शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर काँग्रेस पक्षाला थेट आरोपी बनवता येईल"; नॅशनल हेराल्ड प्रकरणात EDचा न्यायालयात दावा
2
IND vs ENG: बुमराहवर प्रचंड संतापला रवी शास्त्री; गंभीर-गिल जोडीला म्हणाला- "त्याच्या हातातून..."
3
"एकदा तरी मला माझ्या बहिणीला भेटू द्या"; सोनम रघुवंशीच्या भावाची मागणी, म्हणाला... 
4
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना मोठा धक्का, सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा!
5
८ वर्षांनी संधी; आता प्रमोशनही मिळालं! पण तो पुन्हा 'बिनकामाचा' ठरला
6
"माझ्यासमोरच त्याने तिघांना मारलंय"; वाल्मिक कराडच्या जुन्या सहकाऱ्याचा धक्कादायक दावा; म्हणाले, "त्याला बीडचा..."
7
कठड्यावर धडकून बाईकखाली पाय अडकला अन...; दुचाकी पेटल्याने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
8
टॉयलेटमध्ये जाणाऱ्या महिलांचे बनवत होता व्हिडीओ; प्रसिद्ध आयटी कंपनीमधील इंजिनियरला अटक
9
आधार कार्ड दिलं नाही म्हणून काढली पँट; कावड यात्रेआधी ओळख पटवणाऱ्या लोकांवर भडकले ओवैसी
10
इन्स्टाग्रामवर सूत जुळलं, कोर्ट मॅरेजनंतर मुलाला दिला जन्म; २२ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य
11
सर्वाधिक कसोटी सामने जिंकणारे भारतीय कर्णधार, धोनी दुसऱ्या क्रमांकावर, पहिला कोण?
12
"लग्न करुन येऊ? घर देणार का मग?", अ‍ॅक्टर असल्यामुळे मिळत नाहीये घर, पूजा कार्तुडे संतापली!
13
...तर अशी भागणार पाकिस्तानची तहान; सिंधू जल करार रद्द केल्यानंतर शहबाज शरीफ मोठं पाऊल उचलणार!
14
२०२७ पर्यंत ३ राशींना साडेसाती कायम, २ राशींवर शनि दृष्टी; अशुभ प्रभाव वाढेल? ‘हे’ उपाय कराच
15
“उद्धव ठाकरे ‘मातोश्री’चा एक हिस्सा काढून राज ठाकरेंना देणार का?”; नारायण राणेंचा सवाल
16
ENG vs IND : यशस्वी जैस्वाल इंग्लंडला नडला अन् कॅप्टन बेन स्टोक्सलाही भिडला; नेमकं काय घडलं?
17
५ जुलैच्या ठाकरे बंधूंच्या विजयी सभेत सहभागी होणार का? काँग्रेस नेत्यांचे सूचक विधान, म्हणाले...
18
काँग्रेस मजबूत करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष सपकाळांचा पुढाकार; ८३ तालुकाध्यक्षांच्या नियुक्त्या
19
KL राहुलला विश्वासच बसेना! क्रिस वोक्सनं अप्रतिम चेंडूवर उडवला त्रिफळा (VIDEO)
20
मुसळधार पावसात AC सुरू ठेवणं योग्य आहे का? बहुतेक लोक करतात 'ही' चूक

अपुऱ्या पाणीपुरवठ्याने करपली-भेगाळली भातशेती 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 00:00 IST

डहाणू तालुक्यातील स्थिती : पेठ परिसरातील ४०-५० एकर शेती वाया जाण्याची भीती

लोकमत न्यूज नेटवर्क कासा : सूर्या कालव्यातून होणाऱ्या अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे कालव्यांना जोडणाऱ्या टोकाच्या बऱ्याच गावातील शेती वाया जाण्याची भीती असून पाण्याअभावी पेठ येथील ४० ते ५० एकर भातशेती ऐन दाणे भरण्याच्या हंगामात करपून जाण्याची भीती येथील शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

कोरोना काळात बरेच लहानमोठे शेतकरी सगळे कामधंदे बंद असल्याने आपल्या भातशेतीवर अवलंबून आहेत, मात्र इथेही कालव्यातून अनियमित व अपुरा पाणीपुरवठा तसेच कामगारांची कमतरता यामुळे सुरळीत पाणीपुरवठा केला जात नाही. त्यामुळे शेतीवर परिणाम होत आहे. डहाणू तालुक्यातील तवा, धामटने, पेठ, सूर्यानगर, वेती, वरोती, मुरबाड, वांगर्जे कासा, चारोटी, सारणी, आंबिवली, उर्से, साये, आंबिस्ते, रणकोळ, रानशेत आदी, तर पालघर तालुक्यातील सोमटा, आंबेदा, नानिवली, रावते, बोरशेती, चिंचारे, आकेगव्हाण, महागाव, कुकडे आदी सुमारे १०० गावांना उजव्या व डाव्या कालव्यांतर्गत शेतीसाठी उन्हाळ्यात पाणीपुरवठा केला जातो. सिंचन या प्रमुख उद्देशाने या धरणाची निर्मिती केली असली तरी आता बिगरसिंचनासाठी पाण्याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. त्यामधून जलसंपदा विभागास दरवर्षी लाखो रुपयांचा महसूल मिळतो, मात्र तरीही कालवे दुरुस्ती व कालवे देखभाल व शेतीला पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी कामगारांची नेमणूक करत नाहीत. त्यामुळे नाहक पाणीही बऱ्याच ठिकाणी वाया जाते. त्यामुळे कालव्यांना टोकाला जोडणाऱ्या बऱ्याच गावांना अपुरा पाणीपुरवठा होतो. त्यामुळे पाण्याअभावी भातपिकावर परिणाम होत आहे. याबाबत शेतकरी वारंवार तक्रारी करतात, मात्र तरीही या बाबीकडे जलसंपदा विभागाचे अधिकारी व कर्मचारी लक्ष देत नाहीत. तालुक्यातील पेठ येथे सुरळीत पाणीच पोहोचत नाही. त्यामुळे येथील शेतकरी आपल्या शेतात पाणी वाळून घेण्यासाठी रात्री १२ ते १ वाजेपर्यंत जागरणही करतात.

कालव्यातून शेतीला अपुरा पाणीपुरवठा होत असल्याने भातपिके करपू लागली आहेत.- हरेश्वर ठाकूर, शेतकरी, पेठ

कालव्यांतून सततच्या अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे शेतीला भेगा पडल्या आहेत. त्यामुळे भातशेती वाया जाण्याची स्थिती निर्माण झाली आहे.- नरोत्तम पाटील, शेतकरी, पेठ