शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

पालघर तीन महिन्यांत भारनियमनमुक्त करा

By admin | Updated: December 7, 2015 00:42 IST

जिल्ह्यातील एकही गाव यापुढे अंधारात राहणार नाही याची काळजी घ्या तीन महिन्यांच्या आत पालघर जिल्हा भारनियमन मुक्त करून ग्राहकांना उत्तम सेवा द्या

मनोर : जिल्ह्यातील एकही गाव यापुढे अंधारात राहणार नाही याची काळजी घ्या तीन महिन्यांच्या आत पालघर जिल्हा भारनियमन मुक्त करून ग्राहकांना उत्तम सेवा द्या, अन्यथा परिणामांना सामोरे जावे लागेल असा सज्जड इशारा ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अधिकाऱ्यांना दिला. पालघर जिल्ह्यातील महाराष्ट्र विज मंडळाच्या वितरण व महापारेषणाच्या समस्यांबाबत पालघर जिल्हा परिषदेच्या संकुलात ऊर्जामंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठकीचे आयोजन केले होते. यात पालकमंत्री विष्णू सवरा, आमदार विलास तरे, आमदार पास्कल धनारे, आ. हितेंद्र ठाकूर, जिल्हाधिकारी अभिजीत बांगर व जि.प. मुख्य कार्यकारी दिलीप शिंदे आदी उपस्थित होते. पालघर जिल्ह्यात एकूण ९ लाख ३६ हजार वीजग्राहक असून त्यापैकी ६ लाख १९ हजार वसई तालुक्यात आहेत. उर्वरीत ३ लाख १७ हजार पालघर डहाणू, तलासरी, वाडा, विक्रमगड, जव्हार व मोखाडा तालुक्यात आहेत. जिल्ह्यात नेहमी होत असलेल्या भारनियमनाचा फटका १ लाख ४० हजार वीज ग्राहकांना बसतो आहे. या सर्वांना भारनियमन मुक्त करण्यासाठी युद्ध पातळीवर कारवाई करावी व जिल्ह्यातील आदिवासी गावे तसेच १७५ पाडे व वाड्या यांच्या घरापर्यंत विज जोडण्या पुरविण्यासाठी अधिकाऱ्यांनी कार्यक्षमतेने व जबाबदारीने कामे करावीत असे निर्देश त्यांनी दिले. (वार्ताहर)