शहरं
Join us  
Trending Stories
1
एपस्टीन सेक्स स्कँडल: जगभरातील नेत्यांची झोप उडाली! दोन दिवस उरले, भारतीय नेत्यांचेही नाव?
2
तुळजापुरात भाजप-मविआच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा; काग्रेस उमेदवाराचा पुतण्या गंभीर जखमी
3
बारामतीतील मुलीवर अंबाजोगाईमध्ये सामूहिक बलात्कार, बदामबाईने आधी कला केंद्रावर नेलं, नंतर लॉजवर...
4
संतापजनक...! IAS अधिकाऱ्याची गाडी तपासली; गोव्याच्या एसपींनी पोलिसांनाच दिली उठाबशांची शिक्षा...
5
निवृत्तीनंतर हातात येणार रग्गड पैसा! NPS चे नवीन नियम लागू; ५ वर्षांचा 'लॉक-इन' कालावधी संपला
6
माणिकराव कोकाटे यांचे मंत्रिपद जाणार? आज अजित पवार यांची भेट घेणार, मोठ्या निर्णयाची शक्यता
7
शिंदेसेना ही अमित शाहांची 'टेस्ट ट्यूब बेबी', त्यांचा नैसर्गिक जन्म नाही; राऊतांची बोचरी टीका
8
Video - बापमाणूस! ६० फूट खोल बोरवेलमध्ये पडलेल्या लेकीसाठी वडिलांनी लावली जिवाची बाजी
9
विमा क्षेत्रात आता १००% परकीय गुंतवणुकीला मंजुरी; सर्वसामान्यांना स्वस्त पॉलिसी आणि चांगले पर्याय मिळणार?
10
'इस्लामिक दहशतवादाविरोधात उभे राहण्याची गरज', व्हाइट हाऊसमधून ट्रम्प यांचं आवाहन; केली मोठी घोषणा
11
महायुतीत एकनाथ शिंदेंची कोंडी; मुंबईत भाजपानं शिंदेसेनेला केवळ ५२ जागांचा दिला प्रस्ताव?
12
१९ तारखेला अत्यंत स्फोटक माहिती उघड होणार, ज्यानं भाजपा नेत्यांची फजिती होईल; संजय राऊतांचा दावा
13
टीम इंडियाला मल्टीप्लेक्समध्ये पाहून सगळचे चकीत झाले...; मैदानातील सगळेच धुरंधर 'धुरंधर' पहायला गेलेले...
14
Crime: बुरखा न घातल्यानं पती संतापला, पत्नीसह पोटच्या २ मुलींना संपवलं; मृतदेह पुरले खड्ड्यात!
15
कोण आहे डोनाल्ड ट्रम्प यांची होणारी सून...! मंगळवारीच उरकला साखरपुडा, दोघे भारतातही येऊन गेलेले...
16
उद्धव-राज विरुद्ध भाजप-शिंदेसेना असाच सामना; १३८ मराठी बहुल मतदारसंघ या निवडणुकीत ठरणार निर्णायक
17
सरकार आणखी एका बँकेतील हिस्सा विकण्याच्या तयारीत; खात्यात येणार २१०० कोटी, सध्या आहे ९५% हिस्सा
18
'उद्याच्या तेजस्वी पहाटेसाठी!' रितेश देशमुखचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेतील पहिला लूक समोर
19
"महापालिका निवडणूक लुटण्याचे वाटे केले गेले"; अंजली दमानियांचा निशाणा, महायुतीवर भडकल्या
20
प्रसिद्ध दिग्दर्शक आणि पत्नीच्या हत्या प्रकरणाला नवं वळण, पोलिसांनी लेकालाच केली अटक
Daily Top 2Weekly Top 5

पालघर जिल्ह्याला हवी कृषी उत्पन्न बाजार समिती, स्वतंत्र बाजारपेठ नाही  

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2020 01:19 IST

स्वतंत्र पालघर जिल्हा निर्माण झाला त्याला पाच वर्षे उलटून गेली तरी अद्यापही या जिल्ह्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती स्थापन झालेली नाही.

विक्रमगड : स्वतंत्र पालघर जिल्हा निर्माण झाला त्याला पाच वर्षे उलटून गेली तरी अद्यापही या जिल्ह्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती स्थापन झालेली नाही. जिल्ह्यात शेतकऱ्यांची संख्या मोठी असून त्यांचे उत्पन्नाचे दुसरे कोणतेही साधन नाही. त्यामुळे या परिसरात शेती करणाºया शेतकऱ्यांना शेतात पिकवलेला माल स्वत:च मुंबई, ठाणे, भिवंडी तसेच वापी या शहरांमध्ये जाऊन विकावा लागतो. या शेतकºयांसाठी जिल्ह्यात मध्यवर्ती ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समितीची सोय उपलब्ध व्हावी, अशी अपेक्षा स्थानिक शेतकरी व्यक्त करीत आहेत.पालघर जिल्ह्यातील विक्रमगड, मोखाडा, जव्हार, वाडा तसेच इतर तालुक्यांतही मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याचे उत्पन्न घेतले जात आहे. परंतु आपल्या शेतात पिकवलेला भाजीपाला विक्री करण्यासाठी अशी स्वतंत्र बाजारपेठ उपलब्ध नसल्यामुळे शेतकºयांना आपला माल स्वत:च विकावा लागत आहे. मुंबई, ठाणे, भिवंडी तसेच वापी येथील व्यापाºयांना हा माल द्यावा लागतो. परंतु या व्यापाºयांकडून त्यांना योग्य भाव मिळत नाही.जिल्ह्यातील विक्रमगडसह इतर तालुक्यांमध्ये अनेक खेड्यापाड्यांत सध्या मोठ्या प्रमाणात गवार, चवळी, मुळा, भेंडी, मेथी अशा प्रकारचा भाजीपाला तयार होतो. हा भाजीपाल्यासाठी थेट बाजारपेठ उपलब्ध नाही. या भागातील शेतकºयांच्या शेतात तयार होणारा भाजीपाला दररोज शेतकरी विक्रीसाठी घेऊन जात असतात. त्यामुळे त्यांचा अर्धा-अधिक वेळ हा भाजीपाला विक्रीसाठी बाजारातच जातो. त्यामुळे शेतात काम करण्यासाठी त्यांना पुरेसा वेळही मिळत नाही. या भागातील बहुतांश शेतकरी हे अशिक्षित, आदिवासी आहेत. त्यांना बाजारातील दलाल तसेच व्यापाºयांच्या ठकवणुकीला सामोरे जावे लागते. शेतकरी आपला माल बाजारात घेऊन गेला की, त्याला तो माल परत नेता येत नाही. कोणत्याही परिस्थितीत त्याला बाजारात तो माल खपवावाच लागतो. त्याची ही मजबुरी लक्षात घेऊन व्यापारी आणि दलाल भाव पाडून त्याच्याकडून माल खरेदी करतात. कष्ट करून, घाम गाळून आपल्या शेतात पिकवलेले सोने त्याला अशा रीतीने कवडीमोल भावाने विकावे लागते. मात्र परिस्थितीसमोर गांजलेल्या शेतकºयांना या परिस्थितीला शरण जाण्याशिवाय अन्य पर्याय नसतो.जिल्ह्यात कृषी उत्पन्न बाजार समितीसारखी बाजारपेठ उपलब्ध होत नसल्यामुळे आम्हाला आमचा माल नाइलाजाने व्यापाºयांना द्यावा लागतो. आमच्यासमोर दुसरा कोणताही पर्याय उपलब्ध नाही. यामुळे आमची फारच हैराणी होत आहे. भाव तोडून माल द्यावा लागत असल्याने तो परवडत नाही. यासाठी मध्यवर्ती ठिकाणी बाजारपेठ उपलब्ध होणे गरजेचे आहे. त्यामुळे माल देता येईल व भावही मिळेल.- राजाराम ढोणे, शेतकरी, विक्रमगड

टॅग्स :APMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीpalgharपालघर