शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
5
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
6
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
7
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
8
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
9
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
10
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
11
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
12
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
13
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
14
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
15
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
16
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
17
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
18
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
19
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
20
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?

डीएडचे परीक्षा केंद्र पालघरला

By admin | Updated: May 28, 2016 02:28 IST

डिएड परिक्षेचे केंद्र वसईतून पालघरला अचानक नेण्यात आल्याने मीरा भार्इंदर आणि वसई-विरार परिसरातील विद्यार्थ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत गैरसोयीचे ठिकाण टाळून

वसई : डिएड परिक्षेचे केंद्र वसईतून पालघरला अचानक नेण्यात आल्याने मीरा भार्इंदर आणि वसई-विरार परिसरातील विद्यार्थ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत गैरसोयीचे ठिकाण टाळून मुळच्या ठिकाणीच परीक्षा घेण्यात याव्यात अशी मागणी केली आहे. मीरा-भार्इंदर आणि वसई-विरार परिसरातील सुमारे पाचशे विद्यार्थी डिएडची परीक्षा देणार आहेत. गेल अनेक वर्षांपासून ही परीक्षा वसईतील पापडी येथील सेंट एलॉयशियस डिएड कॉलेजमध्ये होत असे. परंतु यावर्षी डिएडच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेचे केंद्र पालघर येथील सोनोपंत दांडेकर कॉलेज येथे ठेवण्यात आले आहे. वसई तालुक्यातील तसेच भार्इंदरच्या विद्यार्थ्यांना पालघर येथे ये-जा करणे त्रासदायक आहे. तेथे जाण्यासाठी रेल्वे गाडया मर्यादीत आहेत. ट्रेनच्या फेऱ्यासुद्धा खूप कमी आहेत. अलिकडे ट्रेन सर्विस बऱ्याच वेळा अनियमीत असते. शिवाय वसई खेडयापाडयातील विद्यार्थींनींना अप डाऊन करणे अत्यंत त्रासाचे आहे. विद्यार्थी परीक्षा केंद्रावर वेळेवर पोहोचावे, त्यांचा ताण कमी व्हावा म्हणून त्यांच्या परीक्षेचे केंद्र वसई येथील सेंट एलॉशियस डि.एड. कॉलेज येथेच ठेवण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)वसई शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष वसई शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष मायकल फुटर्याडो यांनी शिक्षण संचालक, पुणे यांच्याकडे यासंबंधी तक्रार केली. तसेच दूरध्वनीवरून संपर्क साधून परीक्षा केंद्र बदलाविषयी चौकशी केली असता ठाणे व पालघर येथील शिक्षणाधिकाऱ्यांनी केंद्र बदलाचा निर्णय घेतला असल्याचे शिक्षण संचालकांनी सांगितलचे फुर्ट्याडो म्हणाले. विद्यार्थ्यांना असणारा परीक्षेचा तणाव त्यातून परीक्षा केंद्रावर वेळेवर पोहोचण्याची भिती, गाडयांच्या अनियमित फेऱ्या यांची कल्पना असूनही विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अयोग्य असलेला निर्णय घेणाऱ्या शिक्षण अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणीही फुर्ट्याडो यांनी शिक्षण संचालकांकडे मागणी केली आहे.