शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

भाताचे पैसे दोन महिने रखडले

By admin | Updated: February 8, 2016 02:28 IST

वाडा तालुक्यात सुरू असलेल्या भात खरेदी केंद्रांना आदिवासी विकास महामंडळाकडून वेळीच पैसा उपलब्ध होत नसल्याने दोन महिन्यापेक्षा अधिक काळ लोटला तरी भात विक्रीचे पैसे शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत.

वाडा : वाडा तालुक्यात सुरू असलेल्या भात खरेदी केंद्रांना आदिवासी विकास महामंडळाकडून वेळीच पैसा उपलब्ध होत नसल्याने दोन महिन्यापेक्षा अधिक काळ लोटला तरी भात विक्रीचे पैसे शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत. या मुळे शेतकऱ्यात महामंडळा विरूध्द प्रचंड संताप आहे.महाराष्ट्र सहकारी आदिवासी विकास महामंडळाकडून तालुक्यात भात खरेदी केंद्र सुरू करण्यात आली आहेत. यात खानिवली, गोऱ्हे, परळी, पोशेरी, तिळगांव , खैरे आंबिवली या केंद्रांचा समावेश आहे. या केंद्रावरील अनेक बाबींबाबत शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. तरीही शेतकरी आर्थिक अडचणीमुळे दुरदुरून भात विक्रीसाठी केंद्रावर आणतात. मात्र भात विक्रीनंतर लगेच शेतकऱ्यांना पैसे दिले जात नाहीत असे डाकिवली येथील शेतकरी चंद्रकांत पाटील या शेतकऱ्यांने सांगितले. दोन महिन्यापेक्षा अधिक काळ लोटला तरी भात विक्रीचे पैसे दिलेले नाहीत. पैशासाठी चौकशा व अनेक खेटे शेतकऱ्यांना मारावे लागतात. या महामंडळाच्या अनागोंदी कारभारा विरोधात शेतकऱ्यांत प्रचंड संताप आहे.या बाबत सहकारी बँकेत चौकशी केली असता असे समजले की, आदिवासी महामंडळ उपप्रादेशिक कार्यालय मोखाडा यांनी शेतकऱ्यांसाठी आलेल्या पैशाची हुंडी पांच दिवसाच्या आत बँकेतून वटविली पाहीजे. पाच दिवसापेक्षा जास्त दिवस न वटविता ठेवली तर त्यावर दंड आकारला जातो. व दंडाची रक्कम भरल्यानंतरच बँक पुढील हुंडी पास करते. अशी दंडाची लाखो रूपयाची रक्कम बँकेत भरलेली नसल्याने बँकेला हुंडी तास करण्यात अडचण असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. महामंडळ व सहकारी सोसायट्यात सदरचा दंड भरण्याबाबत तू तू मै मै सुरू असल्याने शेतकऱ्यांचे मरण झाले आहे.महामंडळाच्या मोखाडा उपप्रादेशिक कार्यालयाकडून या दंड व्याजाची रक्कम नाशिक येथून मागवून ती बँकेत अदा करणे जरूरीचे होते.मात्र ही बाब अजून झालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना पैसे मिळालेले नाहीत. असे बँकेकडून समजलेआठ दिवसात शेतकऱ्यांना भात विक्रीचे पैसे मिळाळे नाहीत तर शेतकरी आंदोलन छेडतील असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.