शहरं
Join us  
Trending Stories
1
"पैसे वाटून निवडणुका होत असतील आयोगाने विचार करावा"; बिहार निकालावर शरद पवारांचे गंभीर भाष्य
2
बिहार निकालानंतर काँग्रेसचा 'एकला चलो रे'चा नारा; मुंबई महापालिका स्वबळावर लढवण्याचे संकेत
3
“भाजपाने आता अमेरिकेत राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवावी अन् टॅरिफचा घोळ संपवावा”: आदित्य ठाकरे
4
SBI चा ग्राहकांना झटका! १ डिसेंबरपासून बंद होणार 'ही' लोकप्रिय सेवा; बँकेच्या कामांवर होणार परिणाम
5
अजित पवारांना न सांगताच राष्ट्रवादीनं लढवली बिहारची निवडणूक; कुणी घेतला इतका मोठा निर्णय?
6
"नौगाम पोलीस ठाण्यात झालेला ब्लास्ट केवळ...! मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता"; काय म्हणाले JK पोलीस?
7
'एका माणसाची किंमत ५ लाख, लाज वाटली पाहिजे', संतप्त नातेवाईकांचा सरकारवर जहाल हल्ला
8
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
9
बिहारमध्ये ऐतिहासिक विजय, भाजपाची आता किती राज्यात सत्ता? मोदी-शाह यांचे पुढील टार्गेट ठरले…
10
IPL 2026 Player Trade Updates : टीम इंडियाच्या 'लाला'सोबत खेळताना दिसणार सचिन तेंडुलकरचा 'लाल'
11
उत्पत्ती एकादशी २०२५: नशिबात जे नाही तेही मिळवायचे असेल तर काय करावे? प्रेमानंद महाराजांनी दिले उत्तर
12
‘नोटा’पेक्षाही कमी, स्वबळाचे तीनतेरा; बिहारमध्ये अजित पवारांच्या १६ उमेदवारांना किती मते?
13
गुंतवणूक करण्यापूर्वी समजून घ्या रेग्युलर आणि डायरेक्ट म्युच्युअल फंडातील फरक, नक्कीच येईल कामी
14
डॉ. शाहीनच्या संपर्कात होते ३० ते ४० डॉक्टर, १ हजाराहून अधिक संशयित; तपासात धक्कादायक खुलासा
15
करिश्मा कपूरच्या मुलीची फी दोन महिन्यांपासून थकली; हायकोर्ट म्हणाले, 'आम्हाला इथे ड्रामा नकोय'
16
Tarot Card: आगामी आठवडा आत्मचिंतनाचा, त्यानंतर गरुडभरारीचा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
17
IPL 2026 Player Trade Updates : जड्डू घाट्यात! संजू ना नफा ना तोटा तत्वावर CSK च्या ताफ्यात
18
"मी कट्टर BJP आहे, त्यामुळे..."; निवेदिता सराफ यांचं वक्तव्य चर्चेत; बिहार निवडणुकीबद्दल काय म्हणाल्या?
19
जप्त केलेली ३५० किलो स्फोटके कशी फुटली? स्टेशन बाहेरच्या 'त्या' कारवर संशय, अवयव ३०० फूटांवर फेकले गेले
20
वाढत्या वायुप्रदूषणाची चिंता; महापालिका पुन्हा अॅक्शन मोडवर, विकासकामांवर 'वॉच', अभियंते, पर्यावरण विभागातील अधिकारी, पोलिस करणार पाहणी
Daily Top 2Weekly Top 5

दमणगंगा जोड प्रकल्पाला विरोध, वावर वांगणी येथे शेतक-यांची विराट सभा, आंदोलन उभारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2017 02:48 IST

केंद्र शासनाच्या माध्यामातून होऊ घातलेल्या दमणगंगा नदी जोड प्रकल्पाला विरोध दर्शविण्यासाठी या प्रकल्पाने बाधित होणारे शेतकरी आणि स्थानिक नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात विरोध होवू लागला आहे.

- हुसेन मेमनजव्हार : केंद्र शासनाच्या माध्यामातून होऊ घातलेल्या दमणगंगा नदी जोड प्रकल्पाला विरोध दर्शविण्यासाठी या प्रकल्पाने बाधित होणारे शेतकरी आणि स्थानिक नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात विरोध होवू लागला आहे. हा हा प्रकल्प जव्हार तालुक्यातील अतिदुर्गम भागात व गुजरात, दादरा नगर हवेली आणि नाशिक जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या वावर वांगणी येथील कारगिल हिल टेकडीजवळ होणार असून त्याचे काम चालू करण्याच्या हालचाली केंद्र शासनाकडून होवू लागल्या आहेत. हा प्रकल्प मोडीत काढण्यासाठी जव्हार तालुक्यातील वावर वांगणी येथे १२ डिसेंबर रोजी झालेल्या सभेला शेतकºयांनी हजारोंच्या संख्यने उपस्थित राहून त्याला तीव्र विरोध दर्शविला आहे.गुजरात, दादरा नगरहवेली या राज्यांच्या सीमेवर महाराष्ट्रातील पालघर जिल्हा जव्हार तालुक्यातील वावर वांगणी येथे होणाºया नदीजोड प्रकल्पाच्या कामांच्या हालचाली होऊ लागल्या असून केंद्र शासनाचे अधिकारी रोजच येवून या परिस्थितीचा आढावा घेवून, कामाची पुढील रुपरेषा तयार करीत आहेत. त्यामुळे या होणा-या नदीजोड प्रकल्पाला विरोध दर्शविण्यासाठी शेतकºयांनी वावर वांगणी येथे मोर्चाचे आयोजन करून भव्य सभा घेण्यात आली. या परिसरातील हजारो शेतकरी आणि नागरीवस्ती विस्थापित होणार असल्यामुळे येथील शेतकºयांनी व नागरिकांनी त्याला प्रचंड उपस्थिती दर्शवून कडाडून विरोध दर्शविला आहे.नदीजोड दमणगंगा प्रकल्प नारपार नद्या, वाघ नदी, लेंडी नदी, दमण गंगा या नद्यांचा जोड प्रकल्प होणार आहे. या प्रकल्पाचे प्रस्तावित काम आता शासनाकडून चालू होण्याचे चिन्ह दिसत आहे. त्यामुळे हा प्रकल्प होवू न देण्याचा निर्धार येथील शेतकºयांनी केला आहे. या प्रकल्पा विरोधात स्थानिक आक्र मक झाले असून, सध्या सर्वेक्षणाचे काम पूर्ण होवून प्रकल्पाचे काम सुरु होण्याचे चिन्ह असून, स्थानिकांना विश्वासात न घेता हे काम सुरु असल्याचा आरोप स्थानिक करीत आहेतपेसा कायदा लागू असलेल्या पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील वावर वांगणी या नदीजोड प्रकल्पामुळे २५ हजार कुटुंबे विस्थापित होणार असून, या प्रकल्पात जव्हार, मोखाडा, त्र्यंबकेश्वर या तालुक्यातील गावे, पाडे या जाणार आहेत. शेकडो कुटुंबे विस्थापित होणार असून, चार लाख लोकांचे पुनर्वसन आणि जगण्याचा प्रश्न उद्भवणार आहे. त्यामुळे हा विरोध दर्शविण्यात आला आहे.नदीजोड प्रकल्पाला विरोध दर्शविण्यासाठी माकपा केंद्रीय कमेटी अध्यक्ष डॉ अशोक ढवळे आणि पालघर जिल्हा जि. प. सदस्य रतन बुधर यांच्या नेतृवाखाली शेतकºयांनी आंदोलन केले.तसेच प.स. सदस्य लक्ष्मण जाधव, यशवंत घाटाळ, सरपंच, ताराबाई शिंदे, उपसरपंच यशवंत बुधर परिसरातील शेतकरी वर्ग, नागरिक उपस्थित होते.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार