शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
2
एक खेळाडू सामन्याचा निकाल फिरवू...; आशिया कप फायनलपूर्वी वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी
3
Tamilnadu Stampede : अभिनेता थलपती विजयची मोठी घोषणा; चेंगराचेंगरीतील मृतांच्या कुटुंबियांना देणार प्रत्येकी २० लाख
4
महेश मांजरेकरांची पहिली पत्नी दीपा मेहता यांचं निधन, आईच्या आठवणीत मुलाची पोस्ट
5
दिवाळीपूर्वी मोठी बातमी! फक्त १,२०० रुपयांमध्ये देशात कुठेही विमान प्रवासाची संधी; 'या' कंपनीने आणली ऑफर्स
6
स्वामी चैतन्यानंद फसवणुकीतही माहिर! लोकांवर प्रभाव पाडण्यासाठी बनावट UN-BRICS कार्ड; धक्कादायक माहिती उघड
7
Tamilnadu Stampede : "अभिनेत्याला यायला उशीर, पाण्याची कमतरता आणि..."; चेंगराचेंगरीबद्दल काय म्हणाले पोलीस?
8
IND vs PAK Final, Asia Cup 2025: फायनलमध्ये पाकिस्तानविरोधात भारताचा रेकॉर्ड फारसा चांगला नाही; आजपर्यंत १० वेळा भिडला, पण...
9
Rain Update : काळजी घ्या! बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, आज मुसळधार; विदर्भ, मराठवाड्यासह या भागात बरसणार
10
'पीएम किसान'चा २१ वा हप्ता जाहीर! ३ राज्यांतील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कधी?
11
IND vs PAK Final, Asia Cup 2025: भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार?
12
Video - तामिळनाडूतील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह पाहून शिक्षणमंत्री ढसाढसा रडले
13
LPG ते पेन्शन, UPI पासून रेल्वे तिकीटापर्यंत... १ ऑक्टोबरपासून 'हे' ५ नियम बदलणार
14
आधी मसाज करायला आले अन्..; हायकोर्टाच्या वकिलाकडून ब्लॅकमेलिंगद्वारे पैसे उकळले!
15
IND vs PAK Final, Asia Cup 2025 Marathi : आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 
16
वाट चुकलेले दुचाकीस्वार थेट बेलापूर खाडीत; दोन महिन्यांतील दुसरी घटना; एक जण गेला वाहून
17
लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी स्वामी चैतन्यानंद यांना अटक; पोलिसांनी आग्र्यातून ताब्यात घेतले
18
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
19
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
20
"एकेकाळी कौतुक करणारे लोक आज...", सलमान खानचा अप्रत्यक्षपणे अभिनव कश्यपवर निशाणा

पालघर मुख्यालय, नवनगरचे काम पावसाळ्यानंतर सुरू

By admin | Updated: July 7, 2017 05:49 IST

पालघर जिल्हा मुख्यालय व पालघर नवनगर वसविण्याचे काम सिडकोकडून होणार आहे. त्यामधील जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद व जिल्हा पोलीस

लोकमत न्यूज नेटवर्कपालघर : पालघर जिल्हा मुख्यालय व पालघर नवनगर वसविण्याचे काम सिडकोकडून होणार आहे. त्यामधील जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद व जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या निविदा मान्यतेसाठी सिडकोच्या समितीकडे ठेवण्यात येणार असून पावसाळ्यानंतर ही कामे सुरु होणार आहेत. या जागेची पाहणी करण्यासाठी बुधवारी सिडकोचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांनी पालघरला भेट दिली. अशी माहिती जिल्हाधिकारी प्रशांत नारनवरे यांनी पत्रकारांना दिली.गगराणी यांनी त्यांच्या प्रमुख अधिकाऱ्यांसह आमदार व जिल्हाधिकाऱ्यांशी याबाबतीत चर्चा केली. या मुख्यालयांना चांगल्या पद्धतीने विकसित करण्यात येणार असून इथे वसणारे नवनगर हे स्मार्ट सिटी प्रमाणे असेल. ४४० हेक्टर पैकी १०३ हेक्टर क्षेत्रात मुख्यालयाचे निर्माण होणार असून पाणी पुरवठा, सांडपाणी व्यवस्था, पावसाचे पाणी वाहण्यासाठीच्या व्यवस्थेचा विचार या आराखड्यात केला असल्याचे ते म्हणाले. पाणी पुरवठ्यासाठी भविष्याचा विचार करून त्यापद्धतीची आखणी करीत असून यासाठी पिंजाळ किंवा सुर्यातून ते पाणी घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी होणारी रहदारी वाहतूक व लोकसंख्या लक्षात घेऊन प्रशस्त मुख्य रस्ते व त्यांना जोडणाऱ्या रस्त्याचे सुसूत्रीत जाळे उभारण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. भविष्यात आज नाही तर उद्या बोईसर पालघर महानगरपालिका होणारच आहे. त्यादृष्टीने आतापासून भविष्याचा विचार करून त्या कार्यालयांच्या जागा आरक्षित केले असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.नवनगरमध्येही बीकेसी उभारणार मुंबईच्या बीकेसी प्रमाणे येथेही सेंट्रल बिसनेस डिस्ट्रिक्ट हब करावयाचे असल्याचा मानस त्यांनी यावेळी बोलून दाखिवला.जिल्हा न्यायालय स्थापन झाल्यानंतर कारागृहाच्या प्रश्नाविषयी बोलताना त्यांनी त्यासाठी जागा आरक्षित करणार असल्याचेही सांगितले.या प्रकल्पाच्या बांधकामासाठी अणुऊर्जा केंद्राच्या निकषांची गरज असली तरी आज दोन किंवा तीन मजली इमारतीचं उभ्या राहतील मात्र भविष्यात पुढे वाढीव परवानगी मिळाली तर त्यासाठी या इमारतीचा पाया हा त्यानुसार करून ठेवणार असल्याचे आराखड्यात नमूद असल्याचे ते म्हणाले.