शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
3
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
4
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
5
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
6
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
7
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
8
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
9
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
11
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
12
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
13
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
14
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
15
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
16
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
17
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
18
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
19
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
20
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
Daily Top 2Weekly Top 5

तीन तासांत एक एकर भातलागवड

By admin | Updated: July 9, 2017 01:08 IST

माळेगाव (ता. भोर) येथे यंत्राद्वारे शेतात एका एकरावर तीन तासांत भाताची लागवड करण्याचा तालुक्यातील पहिलाच प्रयोग यशस्वी झाला आहे. त्यासाठी ६०० रुपये

- लोकमत न्यूज नेटवर्कभोर/नसरापूर : माळेगाव (ता. भोर) येथे यंत्राद्वारे शेतात एका एकरावर तीन तासांत भाताची लागवड करण्याचा तालुक्यातील पहिलाच प्रयोग यशस्वी झाला आहे. त्यासाठी ६०० रुपये खर्च आणि दोन मजुरांची गरज लागते. कमी खर्चात अधिक भातलागवड करण्याचा हा प्रयोग यशस्वी झाल्याचे भोर पंचायत समितीचे उपसभापती लहू शेलार यांनी सांगितले.कृषी विभागाच्या आत्मा योजनेतंर्गत यांत्रीकीकरणाद्वारे भोर तालुक्यात भात लागवडीचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या वेळी तालुका कृषी अधिकारी सुर्यकांत वडखेलकर, उपसभापती लहू शेलार, मंडल कृषी अधिकारी हनुमंत खाडे, मुकुंद ढावरे, भारत कांबळे, सुनील वाळुंज, नारायण पांगारकर, नथुराम गायकवाड, हरिभाऊ शेलार, संभाजी मांजरे व शेतकरी उपस्थित होते.भोर तालुक्यातील प्रमुख पिक भात असून सुमारे ७५०० हेक्टरवर भाताची लागवड केली जाते. आत्तापर्यंत शेतकरी पारंपरिक पद्धतीने शेती करीत होता. त्याला मजूरही मिळत नव्हते आणि खर्चही अधिक प्रमाणात येत होता. वेळही जास्त लागत होता. मात्र, कृषी विभागाच्या आत्मा योजनेतंर्गत तालुक्यात प्रथमच यांत्रिक पद्धतीने भाताची लागवड उपसभापती लहु शेलार यांच्या माळेगाव येथील शेतात प्रथमच करण्यात आली.सुमारे एका एकराला तीन तासात भाताची लागवड झाली असून त्यासाठी दोन मजुर आणि यंत्राला तासाला दोन लिटर डिझेल असा एकूण ६०० रुपये खर्च आला आहे. यापूर्वी एक एकरावर भात लागवडीसाठी ४ हजार रूपये खर्च येत होता. तर २५ ते ३० किलो बियाणे (धांन्य) लागत होते. मात्र गादी वाफ्यावर पेरणी केल्यास फक्त १८ किलोच बियाणे लागते. शिवाय दोनच मजूर लागतात. मजुरीच्या पैशाची बचत होत असल्याने यांत्रिक पध्दतीनेच भात लागवड करावी असे आवाहन शेलार यांनी केले आहे.इंधन खर्चावर यंत्र कृषी विभागाच्या यांत्रिकीकरण योजनेतून हातवे खुर्द येथील शेतकरी नितीन रसाळ यांनी ५० टक्के अनुदानावर भात लागवडीचे यंत्र खरेदी केले आहे. या वर्षी भात लागवडीसाठी इंधन खर्चावरच शेतकऱ्यांना हे यंत्र उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्यामुळे शेतकरी खूष आहेत.तालुक्यातील माळेगाव येथे यांत्रिक भात लागवडीचा पहिलाच प्रयोग यशस्वी झाला असून तांभाड, हातवे, आळंदे व नाटंबी येथेही भात लागवड केली जाणार आहे. शेतकऱ्यांनी पारंपरिक पध्दतीऐवजी यांत्रिक पद्धतीचा वापर करून शेती केल्यास बियाणे कमी लागत असून वेळेची आणि पैशाची बचत होणार आहे.- सूर्यकांत वडखेलकर, तालुका कृषी अधिकारी