शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

पापडखिंड धरणाची सुरक्षा धोक्यात, धुणी, भांडी अन् शौचासाठी वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 03:08 IST

वसई विरार महापालिकेच्या मुख्यालयापासून अवघ्या दहा मिनिटांच्या अंतरावर असलेल्या पापडखिंड धरणाची सुरक्षा धोक्यात आली आहे.

शशी करपेवसई : वसई विरार महापालिकेच्या मुख्यालयापासून अवघ्या दहा मिनिटांच्या अंतरावर असलेल्या पापडखिंड धरणाची सुरक्षा धोक्यात आली आहे. याठिकाणी दिवसाढवळ््या कपडे धुणे, गाई-म्हशी धुणे, पोहणे, धार्मिक विधी व निर्माल्य टाकण्याचे प्रकार होत असल्याने धरणातील पाणी दुषित झाले आहे. आता तर महापालिनेच या धरणात छटपूजेसाठी तयारी केली असल्याने संताप व्यक्त करण्यात येतो.विरार शहरात ग्रामपंचायतीच्या काळात पाण्याची सोय व्हावी यासाठी एक एमएलडी क्षमता असलेले पापडखिंड धरण लोकसहभागातून बांधण्यात आले आहे. या धरणातील पाणी विरार पूर्वेकडील काही परिसरात पिण्यासाठी वितरित केले जाते. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून या धरणाच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष झाल्याने धरणातील पाणी दुषित बनत चालले असून सुरक्षाही धोक्यात आली आहे.धरणाचा परिसर झोपडपट्टी आणि चाळींनी व्यापून गेलेला आहे. याठिकाणचे लोक धरणाचा वापर कपडे धुणे, गाई-म्हशी धुणे, आंघोळ करणे, धार्मिक विधी निर्माल्य टाकण्यासाठी करू लागले आहेत. आता तर धरणातील पाण्यात दुचाकी आणि चार चाकी वाहने धुणाºयांची भर पडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे येथील लोक धरणाच्या परिसरात सकाळी लवकर आणि रात्री उशिरा प्रात:विधी करू लागले आहेत. परिणामी धरणातील पाणी दुषित बनले आहे. आणि हेच पाणी महापालिका पिण्यासाठी लोकांना पुरवत आहे. दुसरीकडे, धरणावर सुरक्षा रक्षक नसल्याने मद्यपी आणि गर्दुल्ल्यांनी याठिकाणी आपले बस्तान बसवले आहे. दररोज दारुच्या मोठ्या पार्ट्या होत असल्याने सर्वसामान्यांना त्यांचा उपद्रव होऊ लागला आहे. हे कमी म्हणून की काय बंदी असतानाही धरणाच्या परिसरात खुलेआम ड्रोन कॅमेºयाचा वापर करून शुटींग आणि फोटोग्राफी केली जाताना दिसत आहे. धरणात बुडून अनेक लोकांचे जीव जाऊ लागले आहे. तर अनेक जण आत्महत्येसाठी या धरणाचा वापर करू लागले आहेत. १९ आॅक्टोबरच्या सकाळी धरणात एका इसमाचा मृतदेह तरंगताना आढळून आला. पोलिसांनी सदर इसमाचा दोन दिवसांपूर्वीपासून पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे म्हटले आहे. धरणावर सुरक्षा रक्षकच नसल्याने असे प्रकार घडत असल्याकडे माजी नगरसेवक विलास चोरघे यांनी लक्ष वेधले आहे.दरम्यान, पाणी दुषित होऊ नये याची काळजी घेण्याची जबाबदारी असलेली महापालिका पाणी दुषित होणाºया कार्यक्रमांना प्रोत्साहन देत असल्याचेही आता उजेडात आले आहे. गेल्या दोन-तीन वर्षांपासून धरणात छटपूजा केली जात असल्याने वादंग उठत आहेत. पण, त्याकडे दुर्लक्ष करीत यंदा महापालिकेने धरणाच्या पाण्यात छटपूजा व्हावी यासाठी स्वत: तयारी करू लागली आहे.दरम्यान, पापडखिंड धरणात गुरुवारी एक मृतदेह आढळून आल्यानंतर महापालिकेने या धरणातून पिण्यासाठी केला जाणारा पाणी पुरवठा तूर्तास बंद केला आहे. धरणातील पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. त्याचा अहवाल सकारात्मक आल्यावरच पाणी पुरवठा पुन्हा सुरु करण्यात येणार आहे. तर धरणावर संरक्षणासाठी तीन पाळ््यांमध्ये सहा सुरक्षा रक्षक तैनात केले असतानाही तलावात गैरप्रकार होत असल्याबाबत संताप व्यक्त करण्यात येतो.>वादाची शक्यता...महापालिकेचे सफाई कर्मचारी धरणावर छटपूजेसाठी सफाई करू लागले आहेत. त्यावेळी पाय घसरून कुणी पाण्यात पडू नये यासाठी महापालिकेचे कर्मचारी धरणाच्या आतून पाण्यात उतरण्यासाठी पायºया करू लागले आहेत. त्यामुळे विरारमध्ये नव्या वादाला तोंड फुटणार हे निश्चित मानले जाते.