शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
2
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
3
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
4
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
5
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट
6
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
7
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
8
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
9
४० वर्षीय रणवीरचा २० वर्षीय अभिनेत्रीसोबत रोमान्स; धुरंधरमध्ये झळकलेली सारा अर्जुन कोण?
10
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
11
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
12
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
13
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
14
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
15
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
16
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
17
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
18
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
19
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
20
ऐकवं ते नवलंच! पोलिसात भरती झाला, पण १२ वर्षे ड्युटीवरच गेला नाही; तरीही मिळाली ₹२८ लाख पगार

तीन तासांत एक एकर भातलागवड

By admin | Updated: July 9, 2017 01:08 IST

माळेगाव (ता. भोर) येथे यंत्राद्वारे शेतात एका एकरावर तीन तासांत भाताची लागवड करण्याचा तालुक्यातील पहिलाच प्रयोग यशस्वी झाला आहे. त्यासाठी ६०० रुपये

- लोकमत न्यूज नेटवर्कभोर/नसरापूर : माळेगाव (ता. भोर) येथे यंत्राद्वारे शेतात एका एकरावर तीन तासांत भाताची लागवड करण्याचा तालुक्यातील पहिलाच प्रयोग यशस्वी झाला आहे. त्यासाठी ६०० रुपये खर्च आणि दोन मजुरांची गरज लागते. कमी खर्चात अधिक भातलागवड करण्याचा हा प्रयोग यशस्वी झाल्याचे भोर पंचायत समितीचे उपसभापती लहू शेलार यांनी सांगितले.कृषी विभागाच्या आत्मा योजनेतंर्गत यांत्रीकीकरणाद्वारे भोर तालुक्यात भात लागवडीचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या वेळी तालुका कृषी अधिकारी सुर्यकांत वडखेलकर, उपसभापती लहू शेलार, मंडल कृषी अधिकारी हनुमंत खाडे, मुकुंद ढावरे, भारत कांबळे, सुनील वाळुंज, नारायण पांगारकर, नथुराम गायकवाड, हरिभाऊ शेलार, संभाजी मांजरे व शेतकरी उपस्थित होते.भोर तालुक्यातील प्रमुख पिक भात असून सुमारे ७५०० हेक्टरवर भाताची लागवड केली जाते. आत्तापर्यंत शेतकरी पारंपरिक पद्धतीने शेती करीत होता. त्याला मजूरही मिळत नव्हते आणि खर्चही अधिक प्रमाणात येत होता. वेळही जास्त लागत होता. मात्र, कृषी विभागाच्या आत्मा योजनेतंर्गत तालुक्यात प्रथमच यांत्रिक पद्धतीने भाताची लागवड उपसभापती लहु शेलार यांच्या माळेगाव येथील शेतात प्रथमच करण्यात आली.सुमारे एका एकराला तीन तासात भाताची लागवड झाली असून त्यासाठी दोन मजुर आणि यंत्राला तासाला दोन लिटर डिझेल असा एकूण ६०० रुपये खर्च आला आहे. यापूर्वी एक एकरावर भात लागवडीसाठी ४ हजार रूपये खर्च येत होता. तर २५ ते ३० किलो बियाणे (धांन्य) लागत होते. मात्र गादी वाफ्यावर पेरणी केल्यास फक्त १८ किलोच बियाणे लागते. शिवाय दोनच मजूर लागतात. मजुरीच्या पैशाची बचत होत असल्याने यांत्रिक पध्दतीनेच भात लागवड करावी असे आवाहन शेलार यांनी केले आहे.इंधन खर्चावर यंत्र कृषी विभागाच्या यांत्रिकीकरण योजनेतून हातवे खुर्द येथील शेतकरी नितीन रसाळ यांनी ५० टक्के अनुदानावर भात लागवडीचे यंत्र खरेदी केले आहे. या वर्षी भात लागवडीसाठी इंधन खर्चावरच शेतकऱ्यांना हे यंत्र उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्यामुळे शेतकरी खूष आहेत.तालुक्यातील माळेगाव येथे यांत्रिक भात लागवडीचा पहिलाच प्रयोग यशस्वी झाला असून तांभाड, हातवे, आळंदे व नाटंबी येथेही भात लागवड केली जाणार आहे. शेतकऱ्यांनी पारंपरिक पध्दतीऐवजी यांत्रिक पद्धतीचा वापर करून शेती केल्यास बियाणे कमी लागत असून वेळेची आणि पैशाची बचत होणार आहे.- सूर्यकांत वडखेलकर, तालुका कृषी अधिकारी