शहरं
Join us  
Trending Stories
1
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
2
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
3
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
4
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
5
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
6
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
7
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
8
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
9
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...
10
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मोठा धक्का! 'या' कंपनीने ११,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं
11
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
12
एस जयशंकर यांच्या संयुक्त राष्ट्रातील भाषणावर पाकिस्तान प्रतिक्रिया देऊन फसले; स्वतःला दहशतवादाचे अड्डे मानले
13
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
14
डोंबिवलीत त्या तरुणाने ११ व्या मजल्यावरुन उडी का मारली; धक्कादायक कारण आले समोर
15
'फुलवंती'सारखंच खऱ्या आयुष्यातही नकळत दुसऱ्या महिलेच्या प्रेमात पडलास तर? गश्मीर म्हणाला...
16
दिवाळीत बाइक खरेदीचा विचार करताय? ८०,००० रुपयांच्या बजेटमधील टॉप ५ पर्याय पाहा!
17
एक खेळाडू सामन्याचा निकाल फिरवू...; आशिया कप फायनलपूर्वी वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी
18
मिशन शक्ती : ९ वी ते १२ वीच्या विद्यार्थिनींना मोफत मध्यान्ह भोजन, योगींच्या मार्गदर्शनाखाली अनोखं पाऊल
19
अभिनेता विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी कशी झाली? प्रत्यक्षदर्शींनी दिली धक्कादायक माहिती, म्हणाले...  
20
Tamilnadu Stampede : अभिनेता थलपती विजयची मोठी घोषणा; चेंगराचेंगरीतील मृतांच्या कुटुंबियांना देणार प्रत्येकी २० लाख

पाइपलाइनमुळे भातशेती पडणार ओस

By admin | Updated: July 7, 2017 05:42 IST

घोणसई या गावाच्या हद्दीत रिलायन्स कंपनीने खोदलेल्या चरात पाइपही टाकले नाहीत. व ते चर बुजविलेही नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना

लोकमत न्यूज नेटवर्कवाडा : घोणसई या गावाच्या हद्दीत रिलायन्स कंपनीने खोदलेल्या चरात पाइपही टाकले नाहीत. व ते चर बुजविलेही नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना पलीकडच्या शेतात जाण्याचे मार्ग बंद झाल्याने शेती ओस राहणार असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ येणार आहे. याबाबतचे निवेदन वाड्याच्या प्रांतअधिका-यांना देण्यात आले असून न्यायाची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. घोणसई या गावाच्या हद्दीतून गॅस पाईपलाईन जात असून कंपनीने गेल्या एप्रिल महिन्यात चर खोदले आहेत. त्या चराशेजारीच पाइप ठेवले आहेत. मात्र ते पाइप चरात अद्याप टाकलेले नाहीत. या चरामुळे शेतकऱ्यांचा पलीकडच्या शेतावर जाण्याचा मार्ग बंद झाला आहे. तसेच नैसर्गिक पाण्याचा प्रवाह बंद झाल्याने काही शेतात प्रचंड पाणी तर काही शेतात पाण्याचा थेंबही राहणार नसल्याची शक्यता शेतकऱ्यांनी व्यक्त केली. भात लागवडीची कामे सुरू केली आहेत. मात्र शेतावर जायला रस्ताच नसल्याने ती करता येत नाही. रिलायन्स कंपनीच्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्यांची शेती ओस राहून त्यांच्यावर उपासमारीची वेळ येण्याची भीती निवेदनात शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. आम्ही गरीब शेतकरी असून शेतीशिवाय आमचे उत्पनाचे दुसरे कोणतेही साधन नाही. त्यामुळे आमच्या वर उपासमारीची वेळ येणार असल्याची भीती निवेदनात नमूद केली आहे. आम्हाला न्याय न मिळाल्यास आमरण उपोषणाचा इशारा निवेदनात दिला आहे. त्यावर पांडुरंग पाटील, अशोक घोरकणे, प्रकाश पाटील, अंकुश घोरकणे या शेतक-यांच्या स्वाक्ष-या आहेत. यासंदर्भात रिलायन्स गॅस कंपनीचे अधिकारी बाला सुब्रमण्यम यांच्याशी संपर्क साधला असता एक दोन दिवसात शेतकऱ्यांसाठी रस्ता तयार करून दिला जाईल अशी माहिती त्यांनी दिली.