शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
3
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
4
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
5
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
6
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
7
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
8
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
9
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
10
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
11
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
12
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
13
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
14
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
15
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
16
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
17
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
18
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
19
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
20
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...

पाइपलाइनमुळे भातशेती पडणार ओस

By admin | Updated: July 7, 2017 05:42 IST

घोणसई या गावाच्या हद्दीत रिलायन्स कंपनीने खोदलेल्या चरात पाइपही टाकले नाहीत. व ते चर बुजविलेही नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना

लोकमत न्यूज नेटवर्कवाडा : घोणसई या गावाच्या हद्दीत रिलायन्स कंपनीने खोदलेल्या चरात पाइपही टाकले नाहीत. व ते चर बुजविलेही नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना पलीकडच्या शेतात जाण्याचे मार्ग बंद झाल्याने शेती ओस राहणार असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ येणार आहे. याबाबतचे निवेदन वाड्याच्या प्रांतअधिका-यांना देण्यात आले असून न्यायाची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. घोणसई या गावाच्या हद्दीतून गॅस पाईपलाईन जात असून कंपनीने गेल्या एप्रिल महिन्यात चर खोदले आहेत. त्या चराशेजारीच पाइप ठेवले आहेत. मात्र ते पाइप चरात अद्याप टाकलेले नाहीत. या चरामुळे शेतकऱ्यांचा पलीकडच्या शेतावर जाण्याचा मार्ग बंद झाला आहे. तसेच नैसर्गिक पाण्याचा प्रवाह बंद झाल्याने काही शेतात प्रचंड पाणी तर काही शेतात पाण्याचा थेंबही राहणार नसल्याची शक्यता शेतकऱ्यांनी व्यक्त केली. भात लागवडीची कामे सुरू केली आहेत. मात्र शेतावर जायला रस्ताच नसल्याने ती करता येत नाही. रिलायन्स कंपनीच्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्यांची शेती ओस राहून त्यांच्यावर उपासमारीची वेळ येण्याची भीती निवेदनात शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. आम्ही गरीब शेतकरी असून शेतीशिवाय आमचे उत्पनाचे दुसरे कोणतेही साधन नाही. त्यामुळे आमच्या वर उपासमारीची वेळ येणार असल्याची भीती निवेदनात नमूद केली आहे. आम्हाला न्याय न मिळाल्यास आमरण उपोषणाचा इशारा निवेदनात दिला आहे. त्यावर पांडुरंग पाटील, अशोक घोरकणे, प्रकाश पाटील, अंकुश घोरकणे या शेतक-यांच्या स्वाक्ष-या आहेत. यासंदर्भात रिलायन्स गॅस कंपनीचे अधिकारी बाला सुब्रमण्यम यांच्याशी संपर्क साधला असता एक दोन दिवसात शेतकऱ्यांसाठी रस्ता तयार करून दिला जाईल अशी माहिती त्यांनी दिली.