शहरं
Join us  
Trending Stories
1
धगधगतं फ्रान्स! लाखो लोक रस्त्यावर उतरले, काही ठिकाणी दगडफेक; रेल्वे, मेट्रो, बस, शाळा बंद
2
Mumbai Crime: घाटकोपर रेल्वे स्थानकाबाहेर सापडला ३५ वर्षाच्या माणसाचा मृतदेह; कोणामुळे गेला जीव?
3
गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान: अजित पवारांनी टोचले कान; म्हणाले, 'भाजपची जबाबदारी फडणवीसांची'
4
"आम्ही मित्र बनलो अन्..." १९ वर्षीय मॉडलनं का उचललं टोकाचं पाऊल?; बॅगेतील चिठ्ठीमुळे उघडलं रहस्य
5
रुममेटशी भांडण, पोलिसांनी थेट झाडल्या गोळ्या, अमेरिकेत भारतीय इंजिनियरचा मृत्यू  
6
बँक खात्यात पैसे नाही, टेन्शन कशाला? आता करा UPI पेमेंट, पुढच्या महिन्यात पैसे भरा; 'यांनी' आणलं जबरदस्त फीचर
7
आधी गोलंदाजीवर ठोकले गेले ५ षटकार, मग वडिलांचं निधन, श्रीलंकन क्रिकेटपटूवर कोसळला दु:खाचा डोंगर   
8
Nilon's Success Journey: लोणचं खायला घालून कंपनीनं कमावले ४०० कोटी; छोट्या किचनमधून झाली सुरुवात, आज परदेशातही आहे व्यवसाय
9
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानवर रात्री १.३० वाजताच स्ट्राइक का केले?; CDS चौहान यांचा खुलासा
10
फायद्याची बातमी! पेन्शनचा १००% पैसा टाका इक्विटीत; १ ऑक्टोबरपासून लागू होणार नवा नियम; पैसे कुठे आणि किती वाढत आहेत हे समजणे सोपे होणार
11
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
12
आयफोन १७ च्या खरेदीवर ईएमआय किती येईल? जाणून घ्या बँक आणि कॅशबॅक ऑफर्स!
13
सात महिन्यांमध्ये राज्यात वाढले १४ लाख मतदार; राजकीय पक्षांकडून कोणताच आक्षेप नाही
14
iPhone 17: आयफोन १७ मालिकेची विक्री आजपासून सुरू; मुंबईतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर ग्राहकांची मोठी गर्दी
15
सरकारचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर, वितरण २२ सप्टेंबर रोजी मुंबईत होणार; जाणून घ्या यादी
16
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
17
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
18
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
19
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
20
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली

वाड्यात भातखरेदीचा उडाला बोजवारा, बळीराजाची लूट सुरूच

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2020 00:58 IST

वाडा तालुक्यात सुरू असलेल्या भातखरेदी केंद्रांना महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाच्या उदासीन कारभाराची घूस लागल्याने भातखरेदीचा पुरता बोजवारा उडाला आहे.

वाडा : तालुक्यात सुरू असलेल्या भातखरेदी केंद्रांना महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाच्या उदासीन कारभाराची घूस लागल्याने भातखरेदीचा पुरता बोजवारा उडाला आहे. त्यामुळे पोटापाण्यासाठी दुसरा पर्याय नसल्याने शेतकरी मातीमोल किमतीत खासगी व्यापाऱ्यांना भात विकू लागल्याने व्यापाऱ्यांचं मात्र चांगभलं होत आहे.आदिवासी विकास महामंडळाकडे कर्मचाऱ्यांच्या अनेक जागा रिक्त असल्याने आदिवासी सेवा सहकारी सोसायट्या व सेवा सहकारी संस्थेमार्फत भातखरेदी केंद्र चालविली जात असत. मात्र, आता सेवा सहकारी संस्थेकडची केंद्र बंद करण्यात आली आहेत. तालुक्यात आदिवासी सेवा सहकारी सोसायट्यांची पोशेरी, खानिवली, परळी, कळंभा, गारगांव, खैरे-आंबिवली या ठिकाणची केंद्रे सुरू आहेत, परंतु या भातखरेदी केंद्र चालकांकडून भात भरण्यासाठी लागणारी पोती शेतकऱ्यांना जुनी देऊन केंद्र चालक नवीन पोत्यांचे पैसे घेतात, असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.तालुक्यातील बहुसंख्य केंद्र चालकांनी मोटार बसविल्याने तेथे भाताच्या दाण्यांचा तुकडा पडतो. त्यामुळे तो भात घेतला जात नाही व केंद्रावर आणलेले भात शेतकरी पुन्हा परत घेऊन घरी जाऊ शकत नाही. याच संधीचा फायदा हे केंद्र चालक अगदी कमी दराने शेतकऱ्यांकडून खासगीत भातखरेदी करतात. काही केंद्र चालक मापात फसवणूक करतात, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. भातखरेदी केंद्रांवर शासनाचे नियम धाब्यावर बसवून भाताची प्रतवारी ठरविली जात असल्याने तालुक्यात शेतकऱ्यांची लूट सुरू आहे.वाडा तालुक्याला भाताचे कोठार म्हणून संबोधले जाते. येथे भातपिकाचे क्षेत्रही अन्य तालुक्यांपेक्षा अधिक आहे. त्यामुळे तालुक्यात जास्तीतजास्त भातखरेदी केंद्र उघडणे अपेक्षित असताना मोजकीच केंद्र उघडल्याने अनेक शेतकऱ्यांचा भात विक्री झालेला नाही. तालुक्यातील महसुली गावांची संख्या १५० हून अधिक असताना ठरावीक भातखरेदी केंद्र सुरू केल्याने, या केंद्रावर भात घेऊन जाण्यासाठी शेतकऱ्यांना २० ते २५ किमी अंतराचा प्रवास करून जावे लागते, शिवाय आदिवासी सेवा सहकारी सोसायट्यांच्या नावावर गोडावूनधारकच ही केंद्र चालवत असल्याने त्यांच्यावर प्रशासनाचा अंकुश राहिलेला  नाही. आदिवासी विकास महामंडळाची खरेदी ही योग्य आहे, परंतु कर्मचाऱ्यांच्या अभावामुळे आदिवासी सेवा सहकारी संस्थेमार्फत चालू असलेली भातखरेदी ही शेतकऱ्यांना मारक आहे.- कांतीलाल म्हसकरभात उत्पादक शेतकरी, सोनाळे या संदर्भात आदिवासी विकास महामंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी विजय पवार यांच्याशी दूरध्वनीवरून वारंवार संपर्क साधला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

टॅग्स :agricultureशेतीVasai Virarवसई विरार