शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: नागरोटा येथे लष्कराच्या तळावर गोळीबार, १ जवान जखमी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

नायगाव खाडीपुलाच्या कामाला आला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2019 22:36 IST

पाऊस थांबल्याने कामाला सुरुवात; जानेवारी २०२० मध्ये पूल खुला होणार?

वसई : वसई तालुक्यातील नायगाव पूर्वेकडील सोपारा खाडीवरील नवीन पादचारी पुलाच्या उतार मार्गाचे रखडलेले काम लवकरच पूर्ण होण्याची चिन्हे आहेत. पाऊस थांबल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने आता हे काम पुन्हा एकदा सुरू केले आहे. तब्बल पाच वर्षे हे काम रखडले आहे. त्यामुळे येथील स्थानिकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन हे काम पुन्हा सुरू झाले आहे.या नायगाव पुलाचे काम डिसेंबर २०१९ पर्यंत पूर्ण करण्याचा बांधकाम विभागाचा मानस असून नवीन वर्षाच्या सुरुवातीला, जानेवारी २०२० मध्ये हा पूल नागरिकांसाठी खुला करण्यात येणार असल्याचा दावाच सार्वजनिक बांधकाम विभागाने केला आहे.अधिक माहितीनुसार, नायगाव पूर्वेला सोपारा खाडी असून येथील सर्वच नागरिक नायगाव स्टेशनवर जाण्यासाठी या सोपारा खाडीवरील जुन्या लोखंडी पत्री पुलाचा वापर करतात. मात्र हा पूल अतिशय धोकादायक असल्याने नायगाव पूर्वेकडील भागात नागरिकांना ये-जा करण्यासाठी नवीन पादचारी पूल तयार करण्यात येत आहे. येथून दररोज हजारोंच्या संख्येने प्रवासी जातात. मात्र, हा पूलही अर्धवट अवस्थेतच नागरिकांसाठी खुला करण्यात आला आहे. या नवीन पुलाच्या उतार मार्गाचे काम अद्याप अपूर्ण असल्याने पूर्वेस राहणाऱ्या नागरिकांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. हे लक्षात घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाने हे काम युद्धपातळीवर हाती घेतल्याचे चित्र आहे. काम वेळेत पूर्ण झाल्यास नागरिकांचा त्रास निश्चितच वाचणार आहे.४ वर्षात ४ वेळा टेंडर२०१४ ते २०१८ या चार वर्षांच्या काळात या नायगाव पुलासाठी एकूण चार वेळा निविदा (टेंडर) काढण्यात आली. तर या पुलाच्या कामासाठी सा.बां. विभागाकडून ५ कोटी २० लाख रुपये इतका निधी मंजूर करण्यात आला होता. तर अतिरिक्त खर्चाचा भार वसई - विरार महानगरपालिकेने घेतला. पुलाच्या कामासाठी अतिरिक्त खर्च येत असल्याने वसई - विरार मनपाने देखील मदतीचा हात पुढे केला आणि यासाठी पीडब्ल्यूडी विभागाला १ कोटी १ लाख ७४ हजार इतका निधी मंजूर केला.ढिसाळ कारभारामुळे पूल ३ वर्षे रखडला२०१४ मध्ये नवीन पुलाच्या कामाची निविदा काढून त्याला मंजुरी देण्यात आली. त्यानंतर हे काम २०१६ मध्ये पूर्ण होईल, असे सांगण्यात आले होते. मात्र, ठेकेदाराच्या ढिसाळ कारभारामुळे या पुलाचे काम तीन वर्षे उलटूनही पूर्ण होऊ शकलेले नाही.