शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

भाताची कापणी मजुरांअभावी खोळंबणार

By admin | Updated: October 28, 2015 00:44 IST

कमी तसेच अनियमीतपणे पडलेल्या पावसानंतरही भातपीकांनी शेतजमीन फुलून गेली असून तयार झालेल्या भातपीकांची कापणी मजुराविना खोळंबण्याची शक्यता आहे.

बोईसर : कमी तसेच अनियमीतपणे पडलेल्या पावसानंतरही भातपीकांनी शेतजमीन फुलून गेली असून तयार झालेल्या भातपीकांची कापणी मजुराविना खोळंबण्याची शक्यता आहे. संध्याकाळी तयार होणारे ढगाळ वातावरण बळीराजाची चिंता वाढवित आहे.पालघर तालुक्याचे भौगोलिक क्षेत्रफळ सुमारे ११७८२४ हेक्टर असून त्यापैकी सुमारे १६ हजार २२२.८४ हेक्टर क्षेत्रफळावर भातलागवड करण्यात आली होती. त्यामध्ये ८ हजार ८३८ हेक्टर क्षेत्रफळावर हळवे, २ हजार ४९ हेक्टर क्षेत्रफळावर गरवे तर ४ हजार १५२ हेक्टर क्षेत्रफळावर निमगरवे भाताचे पीक घेण्यात आले आहे. जून महिन्यात पावसाने दमदार आगमन केल्यानंतर प्रथम भात बी पेरणी खोळंबली. त्यानंतर पावसाच्या दिर्घ विश्रांतीमुळे भातपीकांच्या कामाची गणीतेच कोलमडून पडली. त्या ही परिस्थितीत शेतकऱ्यांनी निसर्गाच्या लहरीपणावर मात करून भातपीकांना जोमाने वाढवून शेतजमीन फुलविली.परंपरागत कामे करणारे शेतमजूर व जव्हार, मोखाडा, विक्रमगड, तलासरी इ. भागातून येणारे मजूरांवर भातपीकांची कापणी ही प्रामुख्याने अवलंबून असते. परंतु स्थानिक शेतमजूरांची दिवसेंदिवस कमी होत असलेली संख्या तसेच दुर्गम भागातूनही मजूर पुरेशा संख्येने पालघर तालुक्यात येत नसल्याने शेतमजूरांचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे. दुर्गम भागातून येणारे मजूर हे दिवाळीपूर्वी परतीच्या प्रवासाला लागत असल्याने आता जे उपलब्ध होतील त्यांची मनधरणी करून लवकरात लवकर भातकापणी आटोपून घेण्याच्या प्रयत्नात शेतकरी आहेत. (वार्ताहर)यंदा पावसाची ओढ, भातपिकावरील रोग यामुळे पिकांची उगवणी लांबणीवर पडली असली तरी परतीच्या पावसाने भातपिके थोडीफार तरारली. उंची कमी असल्याने यंदा गवत-पावोलीचा उतारा कमी मिळेल, असे सुभाष देसले यांचे म्हणणे आहे. बळीराजाने भातझोडणीला सुरुवात केली आहे. आॅक्टोबर हीट वाढली तरी पाऊस येण्याची शक्यता असून कापलेल्या भाताच्या उडव्यावर प्लॅस्टिक अंथरले जात आहे.भातकापणीस जर उशीर झाला तर दिवसभरातील कडक उन्हामुळे भातामधील तांदळाचा दाणा टणक बनून दाणा तुटण्याची शक्यता अधिक असल्याने ठराविक वेळेत भातकापणी झाली नाही तर शेतकऱ्यांना अनेक संकटांना तोंड द्यावे लागणार आहे.