, दारू, रेती, ड्रग्स माफिया यांच्यावर वचक ठेवत असले तरी जबरी चोरी, चेन स्नॅचिंग, दिवसा व रात्री होणाऱ्या घरफोड्या, दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या होणा-या चो-या, बलात्कार, विनयभंग, अपहरण व अपघात अशा गंभीर गुन्ह्यांच्या आकड्यांत मात्र वाढ होत आहे. २०१८ साली गुन्ह्यात वाढ झाली होती, पण उकलही चांगली झाली होती, तर २०१९ साली गुन्ह्यांत घट झाली, पण दाखल गुन्ह्यांची उकल फारशी समाधानकारक झालेली नाही.पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्याच्या अंतर्गत असलेले तुळिंज, अर्नाळा, विरार, माणिकपूर आणि वालीव या पोलीस ठाण्यांमध्ये जबरी चोरी, चेन स्नॅचिंग, दिवसा व रात्री होणा-या घरफोड्या, दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या होणा-या चो-या, बलात्कार, विनयभंग, अपहरण अशा गंभीर गुन्ह्यांची जास्त नोंद झाली आहे. संपूर्ण जिल्ह्यात २३ पोलीस ठाणी आहेत.वसई, विरार, पालघर आणि बोईसरमध्ये लोंढेचे लोंढे दररोज येत असल्याने जनसंख्या झपाट्याने या भागातील वस्ती वाढत आहे. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी पोलिसांची कुमक वाढवण्यात आली आहे. अन्य राज्यांच्या पोलीस यंत्रणा ज्या मोस्ट वाँटेड गुन्हेगारांचा शोध घेत आहेत, त्यातील अनेक गुन्हेगार पालघर जिल्ह्याच्या नालासोपारा, वसई, विरार या परिसरात बिनधास्त आश्रय घेताना आढळून येत आहेत. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सराईत गुन्हेगारांना किंवा मोस्ट वाँटेड गुन्हेगारांना लपण्यासाठी नालासोपारा शहरात स्वस्तात घरे भाड्याने उपलब्ध होत असल्याने हे शहर या गुन्हेगारांसाठी सगळ्यात सुरक्षित असल्याचे बोलले जात आहे.गेल्या काही वर्षांपासून नालासोपारा शहराचे नाव गुन्हेगारी, दहशतवादी, आतंकवादी घडामोडी, नकली नोटा, बांग्लादेशी यांच्याशी जोडले गेलेले आहे. या ना त्या घटनांमुळे नालासोपारा शहराचे नाव नेहमीच चर्चेत राहिले आहे. गुन्हेगारांचे माहेरघर म्हणजे नालासोपारा शहर अशी जणू आता नालासोपारा शहराची ओळखचनिर्माण झाली आहे.तीन हजार गाड्यांचा अद्याप शोध नाही२०१४ ते २०१९ या पाच वर्षाच्या कालावधीत पालघर जिल्ह्यातील २३ पोलीस ठाण्यांअंतर्गत हजारो वाहने चोरीला गेलेली आहेत. या चोरीला गेलेल्या दुचाकी आणि चारचाकी वाहनांपैकी ३००० वाहनांचा शोध लावण्यात पोलीस अपयशी ठरले आहेत.

टॅग्स :Policeपोलिसpalgharपालघर