शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra ZP Election 2026 Date: मोठी बातमी! राज्यातील १२ जिल्हा परिषदा, १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीची घोषणा, ५ फेब्रुवारीला मतदान
2
‘...ती एक मनपा वगळता २९ पैकी २८ महानगरपालिका महायुती जिंकणार’, चंद्रकांत पाटील यांचा मोठा दावा 
3
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, महापालिका निवडणुकीत नवा वाद; प्रचार संपला तरीही उमेदवारांना...
4
एका दिवसात १ लाख कोटींचा धुराळा! टाटांच्या 'या' कंपनीचा शेअर धडाम; संक्रांतीपूर्वीच गुंतवणूकदारांना 'धक्का'
5
T20 Word Cup: ४ परदेशी खेळाडूंना भारताचा व्हिसा नाकारला; 'पाकिस्तान कनेक्शन' पडले महागात
6
"...तर तेव्हा उपमुख्यमंत्री झाले नसते'; बसवलेला मुख्यमंत्री म्हणत राज ठाकरेंचा फडणवीसांवर निशाणा
7
'काँग्रेसचा वाण नाही, पण गुण लागला' राज ठाकरेंच्या सभेनंतर उदय सामंतांचा टोला!
8
दुपारी जेवणानंतर का येते झोप? सायंटिफीक कारण समजल्यावर तुम्हीही नक्कीच घ्याल 'पॉवर नॅप'
9
तुम्ही संभाजीनगरचे पालक, पण देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मालक; संजय केनेकर शिरसाटांवर संतापले
10
IND vs NZ: विराट-शिखरचा विक्रम धोक्यात! श्रेयस अय्यर वनडे क्रिकेटमध्ये रचणार 'असा' इतिहास
11
२०००% नं वधारला हा स्मॉलकॅप शेअर, ₹54 वर आलाय भाव; आता कंपनी ₹84 कोटींचे भांडवल उभारणार
12
तुमच्या कुटुंबाचे भविष्य करा सुरक्षित! वर्षाला फक्त २० रुपये भरा आणि मिळवा २ लाखांचे कवच
13
मतदानादिवशी ठाकरे बंधूंचे 'भगवा गार्ड' मैदानात उतरणार, दुबार, बोगस मतदारांना पकडणार आणि...
14
Rohit Sharmaची पत्नी रितिकाच्या हातातल्या महागड्या पर्सची रंगली चर्चा, किंमत ऐकून थक्क व्हाल
15
"हेडगेवारांना कारावास झाला होता, पण...", भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील RSS च्या भूमिकेवर ओवेसींनी उपस्थित केला सवाल
16
'या' विमान कंपनीची नवी ऑफर: प्रवाशांना मोठी भेट; मोठ्यांना १,४९९ रुपयांपासून तर मुलांना १ रुपयांत विमान प्रवास
17
Nashik Municipal Election 2026 : उद्धवसेनेची अस्तित्वासाठी लढाई; नावालाच आघाडी, मैत्री मनसेशीच
18
Bornhan: मकर संक्रांत ते रथसप्तमी: बाळाची पहिली संक्रांत? मग 'बोरन्हाण' घालताना 'या' गोष्टी ठेवा लक्षात!
19
Travel : एकटं फिरायचंय? टेन्शन सोडा! सोलो ट्रॅव्हलिंगसाठी 'ही' ५ ठिकाणे आहेत सर्वात बेस्ट
20
"हा साप मला चावलाय, माझ्यावर उपचार करा" सापाला खिशात घालून रिक्षा चालकानं गाठलं रुग्णालय
Daily Top 2Weekly Top 5

दमणगंगा जोड प्रकल्पाला विरोध, वावर वांगणी येथे शेतक-यांची विराट सभा, आंदोलन उभारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2017 02:48 IST

केंद्र शासनाच्या माध्यामातून होऊ घातलेल्या दमणगंगा नदी जोड प्रकल्पाला विरोध दर्शविण्यासाठी या प्रकल्पाने बाधित होणारे शेतकरी आणि स्थानिक नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात विरोध होवू लागला आहे.

- हुसेन मेमनजव्हार : केंद्र शासनाच्या माध्यामातून होऊ घातलेल्या दमणगंगा नदी जोड प्रकल्पाला विरोध दर्शविण्यासाठी या प्रकल्पाने बाधित होणारे शेतकरी आणि स्थानिक नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात विरोध होवू लागला आहे. हा हा प्रकल्प जव्हार तालुक्यातील अतिदुर्गम भागात व गुजरात, दादरा नगर हवेली आणि नाशिक जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या वावर वांगणी येथील कारगिल हिल टेकडीजवळ होणार असून त्याचे काम चालू करण्याच्या हालचाली केंद्र शासनाकडून होवू लागल्या आहेत. हा प्रकल्प मोडीत काढण्यासाठी जव्हार तालुक्यातील वावर वांगणी येथे १२ डिसेंबर रोजी झालेल्या सभेला शेतकºयांनी हजारोंच्या संख्यने उपस्थित राहून त्याला तीव्र विरोध दर्शविला आहे.गुजरात, दादरा नगरहवेली या राज्यांच्या सीमेवर महाराष्ट्रातील पालघर जिल्हा जव्हार तालुक्यातील वावर वांगणी येथे होणाºया नदीजोड प्रकल्पाच्या कामांच्या हालचाली होऊ लागल्या असून केंद्र शासनाचे अधिकारी रोजच येवून या परिस्थितीचा आढावा घेवून, कामाची पुढील रुपरेषा तयार करीत आहेत. त्यामुळे या होणा-या नदीजोड प्रकल्पाला विरोध दर्शविण्यासाठी शेतकºयांनी वावर वांगणी येथे मोर्चाचे आयोजन करून भव्य सभा घेण्यात आली. या परिसरातील हजारो शेतकरी आणि नागरीवस्ती विस्थापित होणार असल्यामुळे येथील शेतकºयांनी व नागरिकांनी त्याला प्रचंड उपस्थिती दर्शवून कडाडून विरोध दर्शविला आहे.नदीजोड दमणगंगा प्रकल्प नारपार नद्या, वाघ नदी, लेंडी नदी, दमण गंगा या नद्यांचा जोड प्रकल्प होणार आहे. या प्रकल्पाचे प्रस्तावित काम आता शासनाकडून चालू होण्याचे चिन्ह दिसत आहे. त्यामुळे हा प्रकल्प होवू न देण्याचा निर्धार येथील शेतकºयांनी केला आहे. या प्रकल्पा विरोधात स्थानिक आक्र मक झाले असून, सध्या सर्वेक्षणाचे काम पूर्ण होवून प्रकल्पाचे काम सुरु होण्याचे चिन्ह असून, स्थानिकांना विश्वासात न घेता हे काम सुरु असल्याचा आरोप स्थानिक करीत आहेतपेसा कायदा लागू असलेल्या पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील वावर वांगणी या नदीजोड प्रकल्पामुळे २५ हजार कुटुंबे विस्थापित होणार असून, या प्रकल्पात जव्हार, मोखाडा, त्र्यंबकेश्वर या तालुक्यातील गावे, पाडे या जाणार आहेत. शेकडो कुटुंबे विस्थापित होणार असून, चार लाख लोकांचे पुनर्वसन आणि जगण्याचा प्रश्न उद्भवणार आहे. त्यामुळे हा विरोध दर्शविण्यात आला आहे.नदीजोड प्रकल्पाला विरोध दर्शविण्यासाठी माकपा केंद्रीय कमेटी अध्यक्ष डॉ अशोक ढवळे आणि पालघर जिल्हा जि. प. सदस्य रतन बुधर यांच्या नेतृवाखाली शेतकºयांनी आंदोलन केले.तसेच प.स. सदस्य लक्ष्मण जाधव, यशवंत घाटाळ, सरपंच, ताराबाई शिंदे, उपसरपंच यशवंत बुधर परिसरातील शेतकरी वर्ग, नागरिक उपस्थित होते.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार