शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

अपुऱ्या पाणीपुरवठ्याने करपली-भेगाळली भातशेती 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 00:00 IST

डहाणू तालुक्यातील स्थिती : पेठ परिसरातील ४०-५० एकर शेती वाया जाण्याची भीती

लोकमत न्यूज नेटवर्क कासा : सूर्या कालव्यातून होणाऱ्या अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे कालव्यांना जोडणाऱ्या टोकाच्या बऱ्याच गावातील शेती वाया जाण्याची भीती असून पाण्याअभावी पेठ येथील ४० ते ५० एकर भातशेती ऐन दाणे भरण्याच्या हंगामात करपून जाण्याची भीती येथील शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

कोरोना काळात बरेच लहानमोठे शेतकरी सगळे कामधंदे बंद असल्याने आपल्या भातशेतीवर अवलंबून आहेत, मात्र इथेही कालव्यातून अनियमित व अपुरा पाणीपुरवठा तसेच कामगारांची कमतरता यामुळे सुरळीत पाणीपुरवठा केला जात नाही. त्यामुळे शेतीवर परिणाम होत आहे. डहाणू तालुक्यातील तवा, धामटने, पेठ, सूर्यानगर, वेती, वरोती, मुरबाड, वांगर्जे कासा, चारोटी, सारणी, आंबिवली, उर्से, साये, आंबिस्ते, रणकोळ, रानशेत आदी, तर पालघर तालुक्यातील सोमटा, आंबेदा, नानिवली, रावते, बोरशेती, चिंचारे, आकेगव्हाण, महागाव, कुकडे आदी सुमारे १०० गावांना उजव्या व डाव्या कालव्यांतर्गत शेतीसाठी उन्हाळ्यात पाणीपुरवठा केला जातो. सिंचन या प्रमुख उद्देशाने या धरणाची निर्मिती केली असली तरी आता बिगरसिंचनासाठी पाण्याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. त्यामधून जलसंपदा विभागास दरवर्षी लाखो रुपयांचा महसूल मिळतो, मात्र तरीही कालवे दुरुस्ती व कालवे देखभाल व शेतीला पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी कामगारांची नेमणूक करत नाहीत. त्यामुळे नाहक पाणीही बऱ्याच ठिकाणी वाया जाते. त्यामुळे कालव्यांना टोकाला जोडणाऱ्या बऱ्याच गावांना अपुरा पाणीपुरवठा होतो. त्यामुळे पाण्याअभावी भातपिकावर परिणाम होत आहे. याबाबत शेतकरी वारंवार तक्रारी करतात, मात्र तरीही या बाबीकडे जलसंपदा विभागाचे अधिकारी व कर्मचारी लक्ष देत नाहीत. तालुक्यातील पेठ येथे सुरळीत पाणीच पोहोचत नाही. त्यामुळे येथील शेतकरी आपल्या शेतात पाणी वाळून घेण्यासाठी रात्री १२ ते १ वाजेपर्यंत जागरणही करतात.

कालव्यातून शेतीला अपुरा पाणीपुरवठा होत असल्याने भातपिके करपू लागली आहेत.- हरेश्वर ठाकूर, शेतकरी, पेठ

कालव्यांतून सततच्या अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे शेतीला भेगा पडल्या आहेत. त्यामुळे भातशेती वाया जाण्याची स्थिती निर्माण झाली आहे.- नरोत्तम पाटील, शेतकरी, पेठ