शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
2
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'
3
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
4
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
5
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
6
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
7
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
8
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
9
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
10
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
11
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
12
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
13
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत
14
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
15
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
16
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
17
लेख: सैरभैर जगाला हवा आहे ‘मुत्सद्दी मध्यस्थ’
18
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
19
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
20
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप

डीएडचे परीक्षा केंद्र पालघरला

By admin | Updated: May 28, 2016 02:28 IST

डिएड परिक्षेचे केंद्र वसईतून पालघरला अचानक नेण्यात आल्याने मीरा भार्इंदर आणि वसई-विरार परिसरातील विद्यार्थ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत गैरसोयीचे ठिकाण टाळून

वसई : डिएड परिक्षेचे केंद्र वसईतून पालघरला अचानक नेण्यात आल्याने मीरा भार्इंदर आणि वसई-विरार परिसरातील विद्यार्थ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत गैरसोयीचे ठिकाण टाळून मुळच्या ठिकाणीच परीक्षा घेण्यात याव्यात अशी मागणी केली आहे. मीरा-भार्इंदर आणि वसई-विरार परिसरातील सुमारे पाचशे विद्यार्थी डिएडची परीक्षा देणार आहेत. गेल अनेक वर्षांपासून ही परीक्षा वसईतील पापडी येथील सेंट एलॉयशियस डिएड कॉलेजमध्ये होत असे. परंतु यावर्षी डिएडच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेचे केंद्र पालघर येथील सोनोपंत दांडेकर कॉलेज येथे ठेवण्यात आले आहे. वसई तालुक्यातील तसेच भार्इंदरच्या विद्यार्थ्यांना पालघर येथे ये-जा करणे त्रासदायक आहे. तेथे जाण्यासाठी रेल्वे गाडया मर्यादीत आहेत. ट्रेनच्या फेऱ्यासुद्धा खूप कमी आहेत. अलिकडे ट्रेन सर्विस बऱ्याच वेळा अनियमीत असते. शिवाय वसई खेडयापाडयातील विद्यार्थींनींना अप डाऊन करणे अत्यंत त्रासाचे आहे. विद्यार्थी परीक्षा केंद्रावर वेळेवर पोहोचावे, त्यांचा ताण कमी व्हावा म्हणून त्यांच्या परीक्षेचे केंद्र वसई येथील सेंट एलॉशियस डि.एड. कॉलेज येथेच ठेवण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)वसई शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष वसई शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष मायकल फुटर्याडो यांनी शिक्षण संचालक, पुणे यांच्याकडे यासंबंधी तक्रार केली. तसेच दूरध्वनीवरून संपर्क साधून परीक्षा केंद्र बदलाविषयी चौकशी केली असता ठाणे व पालघर येथील शिक्षणाधिकाऱ्यांनी केंद्र बदलाचा निर्णय घेतला असल्याचे शिक्षण संचालकांनी सांगितलचे फुर्ट्याडो म्हणाले. विद्यार्थ्यांना असणारा परीक्षेचा तणाव त्यातून परीक्षा केंद्रावर वेळेवर पोहोचण्याची भिती, गाडयांच्या अनियमित फेऱ्या यांची कल्पना असूनही विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अयोग्य असलेला निर्णय घेणाऱ्या शिक्षण अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणीही फुर्ट्याडो यांनी शिक्षण संचालकांकडे मागणी केली आहे.