शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
3
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
4
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
5
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
6
प्रीती झिंटा भाजपमध्ये प्रवेश करणार? अभिनेत्रीने केला खुलासा, म्हणाली- "मला देशाबद्दल प्रेम आहे त्यामुळे..."
7
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
8
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
9
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
10
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
11
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
12
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
13
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
14
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडं षटक, ६ चेंडूत दिल्या ३७ धावा, गोलंदाजाचं नाव ऐकून चकीत व्हाल
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
16
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
17
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
18
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
19
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
20
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण

अर्नाळ्यातील नौका बुडाली, वेळ आणि इंधन वाचवण्यासाठी मोठी जहाजे मासेमारीच्या मार्गात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2017 01:19 IST

मासेमारी नौका जाफराबादपासून बारा तासाच्या अंतरावर खोल समुद्रात एका कार्गो जहाजाने धडक दिल्याने समुद्रात बुडाली. नौकेवर अकरा खलाशी होते. मात्र, एका बोटीने सर्व खलाशांना सुखरुप वाचवले.

शशी करपेवसई : अर्नाळ््यातील याकोबा या मासेमारी नौका जाफराबादपासून बारा तासाच्या अंतरावर खोल समुद्रात एका कार्गो जहाजाने धडक दिल्याने समुद्रात बुडाली. नौकेवर अकरा खलाशी होते. मात्र, एका बोटीने सर्व खलाशांना सुखरुप वाचवले. धडकेमुळे नौकेचे ३५ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.अर्नाळ््यातील जॉन्सन थाटू यांच्या मालकीची याकोबा बोट मासेमारीसाठी खोल समुद्रात गेली आहे. बुधवारी संध्याकाळी चारच्या सुमारास गुजरातमधील जाफराबादपासून बारा तासाच्या अंतरावर एका कार्गो जहाजाने याकोबा बोटीला जोराची धडक दिली. त्यामुळे बोट खोल समुद्रात बुडाली. सुदैवाने त्याठिकाणी जाफराबाद येथील मासेमारी करणाºया बोटीवरील खलाशांनी याकोबा बोटीवरील खलाशांना वाचवून सुखरुपपणे किनाºयावर आणले. मात्र, बोटीला वाचवण्यात यश आले नाही. बोटीला फायबर बॉल बसवण्यात आले असल्याने समुद्रातून तिला बाहेर काढण्यात आले. सरकारने समुद्रात मासेमारी बोटींसाठी परिसर राखून ठेवला आहे. त्या परिसरातून जाण्यास कार्गो आणि मोठ्या जहाजांना बंदी आहे. मात्र, मुंबईकडे येणारी जहाजे वेळ आणि इंधन वाचवण्यासाठी आपला मूळ मार्ग बदलून मासेमारी परिसरातून ये-जा करतात. त्यातूनच अपघात वाढू लागले आहेत. सदरचे प्रकार रात्रीच्याच वेळी होत असल्याने अपघात करणाºया जहाजांना शोधून काढता येत नाही. २००७ साली माठक यांनी आपल्या सहकाºयांच्या मदतीने पाचूबंदर येथील मासेमारी बोटीला धडक देऊन पळालेल्या परदेशी कार्गो जहाजाला शोधून काढले होते. याप्रकरणी ऐलोगेट सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. इंटरपोलच्या मदतीने पोलिसांनी जहाज मालकाला नोटीस बजावली होती. त्यानंतर जहाज कंपनीने समझौता करून नऊ लाख रुपयांची नुकसान भरपाई दिली होती.ठोकर देऊन कार्गाे जहाजे पळून जातात. अपघातग्रस्त मच्छिमार स्वत:चा जीव वाचवण्याचा प्रयत्न करीत असल्याने जहाजांचे क्रमांक त्यांना घेता येत नाहीत. त्यामुळे अशा जहाजांना शोधणे कठीण होते. पण, आता अपघात झाल्यानंतर जहाजे शोधून काढून गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. तसेच मार्ग बदलण्याºया जहाजांवर कारवाई व्हावी यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.मुंबईत येणाºया कार्गो जहाजांनी गेल्या पंधरा वर्षात पाचूबंदर, अर्नाळा आणि उत्तन परिसरातील सुमारे पन्नासहून अधिक मासेमारी बोटींना धडक दिल्याचे प्रकार घडले आहेत. यात अद्यापपर्यंत कोणतीही मनुष्यहानी झालेली नाही. मात्र, प्रत्येक बोटींचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे, अशी माहिती पाचूबंदर मच्छिमार संस्थेचे संचालक दिलीप माठक यांनी दिली. दरम्यान, गुरुवारी संध्याकाळी बोटीला अर्नाळा समुद्रकिनारी आणण्यात आल्याची माहिती मच्छिमारांनी दिली.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार