शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेसाठी निधी वळवला; संजय शिरसाट संतापले, म्हणाले, “खाते बंद केले तरी चालेल”
2
“अमित शाह महाराष्ट्रात ३ पक्ष चालवतात, अजितदादा-एकनाथ शिंदे कधीही CM होणार नाहीत”: संजय राऊत
3
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागत नाही"; टीकेची झोड उठताच चरणजीत सिंग चन्नी यांचा यू-टर्न
4
शिक्षिकेचं १३ वर्षाच्या विद्यार्थ्यासोबतच जुळलं सूत, पळूनही गेली; मानसी म्हणाली, 'माझ्या गर्भात त्याचं बाळ'
5
कर्ज नको म्हणून दिव्यांगाचा काढला विमा; हत्या करुन हडपले लाखो रुपये, 'असा' झाला पर्दाफाश
6
काव्या मारनपेक्षाही अनेक पटींनी श्रीमंत आहे राम चरणची सासू; एकट्या सांभाळतात ७७ हजार कोटींचा व्यवसाय
7
“पाक कायम शत्रू, मोदी-शाहांनी परवानगी दिल्यास युद्धास जायला तयार”; कर्नाटकातील मंत्री आक्रमक
8
नारळ पाण्यामुळे शुगर लेव्हल वाढते का, किती असते नॅचरल शुगर, शरीरावर काय होतो परिणाम?
9
पाकिस्तानची आर्थिक कोंडी; भारताने ट्रेड स्ट्राईक करत आयातीवर घातली बंदी, जहाजांचा मार्ग रोखला
10
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
11
Narasimha Navratri 2025: आजपासून ११ मे पर्यंत नृसिंह नवरात्रीत न विसरता म्हणा 'हे' तापमुक्ती देणारे स्तोत्र!
12
Bhiwandi Crime: पती कामावरून घरी आला अन् पत्नीसह तीन लेकींचे मृतदेहच दिसले, पोलिसही हादरले!
13
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
14
House Arrest Ullu app: एजाज खानच्या अडचणी वाढल्या! 'हाउस अरेस्ट शो' प्रकरणात पोलिसांकडून पहिली अ‍ॅक्शन
15
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?
16
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
17
गोव्यातील लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...”
18
रोज १२ तास मोबाईलवर गेम खेळायचा मुलगा; पाठीच्या कण्याचे वाजले तीन तेरा, परिस्थिती गंभीर
19
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे
20
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट

वाड्यात भातखरेदीचा उडाला बोजवारा, बळीराजाची लूट सुरूच

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2020 00:58 IST

वाडा तालुक्यात सुरू असलेल्या भातखरेदी केंद्रांना महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाच्या उदासीन कारभाराची घूस लागल्याने भातखरेदीचा पुरता बोजवारा उडाला आहे.

वाडा : तालुक्यात सुरू असलेल्या भातखरेदी केंद्रांना महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाच्या उदासीन कारभाराची घूस लागल्याने भातखरेदीचा पुरता बोजवारा उडाला आहे. त्यामुळे पोटापाण्यासाठी दुसरा पर्याय नसल्याने शेतकरी मातीमोल किमतीत खासगी व्यापाऱ्यांना भात विकू लागल्याने व्यापाऱ्यांचं मात्र चांगभलं होत आहे.आदिवासी विकास महामंडळाकडे कर्मचाऱ्यांच्या अनेक जागा रिक्त असल्याने आदिवासी सेवा सहकारी सोसायट्या व सेवा सहकारी संस्थेमार्फत भातखरेदी केंद्र चालविली जात असत. मात्र, आता सेवा सहकारी संस्थेकडची केंद्र बंद करण्यात आली आहेत. तालुक्यात आदिवासी सेवा सहकारी सोसायट्यांची पोशेरी, खानिवली, परळी, कळंभा, गारगांव, खैरे-आंबिवली या ठिकाणची केंद्रे सुरू आहेत, परंतु या भातखरेदी केंद्र चालकांकडून भात भरण्यासाठी लागणारी पोती शेतकऱ्यांना जुनी देऊन केंद्र चालक नवीन पोत्यांचे पैसे घेतात, असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.तालुक्यातील बहुसंख्य केंद्र चालकांनी मोटार बसविल्याने तेथे भाताच्या दाण्यांचा तुकडा पडतो. त्यामुळे तो भात घेतला जात नाही व केंद्रावर आणलेले भात शेतकरी पुन्हा परत घेऊन घरी जाऊ शकत नाही. याच संधीचा फायदा हे केंद्र चालक अगदी कमी दराने शेतकऱ्यांकडून खासगीत भातखरेदी करतात. काही केंद्र चालक मापात फसवणूक करतात, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. भातखरेदी केंद्रांवर शासनाचे नियम धाब्यावर बसवून भाताची प्रतवारी ठरविली जात असल्याने तालुक्यात शेतकऱ्यांची लूट सुरू आहे.वाडा तालुक्याला भाताचे कोठार म्हणून संबोधले जाते. येथे भातपिकाचे क्षेत्रही अन्य तालुक्यांपेक्षा अधिक आहे. त्यामुळे तालुक्यात जास्तीतजास्त भातखरेदी केंद्र उघडणे अपेक्षित असताना मोजकीच केंद्र उघडल्याने अनेक शेतकऱ्यांचा भात विक्री झालेला नाही. तालुक्यातील महसुली गावांची संख्या १५० हून अधिक असताना ठरावीक भातखरेदी केंद्र सुरू केल्याने, या केंद्रावर भात घेऊन जाण्यासाठी शेतकऱ्यांना २० ते २५ किमी अंतराचा प्रवास करून जावे लागते, शिवाय आदिवासी सेवा सहकारी सोसायट्यांच्या नावावर गोडावूनधारकच ही केंद्र चालवत असल्याने त्यांच्यावर प्रशासनाचा अंकुश राहिलेला  नाही. आदिवासी विकास महामंडळाची खरेदी ही योग्य आहे, परंतु कर्मचाऱ्यांच्या अभावामुळे आदिवासी सेवा सहकारी संस्थेमार्फत चालू असलेली भातखरेदी ही शेतकऱ्यांना मारक आहे.- कांतीलाल म्हसकरभात उत्पादक शेतकरी, सोनाळे या संदर्भात आदिवासी विकास महामंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी विजय पवार यांच्याशी दूरध्वनीवरून वारंवार संपर्क साधला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

टॅग्स :agricultureशेतीVasai Virarवसई विरार