शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

पालघरचे समीकरण स्पष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2017 06:04 IST

पालघर तालुक्यातील २९ ग्रामपंचायतींच्या व सरपंच पदांच्या निवडणुकीच्या निकालाला मंगळवारी सकाळी लागल्या नंतर बहुजन वि

पालघर : तालुक्यातील २९ ग्रामपंचायतींच्या व सरपंच पदांच्या निवडणुकीच्या निकालाला मंगळवारी सकाळी लागल्या नंतर बहुजन विकास आघाडी ९, शिवसेना ७ तर भाजप ने २ ग्रामपंचायतीवर आपल्या पक्षाचे सरपंच निवडून आल्याचा दावा केला आहे. तर अन्य ग्रामपंचायती ग्राम परिवर्तन विविध आघाड्यानी लढविल्या होत्या.तालुक्यातील सातपाटी,नवी दापचरी, कर्दळ, माकणे, साखरे, आगरवाडी, करळगाव, पाम, टेम्भी, गुंदले, कोकनेर, बहाडोली, पोळे, धनसार, विळगी, विराथन खुर्द, काटाळे, पोफरण, उसरणी, नांदगाव तर्फे मनोर, कोरे, खर्डी, कोसबाड, गिरणोली, धुकटन, डोंगरे, चहाडे, नानिवली, पथराळी, खामलोली, नावझे, लोवरे, अक्करपट्टी, अश्या एकूण ३३ ग्रामपंचायती च्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर नानिवली, काटाळे आणि गिरणोली ह्या तीन ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. तर कोसबाड ग्रामपंचायत अंशत: बिनविरोध झाली.तर कर्दळ, कोसबाड, पोफरण साखरे, नानिवली, काटाळे ह्या ग्रामपंचायतीचे सरपंच बिनवीरोध निवडून आले. तर अक्करपट्टी ग्रामस्थांनी निवडणुकीवर बहिष्कार घातला होता. तालुक्यातील गिरणोली सरपंच-(पंढरी जाधव), धुकटन (प्रसाद भोईर), कर्दळ(नलू तुंबडा) खार्डी (राजेश घरत), कोकणेर (किशोर खडके), कोर े(प्राजक्ता तांडेल), लोवरे (चेतना तांडेल), माकने(रोहिणी शेलार), विलंगि (स्वाती पाटिल), ह्या ग्रामपंचायतीवर बहुजन विकास आघाडीचे सरपंच निवडून आल्याचा दावा तालुकाध्यक्ष प्रशांत पाटील, तर धनसार (सरपंच-राजन घरत), गुंदले(रंजना कुंभारे), खामलोली (शुभांगी डगला), नावझे (विद्या लाबड), पोफरण (मनीषा पाटील), विराथन खुर्द (राजश्री किणी), डोंगरे (वैभव पाटील) ह्या सात ग्रामपंचायतीवर आपल्या पक्षाचे सरपंच निवडून आल्याचा दावा जिल्हाप्रमुख उत्तम पिंपळे ह्यांनी केला आहे. तर भाजप ने बहाडोली ( व नवी दापचरी (साधना सुतार) ह्या ग्रामपंचायतीवर सरपंचाच्या दावा केला आहे तर अन्य ग्रामपंचायती पैकी सातपाटी ग्रा.प.वर एकता विकास मंच, सरपंच (अरविंद पाटील), आगरवाडी-काँग्रेस, बविआ, राष्ट्रवादी आघाडी, (वृषाली गावड) चहाडे-परिवर्तन पॅनल, (वत्सला माळी) नांदगाव तर्फे मनोर -अपक्ष, (पवन सवरा) पाम-अपक्ष (प्रभाकर पिंपळे), साखरे-बिनविरोध, (रवींद्र गोवारी) टेम्भी-अपक्ष, (सुरेश पाटील) उसरणी-ग्राम विकास पॅनल, (हरेंद्र पाटील) करळगाव-अपक्ष ( कौतुक वायडा) असे सरपंच निवडून आले आहेत.संपामुळे जल्लोष ओसरलामतमोजणीच्या दिवशी एसटी चा संप असल्याने ग्रामीण भागातून अनेक कार्यकर्ते मतमोजणीला पोहचू शकले नाहीत. त्यामुळे विजयी उमेदवार जिंकल्या नंतरचा पक्षांमधील जल्लोष हवा तसा पहावयास मिळाला नाही. निकालानंतर माही ठिकाणी संघर्ष झाला.

टॅग्स :Electionनिवडणूक