शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

पालघर ठरतो आहे, मादक द्रव्यांचे ‘जंक्शन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 00:18 IST

तलासरीत ४० कोटीचे उच्च प्रतीचे अफगाणी हेरॉईन पकडल्याने पोलिसांची ही कौतुकास्पद कामिगरी पाहता पालघर हा ‘मादक द्रव्य विरिहत जिल्हा’ करण्याचा विश्वास जिल्हा पोलिस अधीक्षक व्यक्त करीत

हितेन नाईक पालघर: तलासरीत ४० कोटीचे उच्च प्रतीचे अफगाणी हेरॉईन पकडल्याने पोलिसांची ही कौतुकास्पद कामिगरी पाहता पालघर हा ‘मादक द्रव्य विरिहत जिल्हा’ करण्याचा विश्वास जिल्हा पोलिस अधीक्षक व्यक्त करीत असले तरी जिल्ह्यात मागील तीन वर्षात ८०४.१३६ किलोग्राम वजनाचे एमडी, हेरॉईन सारखे मादक द्रव्याचे साठे पकडण्यात आले आहेत. त्यामुळे यामागील तस्करी टोळ्यांची पाळे-मुळे खणून काढण्याचे आव्हान पालघर पोलीस अधीक्षक मंजुनाथ सिंगे यांना पेलावे लागणार आहे.भारतात एनडीपीएस अर्थात नार्कोटिक्स ड्रग्ज अँड सायकोट्रोफिक सबस्टन्स अ‍ॅक्ट १९८५ साली अंमलात आला. त्यानुसार अमली पदार्थांचे सेवन करणे, ते बाळगणे, त्याची विक्री, वाहतूक, उत्पादन करणे ह्यास मनाई करण्यात आली असून त्याचा भंग केल्यास कठोर शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. तरीही या अनैतिक व्यवसायातून मिळणारा रग्गड पैसा कमविण्याच्या लालसेपोटी अमली पदार्थाचा पुरवठा, विक्री व त्याच्या सेवनाचा आलेख पालघर जिल्ह्यात वाढतच चालला असून त्यात वसई तालुका आघाडीवर आहे. तर दुसरीकडे आरडीएक्स सारख्या स्फोटकांचा साठा ही सापडून आल्याने दहशतवादी कारवाया करणाºयांना आता पालघर जिल्हा सोयीचा वाटू लागला की काय? अशी शंका व्यक्त केली जात आहे. महत्वाचे म्हणजे मुंबई-अहमदाबाद महामार्गा लगत लपवून ठेवलेल्या स्फोटकांचा सुगावा स्थानिक पोलिसांना लागला नसल्याने त्यांच्या कार्यक्षमतेवर उभे राहिलेले प्रश्नचिन्ह पोलिसांना आपल्या कामगिरीत वाढ करून पुसावे लागणार आहे.मुंबई-अहमदाबाद महामार्गा लगतच्या आदिवासींच्या मागील काही वर्षात खरेदी करण्यात आलेल्या जमिनी व त्या जमिनीवर उभारण्यात आलेली बेकायदेशीर गुदामे, दुकाने आणि पडीक इमारतीचा वापर आरडीएक्स सारखी स्फोटके आणि अमली पदार्थ बनविण्यासाठी होत आहे. काही जागा, कारखाने भाड्याने घेऊन अमली पदार्थ बनविण्याचे कारखाने वसई, पालघर, बोईसर मध्ये उघडण्यात आले असून पालघर मधील रौफ मजीद लुलानिया सारखा स्थानिक सुशिक्षित तरु ण अल्प काळात पैसे कमवून श्रीमंत होण्याच्या हव्यासापोटी या व्यवहारात सक्रिय झाला होता. पालघर औद्योगिक वसाहती मधील एका भाड्याने घेतलेल्या कारखान्यात मादक द्रव्य बनविले जात असल्याच्या माहिती वरून रेव्हेन्यू इंटेलिजन्स मुंबई झोनच्या अधिकाºयांनी १९ मार्च रोजी धाड घालून २३८.२० किलो मेफॅड्रीन ड्रग जप्त केले होते. या प्रकरणात भानुदास मोरे उर्फ भावेश पटेल ( रा.विरार) व रौफ लुलानीय (पालघर) या प्रमुख आरोपींना आणि त्यांच्या कडून हा माल खरेदी करणाºया वझुल चौधरी उर्फ पप्पू चौधरी, मनीष रावल यांना अटक करण्यात आली होती. भानुदास मोरे यांच्या विरारच्या फ्लॅट मधून ८.१२६ किलो हशिश ही जप्त करण्यात आले. तर रौफ लूलानिया रहात असलेल्या भागातील एका चिकनच्या दुकानातील फ्रीजमध्ये मेफॅड्रीन ड्रग लपवून ठेवल्याचे ही पोलीस तपासात निष्पन्न झाल्याने त्याची जवळीक असलेल्या व कधीकाळी एका राजकीय पक्षाच्या वाहतूक शाखेचा पदाधिकारी असलेल्या व्यक्तीच्या माध्यमातून हे ड्रग्ज इतरत्र वितरित किंवा हलविले जात होते का? याचाही शोध मुंबई व पालघर पोलिसानी घेतल्यास अनेक गुपिते बाहेर येण्याची शक्यता आहे.जिल्हा निर्मिती नंतर १३ डिसेंबर २०१४ रोजी एनडीपीएस अ‍ॅक्ट खाली नालासोपारा पोलीस स्टेशन अंतर्गत पहिला गुन्हा दाखल करण्यात आला असून सीमांग फर्नांडिस या २७ वर्षीय तरु णास या गुन्ह्यात अटक करण्यात आली होती.त्या नंतर जिल्ह्यातील वसई तालुक्यातील नालासोपारा, तुळींज, वालीव, वसई तर पालघर, डहाणू तालुक्यातील पोलीस स्टेशन अंतर्गत गांजा ह्या मादक द्रव्याची विक्री मोठ्या प्रमाणातून होत असल्याचे पकडलेल्या आरोपीच्या माहिती वरून दिसून आले होते. आता पर्यंत ३४ गुन्ह्याद्वारे ६३ आरोपींना अटक करण्यात आली असून १०८.८५२ किलो गांजा, २१.७००किलो इफेड्रीन, २४ किलो ब्राऊन शुगर, ५.२५० किलो हेरॉईन, २४.६९० ग्रॅम आयसोसॅफरॉल, ९१ किलो केटामाईन, ५५३.३०४ किलो मॅथ्याक्यूलीन असा एकूण ८०४.१३६ किलो मादकद्रव्याचा साठा जप्त करण्यात आला असून त्याची किंमत सुमारे ४३ कोटी १८ लाख ४९ हजार ९१० रुपये आहे. हा आकडा जिल्हा पोलिसांनी केलेल्या कारवाईत मिळाला असला तरी एटीएस आणि रेव्हेन्यू इंटेलिजन्स मुंबई झोनच्या टीम ने जप्त केलेल्या मादक द्रव्याच्या साठ्याची आकडेवारी यापेक्षा मोठी आहे.या सर्व जप्त केलेल्या मालाची आंतरराष्ट्रीय बाजार पेठेतील मूळ किंमत धरल्यास ती पाच पटीने वाढू शकते. गुजरात राज्यातील दहशतवादी कारवाया विरोधी पथकाने (एटीएस टीमने) वाड्यातील (खानिवडे) एका फार्म हाऊसवर धाड घालून ५५३.३०४ किलो मॅथॉक्यूलोन(एमडी) हे अमली पदार्थ जप्त करून विवेक कुबल, लॉरेन्स सिर्वेल, कालिकाप्रसाद मल्हार, सचिन वर्तक, मोबिन शेख या आरोपींना अटक केली. या बाबत वाडा पोलीस मात्र अनिभज्ञ असल्याने जिल्ह्यातील पोलिसांनी आपल्या खबºयांचे विणलेले जाळे कमकुवत असल्याचे सिद्ध झाले होते. या प्रकरणातील अन्य चार आरोपी अजूनही फरार असून त्यांची लिंक आफ्रिकेच्या सीमेपर्यंत पोहचली असून या मादक द्रव्याची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील किंमत सुमारे २ हजार ४७५ कोटी इतकी असल्याचे कळते. त्या नंतर मुंबई-अहमदाबाद महामार्गा वरील सातीवली जवळ रस्त्याच्या कडेला असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या एका पडीक इमारतीमध्ये अतिरेकी कारवाईत वापरात येणारी व अत्यंत संहारक असलेली आरडीएक्स सारखी स्फोटके मुंबईच्या एटीएस टीमने ताब्यात घेतली. याचीही भनक स्थानिक पोलिसांना खूप उशिराने लागल्याने ह्या कारवाई पासून तत्कालीन पोलीस अधीक्षकांनाही चार हात दूर ठेवण्यात आले होते. त्यामुळे पुन्हा एकदा पालघर पोलीस यंत्रणा किती गाफील रहात आहे हे समोर आले होते.या एकापाठोपाठ घडणार्या घटने नंतर जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा खडबडून जागी होऊन मादक द्रव्याची निर्मिती, वाहतूक, विक्री करणाºया टोळ्यावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले होते. मात्र गांजा विक्र ीच्या गुन्ह्या व्यतिरिक्त इतर महत्वपूर्ण घबाड हाती लागत नसल्याने पोलीस अधीक्षक कार्यालय अस्वस्थ होते.परंतु माणिकपूर पोलिसांनी एफेड्रीन, हेरॉईन, आयसोसॅफरॉल, हशिश व तर उच्च प्रतीच्या केटामाईन सारख्या मादकद्रव्याची विक्री करावयास आलेल्या सर्फराज मेमन, सोहेल मेमन व नायजेरियन नागरिक असलेल्या ऊछेना उकपाबी या आरोपींना २५ सप्टेंबर रोजी अटक करून पहिली मोठी यशस्वी कारवाई करण्यात यश मिळविले होते. स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि. प्रशांत लांगी यांच्या टीमने वरील आरोपी कडून काढलेल्या महत्वपूर्ण माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोनि.अशोक होनमाने यांच्या टीमने तलासरी जवळील दापचरी दुग्ध प्रकल्पाच्या कृषिक्षेत्रातील भाडेतत्वावरील जागेत छापा घालून ५.२०० किलो अफगाणी हेरॉईन व २४.६९० किलो एमडीएम, एक फॉरच्युनर असा सुमारे ४० कोटींचा मुद्देमाल जप्त केला होता. या प्रकरणातील तीन आरोपी पळून गेले होते.त्यामुळे पोलीस अधीक्षक मंजुनाथ सिंगे ह्यांनी तलासरीत उगारलेला कारवाईचा बडगा या पुढेही त्यांना उगारावा लागणार असून आपल्याच विभागातील मादक द्रव्याच्या व्यवहाराला छुपा पाठिंबा देणार्याना शोधून त्यांच्यावर कडक कारवाईचा बडगा उगारावा लागणार आहे. त्यामुळे जिल्ह्याला मादक द्रव्याचे हब बनवित तरु ण पिढी उध्वस्त करणारा हा व्यवसाय वेळीच ठेचायचे काम आता पोलिस अधीक्षक सिंगे व त्यांच्या टीम ला करावे लागणार आहे.दुग्ध प्रकल्पाच्या विस्तीर्ण क्षेत्रात मागील ४-५ वर्षा पासून मादक द्रव्याचा व्यवसाय केला जात असल्याची माहिती स्थानिक पोलिसांना देत होते. मात्र पोलिसांच्या हेतुपुरस्कार दुर्लक्षाला काही लोकप्रतिनिधीची असणारी साथ ह्यामुळे त्यांच्यावर कारवाई होत नव्हती. तर दुसरीकडे वसईतील अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखेतील एका पोलीस उपनिरीक्षकांनी अमली पदार्थाच्या पसरणाºया जाळ्या विरोधात आपले वरिष्ठ कारवाई करीत नसल्याने वरिष्ठां कडे तक्र ार केली होती.त्यानंतर या प्रकरणातील दोषींवर कारवाई होण्याऐवजी त्याचीच उचलबांगडी करण्यात आली आहे. त्यामुळे वसई तालुक्यासह पालघर, डहाणू तालुक्यातील अनेक गावांत मादक द्रव्याचा पुरवठा बिनधास्त सुरू असून सर्वसामान्यांच्या अनेक कुटुंबातील तरुण व अन्य व्यक्त या अमली पदार्थांच्या आहारी जाऊन त्यांचे आयुष्य कायमचे उध्वस्त झाले आहे. हे लक्षात घेऊन पोलीस कारवाई कधी करणार?