शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
4
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
6
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
7
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
8
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
9
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
10
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
11
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
12
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
13
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
15
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
16
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
17
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
18
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
19
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
20
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

अर्नाळ्यातील नौका बुडाली, वेळ आणि इंधन वाचवण्यासाठी मोठी जहाजे मासेमारीच्या मार्गात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2017 01:19 IST

मासेमारी नौका जाफराबादपासून बारा तासाच्या अंतरावर खोल समुद्रात एका कार्गो जहाजाने धडक दिल्याने समुद्रात बुडाली. नौकेवर अकरा खलाशी होते. मात्र, एका बोटीने सर्व खलाशांना सुखरुप वाचवले.

शशी करपेवसई : अर्नाळ््यातील याकोबा या मासेमारी नौका जाफराबादपासून बारा तासाच्या अंतरावर खोल समुद्रात एका कार्गो जहाजाने धडक दिल्याने समुद्रात बुडाली. नौकेवर अकरा खलाशी होते. मात्र, एका बोटीने सर्व खलाशांना सुखरुप वाचवले. धडकेमुळे नौकेचे ३५ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.अर्नाळ््यातील जॉन्सन थाटू यांच्या मालकीची याकोबा बोट मासेमारीसाठी खोल समुद्रात गेली आहे. बुधवारी संध्याकाळी चारच्या सुमारास गुजरातमधील जाफराबादपासून बारा तासाच्या अंतरावर एका कार्गो जहाजाने याकोबा बोटीला जोराची धडक दिली. त्यामुळे बोट खोल समुद्रात बुडाली. सुदैवाने त्याठिकाणी जाफराबाद येथील मासेमारी करणाºया बोटीवरील खलाशांनी याकोबा बोटीवरील खलाशांना वाचवून सुखरुपपणे किनाºयावर आणले. मात्र, बोटीला वाचवण्यात यश आले नाही. बोटीला फायबर बॉल बसवण्यात आले असल्याने समुद्रातून तिला बाहेर काढण्यात आले. सरकारने समुद्रात मासेमारी बोटींसाठी परिसर राखून ठेवला आहे. त्या परिसरातून जाण्यास कार्गो आणि मोठ्या जहाजांना बंदी आहे. मात्र, मुंबईकडे येणारी जहाजे वेळ आणि इंधन वाचवण्यासाठी आपला मूळ मार्ग बदलून मासेमारी परिसरातून ये-जा करतात. त्यातूनच अपघात वाढू लागले आहेत. सदरचे प्रकार रात्रीच्याच वेळी होत असल्याने अपघात करणाºया जहाजांना शोधून काढता येत नाही. २००७ साली माठक यांनी आपल्या सहकाºयांच्या मदतीने पाचूबंदर येथील मासेमारी बोटीला धडक देऊन पळालेल्या परदेशी कार्गो जहाजाला शोधून काढले होते. याप्रकरणी ऐलोगेट सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. इंटरपोलच्या मदतीने पोलिसांनी जहाज मालकाला नोटीस बजावली होती. त्यानंतर जहाज कंपनीने समझौता करून नऊ लाख रुपयांची नुकसान भरपाई दिली होती.ठोकर देऊन कार्गाे जहाजे पळून जातात. अपघातग्रस्त मच्छिमार स्वत:चा जीव वाचवण्याचा प्रयत्न करीत असल्याने जहाजांचे क्रमांक त्यांना घेता येत नाहीत. त्यामुळे अशा जहाजांना शोधणे कठीण होते. पण, आता अपघात झाल्यानंतर जहाजे शोधून काढून गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. तसेच मार्ग बदलण्याºया जहाजांवर कारवाई व्हावी यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.मुंबईत येणाºया कार्गो जहाजांनी गेल्या पंधरा वर्षात पाचूबंदर, अर्नाळा आणि उत्तन परिसरातील सुमारे पन्नासहून अधिक मासेमारी बोटींना धडक दिल्याचे प्रकार घडले आहेत. यात अद्यापपर्यंत कोणतीही मनुष्यहानी झालेली नाही. मात्र, प्रत्येक बोटींचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे, अशी माहिती पाचूबंदर मच्छिमार संस्थेचे संचालक दिलीप माठक यांनी दिली. दरम्यान, गुरुवारी संध्याकाळी बोटीला अर्नाळा समुद्रकिनारी आणण्यात आल्याची माहिती मच्छिमारांनी दिली.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार