शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

पालघर आगाराला बाप्पा पावला :  ४३ लाख उत्पन्न, २४५ विशेष बसेस सोडण्याचा प्रयत्न यशस्वी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2017 05:42 IST

यंदा कोकणात गौरी-गणपतीच्या सणासाठी जाणाºया चाकरमान्यांसाठी २४५ विशेष बसेस सोडण्याच्या उपक्रमातून राज्य परिवहन महामंडळाच्या पालघर विभागाला ४३ लाख ५१ हजार ५७६ रु पयांचे जादा उत्पन्न मिळाले.

- हितेंन नाईक पालघर : यंदा कोकणात गौरी-गणपतीच्या सणासाठी जाणाºया चाकरमान्यांसाठी २४५ विशेष बसेस सोडण्याच्या उपक्रमातून राज्य परिवहन महामंडळाच्या पालघर विभागाला ४३ लाख ५१ हजार ५७६ रु पयांचे जादा उत्पन्न मिळाले. विशेष म्हणजे कुठलाही अपघात व प्रवाशांची गैरसोय न होता हा उपक्रम निर्विघ्नपणे पार पाडण्यात एसटी विभाग यशस्वी झाला.पालघर विभागाने जिल्ह्यातून कोकणात जाणा-या चाकरमान्यांच्या सोयीसाठी एसटीची चोख व्यवस्था केली होती. सर्वसामान्यांची जीवन वाहिनी म्हणून ओळखल्या जाणाºया एसटीने आपली ओळख व प्रवाश्याशी असलेले नाते अधिक दृढ करतांना या नियोजनाला कुठेही गालबोट लागणार नाही याची अधिक दक्षता घेतली. या विभागाचे प्रमुख अजित गायकवाड व त्यांच्या सहका-यांनी अगदी नियोजनबद्ध पद्धतीने आणि उत्साहवर्धक वातावरणात पालघर, डहाणू, वसई, जव्हार डेपोतून सोडलेल्या २४५ बसेस द्वारे १ लाख ४३ हजार १६९ किलोमीटरचा प्रवास सुखरुप पार पाडण्याची विशेष दक्षता घेतली. व ‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’ हे ध्येयवाक्य कृतीत उतरविले.अशी बजावली आगारनिहाय कामगिरींचाकरमान्यांनी केलेल्या मागणी नुसार २१ आॅगस्ट पासूनच अर्नाळा आजारातून पहिली एसटी कोकणा कडे रवाना करून या उपक्रमाचा प्रारंभ झाला. पालघर आगारातून २३ एसटींनी १६ हजार ४६ किमीचा प्रवास करून ४ लाख ६० हजार ४३७ रु पये, सफाळे आगारातून ६ बसेस द्वारे ४ हजार ६३१ किमी प्रवासातून १ लाख ५ हजार ५६९ रु पये, वसई आगारातून ३९ बसेस द्वारे २७ हजार २३३ किमी प्रवासातून ७ लाख ८३ हजार ३ रुपये,अर्नाळा आगारातून ८८ बसेस द्वारे ३५ हजार १४९ किमी प्रवासातून सर्वाधिक ८ लाख ७८ हजार ६७८ रुपये, नालासोपारा आगारातून २७ बसेस द्वारे १४ हजार ४१८ किमी प्रवासातून ४ लाख ८२ हजार ९२३ रु पये,डहाणू आगारातून १४ बसेस द्वारे १३ हजार ४२ किमी च्या प्रवासातून 2 लाख ९९ हजार ७८१ रु पये,जव्हार आगारातून २२ बसेस च्या फेºया द्वारे १६ हजार ३७२ किमी प्रवासातून ६ लाख ३० हजार ७०१ रुपये तर बोईसर आगारातून २६ बसेस फेºया द्वारे १६ हजार २७९ किमी प्रवासातून ६ लाख १० हजार ४८४ रु पये अश्या एकूण २४५ बस फेºया द्वारे १ लाख ४३ हजार १६९ किलोमीटरचा प्रवास निर्विघनपणे पार पाडीत राज्य परिवहन महामंडळाच्या पालघर विभागाने एकूण ४३ लाख ५१ हजार ५७६ हजाराचे उत्पन्नाचे उिद्दष्ट (६४.८९ टक्के भारमान) निर्विघ्नपणे पार केल्याची माहिती सहाय्यक वाहतूक अधीक्षक अंकुश सागर ह्यांनी लोकमत ला दिली.