शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
2
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
3
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
4
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
5
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
6
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
7
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
8
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
9
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
10
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
11
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
12
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
13
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
14
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
15
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
16
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
17
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
18
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष
19
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
20
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!

दमणगंगा जोड प्रकल्पाला विरोध, वावर वांगणी येथे शेतक-यांची विराट सभा, आंदोलन उभारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2017 02:48 IST

केंद्र शासनाच्या माध्यामातून होऊ घातलेल्या दमणगंगा नदी जोड प्रकल्पाला विरोध दर्शविण्यासाठी या प्रकल्पाने बाधित होणारे शेतकरी आणि स्थानिक नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात विरोध होवू लागला आहे.

- हुसेन मेमनजव्हार : केंद्र शासनाच्या माध्यामातून होऊ घातलेल्या दमणगंगा नदी जोड प्रकल्पाला विरोध दर्शविण्यासाठी या प्रकल्पाने बाधित होणारे शेतकरी आणि स्थानिक नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात विरोध होवू लागला आहे. हा हा प्रकल्प जव्हार तालुक्यातील अतिदुर्गम भागात व गुजरात, दादरा नगर हवेली आणि नाशिक जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या वावर वांगणी येथील कारगिल हिल टेकडीजवळ होणार असून त्याचे काम चालू करण्याच्या हालचाली केंद्र शासनाकडून होवू लागल्या आहेत. हा प्रकल्प मोडीत काढण्यासाठी जव्हार तालुक्यातील वावर वांगणी येथे १२ डिसेंबर रोजी झालेल्या सभेला शेतकºयांनी हजारोंच्या संख्यने उपस्थित राहून त्याला तीव्र विरोध दर्शविला आहे.गुजरात, दादरा नगरहवेली या राज्यांच्या सीमेवर महाराष्ट्रातील पालघर जिल्हा जव्हार तालुक्यातील वावर वांगणी येथे होणाºया नदीजोड प्रकल्पाच्या कामांच्या हालचाली होऊ लागल्या असून केंद्र शासनाचे अधिकारी रोजच येवून या परिस्थितीचा आढावा घेवून, कामाची पुढील रुपरेषा तयार करीत आहेत. त्यामुळे या होणा-या नदीजोड प्रकल्पाला विरोध दर्शविण्यासाठी शेतकºयांनी वावर वांगणी येथे मोर्चाचे आयोजन करून भव्य सभा घेण्यात आली. या परिसरातील हजारो शेतकरी आणि नागरीवस्ती विस्थापित होणार असल्यामुळे येथील शेतकºयांनी व नागरिकांनी त्याला प्रचंड उपस्थिती दर्शवून कडाडून विरोध दर्शविला आहे.नदीजोड दमणगंगा प्रकल्प नारपार नद्या, वाघ नदी, लेंडी नदी, दमण गंगा या नद्यांचा जोड प्रकल्प होणार आहे. या प्रकल्पाचे प्रस्तावित काम आता शासनाकडून चालू होण्याचे चिन्ह दिसत आहे. त्यामुळे हा प्रकल्प होवू न देण्याचा निर्धार येथील शेतकºयांनी केला आहे. या प्रकल्पा विरोधात स्थानिक आक्र मक झाले असून, सध्या सर्वेक्षणाचे काम पूर्ण होवून प्रकल्पाचे काम सुरु होण्याचे चिन्ह असून, स्थानिकांना विश्वासात न घेता हे काम सुरु असल्याचा आरोप स्थानिक करीत आहेतपेसा कायदा लागू असलेल्या पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील वावर वांगणी या नदीजोड प्रकल्पामुळे २५ हजार कुटुंबे विस्थापित होणार असून, या प्रकल्पात जव्हार, मोखाडा, त्र्यंबकेश्वर या तालुक्यातील गावे, पाडे या जाणार आहेत. शेकडो कुटुंबे विस्थापित होणार असून, चार लाख लोकांचे पुनर्वसन आणि जगण्याचा प्रश्न उद्भवणार आहे. त्यामुळे हा विरोध दर्शविण्यात आला आहे.नदीजोड प्रकल्पाला विरोध दर्शविण्यासाठी माकपा केंद्रीय कमेटी अध्यक्ष डॉ अशोक ढवळे आणि पालघर जिल्हा जि. प. सदस्य रतन बुधर यांच्या नेतृवाखाली शेतकºयांनी आंदोलन केले.तसेच प.स. सदस्य लक्ष्मण जाधव, यशवंत घाटाळ, सरपंच, ताराबाई शिंदे, उपसरपंच यशवंत बुधर परिसरातील शेतकरी वर्ग, नागरिक उपस्थित होते.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार