शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
4
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
5
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
6
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
7
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
8
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
9
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
10
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
11
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
12
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
13
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
14
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
15
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
16
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
17
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
18
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
19
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
20
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
Daily Top 2Weekly Top 5

पापडखिंड धरणाची सुरक्षा धोक्यात, धुणी, भांडी अन् शौचासाठी वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 03:08 IST

वसई विरार महापालिकेच्या मुख्यालयापासून अवघ्या दहा मिनिटांच्या अंतरावर असलेल्या पापडखिंड धरणाची सुरक्षा धोक्यात आली आहे.

शशी करपेवसई : वसई विरार महापालिकेच्या मुख्यालयापासून अवघ्या दहा मिनिटांच्या अंतरावर असलेल्या पापडखिंड धरणाची सुरक्षा धोक्यात आली आहे. याठिकाणी दिवसाढवळ््या कपडे धुणे, गाई-म्हशी धुणे, पोहणे, धार्मिक विधी व निर्माल्य टाकण्याचे प्रकार होत असल्याने धरणातील पाणी दुषित झाले आहे. आता तर महापालिनेच या धरणात छटपूजेसाठी तयारी केली असल्याने संताप व्यक्त करण्यात येतो.विरार शहरात ग्रामपंचायतीच्या काळात पाण्याची सोय व्हावी यासाठी एक एमएलडी क्षमता असलेले पापडखिंड धरण लोकसहभागातून बांधण्यात आले आहे. या धरणातील पाणी विरार पूर्वेकडील काही परिसरात पिण्यासाठी वितरित केले जाते. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून या धरणाच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष झाल्याने धरणातील पाणी दुषित बनत चालले असून सुरक्षाही धोक्यात आली आहे.धरणाचा परिसर झोपडपट्टी आणि चाळींनी व्यापून गेलेला आहे. याठिकाणचे लोक धरणाचा वापर कपडे धुणे, गाई-म्हशी धुणे, आंघोळ करणे, धार्मिक विधी निर्माल्य टाकण्यासाठी करू लागले आहेत. आता तर धरणातील पाण्यात दुचाकी आणि चार चाकी वाहने धुणाºयांची भर पडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे येथील लोक धरणाच्या परिसरात सकाळी लवकर आणि रात्री उशिरा प्रात:विधी करू लागले आहेत. परिणामी धरणातील पाणी दुषित बनले आहे. आणि हेच पाणी महापालिका पिण्यासाठी लोकांना पुरवत आहे. दुसरीकडे, धरणावर सुरक्षा रक्षक नसल्याने मद्यपी आणि गर्दुल्ल्यांनी याठिकाणी आपले बस्तान बसवले आहे. दररोज दारुच्या मोठ्या पार्ट्या होत असल्याने सर्वसामान्यांना त्यांचा उपद्रव होऊ लागला आहे. हे कमी म्हणून की काय बंदी असतानाही धरणाच्या परिसरात खुलेआम ड्रोन कॅमेºयाचा वापर करून शुटींग आणि फोटोग्राफी केली जाताना दिसत आहे. धरणात बुडून अनेक लोकांचे जीव जाऊ लागले आहे. तर अनेक जण आत्महत्येसाठी या धरणाचा वापर करू लागले आहेत. १९ आॅक्टोबरच्या सकाळी धरणात एका इसमाचा मृतदेह तरंगताना आढळून आला. पोलिसांनी सदर इसमाचा दोन दिवसांपूर्वीपासून पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे म्हटले आहे. धरणावर सुरक्षा रक्षकच नसल्याने असे प्रकार घडत असल्याकडे माजी नगरसेवक विलास चोरघे यांनी लक्ष वेधले आहे.दरम्यान, पाणी दुषित होऊ नये याची काळजी घेण्याची जबाबदारी असलेली महापालिका पाणी दुषित होणाºया कार्यक्रमांना प्रोत्साहन देत असल्याचेही आता उजेडात आले आहे. गेल्या दोन-तीन वर्षांपासून धरणात छटपूजा केली जात असल्याने वादंग उठत आहेत. पण, त्याकडे दुर्लक्ष करीत यंदा महापालिकेने धरणाच्या पाण्यात छटपूजा व्हावी यासाठी स्वत: तयारी करू लागली आहे.दरम्यान, पापडखिंड धरणात गुरुवारी एक मृतदेह आढळून आल्यानंतर महापालिकेने या धरणातून पिण्यासाठी केला जाणारा पाणी पुरवठा तूर्तास बंद केला आहे. धरणातील पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. त्याचा अहवाल सकारात्मक आल्यावरच पाणी पुरवठा पुन्हा सुरु करण्यात येणार आहे. तर धरणावर संरक्षणासाठी तीन पाळ््यांमध्ये सहा सुरक्षा रक्षक तैनात केले असतानाही तलावात गैरप्रकार होत असल्याबाबत संताप व्यक्त करण्यात येतो.>वादाची शक्यता...महापालिकेचे सफाई कर्मचारी धरणावर छटपूजेसाठी सफाई करू लागले आहेत. त्यावेळी पाय घसरून कुणी पाण्यात पडू नये यासाठी महापालिकेचे कर्मचारी धरणाच्या आतून पाण्यात उतरण्यासाठी पायºया करू लागले आहेत. त्यामुळे विरारमध्ये नव्या वादाला तोंड फुटणार हे निश्चित मानले जाते.