शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पालघर जिल्ह्यात ९७ हजार परीक्षार्थी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2018 00:40 IST

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात येणाºया बारावीच्या परीक्षा २१ फेब्रुवारी तर दहावीच्या परीक्षा येत्या १ मार्चपासून सुरु होणार असून १२ वीच्या

हितेन नाईकपालघर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात येणाºया बारावीच्या परीक्षा २१ फेब्रुवारी तर दहावीच्या परीक्षा येत्या १ मार्चपासून सुरु होणार असून १२ वीच्या परीक्षेला पालघर जिल्ह्यातून ३८ परीक्षा केंद्रातून सुमारे ३९ हजार ०६३ विद्यार्थी तर दहावीच्या परीक्षेला ९८ केंद्रातून सुमारे ५८ हजार २६८ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.२१ फेब्रुवारी ते २१ मार्च या कालावधीत १२ वीची तर दहावीची परीक्षा १ मार्च ते २४ मार्च या कालावधीत होणार आहे. या सुरळीत व्हाव्यात या साठी शिक्षण विभाग सज्ज झाला असून सर्व तयारी पूर्ण झाली आहे. जिल्ह्यातील ४ तालुक्यातील ६ शाळांमधील परीक्षा केंद्रे संवेदनशील म्हणून घोषित करण्यात आली असून मोखाडा तालुक्यातील हिरवे मोखाडा, करेगाव मोखाडा, विनवळ मोखाडा, पालघर तालुक्यातील आगरवाडी, वसई तालुक्यातील ज्ञानोदय नालासोपारा तर जव्हार तालुक्यातील दाभोसा या परीक्षा केंद्रांना संवेदनशील केंद्रे म्हणून शिक्षण विभागाने घोषित केले आहे. या परीक्षा केंद्रावर दोन भरारी पथकांची करडी नजर राहणार आहे.पालघर जिल्ह्यातील आठ तालुक्यातील ३८ केंद्रातून ३९ हजार ०६३ विद्यार्थी बारावीची परीक्षा देणार आहेत. तिची जिल्ह्यातील सर्वाधिक २० केंद्रे वसई तालुक्यात आहेत. सुमारे २०,७०६ विद्यार्थी आहेत. वाडा तालुक्यातील ३ केंद्रातून २ हजार ९३६ , मोखाड्याच्या ३ केंद्रातून १ हजार १०३ , विक्रमगड मधील २ केंद्रातून १ हजार ५५७, जव्हारच्या १ केंद्रातून १ हजार २१२, तलासरीच्या ३ केंद्रातून १ हजार ९६९ , डहाणू येथील ४ केंद्रातून ३ हजार २१२, पालघरच्या २ केंद्रातून ६ हजार ३६९, अशा ३८ केंद्रातून ३९ हजार ०६३ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.दहावी परीक्षेला जिल्ह्यातील ८ तालुक्यातील ९८ केंद्रातून ५८ हजार २६८ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. सर्वाधिक वसई तालुक्यात असून ४९ केंद्रातून २९ हजार ६७२ परीक्षा देणार आहेत. तर वाडा तालुक्यातील ६ केंद्रातून ३ हजार ४८०, मोखाडा तालुक्यातील ४ केंद्रातून १ हजार ५७२, विक्रमगड तालुक्यातील ६ केंद्रातून २ हजार ७२५, जव्हार तालुक्यातील ४ केंद्रातून २ हजार २२७ , तलासरी तालुक्यातील ५ केंद्रातून ४ हजार ४५५ , डहाणू तालुक्यातील ९ केंद्रातील ५ हजार ६८५, पालघर तालुक्यातील १५ केंद्रातील ८ हजार ४५२ परीक्षा देतील.विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र जवळ असावे म्हणून जिल्हयात बारावीची चार तर दहावीची बारा नवीन केंद्रे या वर्षांपासून सुरू करण्यात आली आहेत. विद्यार्थ्यांनी तणाव मुक्त परीक्षा द्यावी. तसेच काही अडचणी उद्भवल्यास मंडळाच्या हेल्पलाइनवर संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ यांनी केले आहे.अशी असेल जिल्ह्यातील चोख व्यवस्थाप्रत्येक परीक्षा केंद्रात एक संचालक नियुक्त करण्यात आला असून सुमारे २५ विद्यार्थ्यांमागे एक पर्यवेक्षक तसेच केंद्रावर एक पोलीस तैनात करण्यात आलेले आहेत. परीक्षेच्या पार्श्वभूमीवर प्रश्नपत्रिका संचांसाठी जिल्ह्यात १२ कस्टडी स्थापन करण्यात आलेल्या आहेत. प्रत्येक तालुक्यात १ तर पालघर व वसई तालुक्यात प्रत्येकी दोन कस्टडी चोख पोलीस बंदोबस्तात ठेवण्यात आलेल्या आहेत. शिक्षणाधिकारी प्राथमिक व शिक्षणाधिकारी माध्यमिक यांची दोन भरारी पथके तयार करण्यात आली असून त्यात सुमारे आठ जणांचा ताफा समाविष्ट करण्यात आलेला आहे.