शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

डीएडचे परीक्षा केंद्र पालघरला

By admin | Updated: May 28, 2016 02:28 IST

डिएड परिक्षेचे केंद्र वसईतून पालघरला अचानक नेण्यात आल्याने मीरा भार्इंदर आणि वसई-विरार परिसरातील विद्यार्थ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत गैरसोयीचे ठिकाण टाळून

वसई : डिएड परिक्षेचे केंद्र वसईतून पालघरला अचानक नेण्यात आल्याने मीरा भार्इंदर आणि वसई-विरार परिसरातील विद्यार्थ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत गैरसोयीचे ठिकाण टाळून मुळच्या ठिकाणीच परीक्षा घेण्यात याव्यात अशी मागणी केली आहे. मीरा-भार्इंदर आणि वसई-विरार परिसरातील सुमारे पाचशे विद्यार्थी डिएडची परीक्षा देणार आहेत. गेल अनेक वर्षांपासून ही परीक्षा वसईतील पापडी येथील सेंट एलॉयशियस डिएड कॉलेजमध्ये होत असे. परंतु यावर्षी डिएडच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेचे केंद्र पालघर येथील सोनोपंत दांडेकर कॉलेज येथे ठेवण्यात आले आहे. वसई तालुक्यातील तसेच भार्इंदरच्या विद्यार्थ्यांना पालघर येथे ये-जा करणे त्रासदायक आहे. तेथे जाण्यासाठी रेल्वे गाडया मर्यादीत आहेत. ट्रेनच्या फेऱ्यासुद्धा खूप कमी आहेत. अलिकडे ट्रेन सर्विस बऱ्याच वेळा अनियमीत असते. शिवाय वसई खेडयापाडयातील विद्यार्थींनींना अप डाऊन करणे अत्यंत त्रासाचे आहे. विद्यार्थी परीक्षा केंद्रावर वेळेवर पोहोचावे, त्यांचा ताण कमी व्हावा म्हणून त्यांच्या परीक्षेचे केंद्र वसई येथील सेंट एलॉशियस डि.एड. कॉलेज येथेच ठेवण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)वसई शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष वसई शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष मायकल फुटर्याडो यांनी शिक्षण संचालक, पुणे यांच्याकडे यासंबंधी तक्रार केली. तसेच दूरध्वनीवरून संपर्क साधून परीक्षा केंद्र बदलाविषयी चौकशी केली असता ठाणे व पालघर येथील शिक्षणाधिकाऱ्यांनी केंद्र बदलाचा निर्णय घेतला असल्याचे शिक्षण संचालकांनी सांगितलचे फुर्ट्याडो म्हणाले. विद्यार्थ्यांना असणारा परीक्षेचा तणाव त्यातून परीक्षा केंद्रावर वेळेवर पोहोचण्याची भिती, गाडयांच्या अनियमित फेऱ्या यांची कल्पना असूनही विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अयोग्य असलेला निर्णय घेणाऱ्या शिक्षण अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणीही फुर्ट्याडो यांनी शिक्षण संचालकांकडे मागणी केली आहे.