शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil: हत्येच्या कटावरुन मनोज जरांगेंचा थेट धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप, '२.५ कोटींची डील आणि...'
2
'इंग्रजांची साथ; 52 वर्षे तिरंगा फडकवला नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपा-RSS वर गंभीर आरोप
3
कच्च्या तेलाच्या दरात मोठी वाढ होणार! पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर ठेवण्यासाठी सरकारचा मास्टरप्लॅन
4
Axar Patel: विराट कोहली, ख्रिस गेलनंतर फक्त अक्षर पटेलच करू शकला 'अशी' कामगिरी!
5
Wife सोबत मिळून Post Office च्या या स्कीममध्ये ₹४ लाख जमा करा, पाहा महिन्याला किती मिळेल व्याज?
6
अजित पवारांचा घूमजाव, आधी म्हणाले कल्पना होती, आता म्हणतात, "पार्थच्या जमीन व्यवहाराची माहिती नाही"
7
‘तू बघत राहा, मी खोलीत गुदमरून मरेन’, पत्नीला  मेसेज पाठवून पतीने दरवाजा केला बंद, त्यानंतर...
8
महामार्गांवरून भटक्या कुत्र्यांना हटवा, त्यांचे लसीकरण आणि नसबंदी करून...; सर्वोच्च न्यायालयाचे तीन आदेश
9
Larissa Nery : "मी राहुल गांधींना ओळखत नाही, भारतात..."; ब्राझिलियन महिलेला वाटली भीती, केला मोठा खुलासा
10
दुकानातून हळूहळू कमी होत होता दारूचा स्टॉक; कपल करत होतं भरलेल्या बाटल्यांची चोरी! कसं पकडलं?
11
२५ लाख ते ६० लाख... गृहकर्जावर महिन्याचा खर्च किती? तुमचा EMI कमी करण्यासाठी 'हा' कालावधी निवडा
12
मारुतीने व्हिक्टोरिस लाँच केली अन् या कारवर बंपर सूट दिली; ऑक्टोबरपेक्षा आणखी ५४,००० रुपयांनी स्वस्त केली...
13
पहिल्याच दिवशी जमिनीवर आला 'हा' आयपीओ; गुंतवणूकदारांना मोठं नुकसान, GMP नं केला 'विश्वासघात'
14
Jasprit Bumrah Record : बुमराहचा मोठा पराक्रम! पाकिस्तानी गोलंदाजाला धोबीपछाड देत बनला 'नंबर वन'
15
Astro Tips: काही जातकांच्या पत्रिकेत विवाह योगच नसतो; त्यांनी कोणता उपाय करावा? पाहू 
16
२०२६ हे पाकिस्तानसाठी 'प्रलयाचे वर्ष'? ज्योतिषांचा धक्कादायक अंदाज; भारतासोबत मोठ्या युद्धाचे संकेत...
17
शनिवारी संकष्ट चतुर्थी, ३ राशींना साडेसाती; ‘हे’ ५ उपाय नक्की करा, शनिदोषातून मुक्तता मिळवा!
18
Video - बॅकबेंचर ते चार्टर्ड अकाउंटंट... लेक CA होताच बापाने मारली घट्ट मिठी, डोळ्यांत आनंदाश्रू
19
पाकिस्तानने शस्त्रसंधी मोडली, अफगाणिस्तानवर हल्ला; चिडलेले तालिबान म्हणतेय, 'आता तुम्हाला तोडणार'
20
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल

विरार कार्यालयात टेस्ट ट्रॅक अभावी जुन्या वाहनांचे पासिंग बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2018 02:58 IST

पालघर जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या प्रवासी व मालवाहतूक करणाऱ्या जुन्या वाहनांची पासिंग विरार आर्.टी.ओ. कार्यालयात टेस्ट ट्रॅक नसल्याने बंद करण्यात आलेली असून त्यासाठी त्यांना ५० किमीवर असलेल्या कल्याण येथील कार्यालयात पाठविले जात आहे.

वसई : पालघर जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या प्रवासी व मालवाहतूक करणाऱ्या जुन्या वाहनांची पासिंग विरार आर्.टी.ओ. कार्यालयात टेस्ट ट्रॅक नसल्याने बंद करण्यात आलेली असून त्यासाठी त्यांना ५० किमीवर असलेल्या कल्याण येथील कार्यालयात पाठविले जात आहे.या संदर्भात राज्य सरकारने त्वरीत लक्ष घालून जुन्या वाहन चालकांना दिलासा द्यावा असे निवेदन महाराष्ट्र शिव वाहतूक सेनेचे पालघर जिल्हाध्यक्ष विनायक निकम आणि त्यांच्या शिष्टमंडळाने उप- प्रादेशिक अधिकारी अनिल पाटील यांना दिले आहे.हा प्रश्न त्वरीत मार्गी लागला नाही, तर पालघर जिल्ह्यातील सर्व वाहनचालक तीव्र आंदोलन छेडतील, असा इशारा हि निकम यांच्या वतीने आर.टी.ओ ला नुकताच देण्यात आला.पासिंगसाठी कल्याण गाठावे लागत असल्याने जिल्हावासियांच्या वेळ, पैसा याचा अपव्यय हो असून त्यांना मानसिक आणि शारीरिक त्रासही होत असून त्यांची मोठी दमछाक होते आहे.आधीच कल्याण हे शहर वसई सारखेच मोठ्या महापालिकेचे शहर असल्याने याठिकाणी सुद्धा हजारो वाहने पासींग करण्यासाठी गर्दी करत असतात, त्यामुळे एकदा त्याठिकाणी गेल्यावर साधारण पंधरा ते वीस दिवसां नंतरची तारीख मिळते. परिणामी वाहनचालकास एका खेपेच्या कामासाठी तब्बल दोन ते तीन वेळा हेलपाटे मारावे लागतात.कल्याण येथे वाहने पासींग करण्यासाठी आठवडयातून एकच रविवारचा दिवस मिळत असल्यामुळे वाहनांची पासिंग वेळीच होऊ शकत नाही. आणि ती वेळीच झाली नाही तर अशी वाहने रस्त्यावर येऊ शकत नाहीत. त्यामुळे त्यांचा व्यवसाय बंद ठेवावा लागतो.वाहनांच्या दैनंदिन धंद्यावर या टेस्ट ट्रॅक बंदचा परिणाम होत असून वाहनचालक स्वत:च्या गाडीच्या कर्जाचा हप्ता ही वेळेवर भरू शकत नाही, त्यामुळे त्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. दुहेरी कात्रीत सापडलेल्या वाहन चालकाने गाडी रस्त्यावर आणल्यास अपघात झाल्यास कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई अथवा विमा त्यास मिळू शकणार नाही.त्यामुळे या समस्येस नेमके जबाबदार कोण? असा सवालच चालकांनी विचारला आहे.भूखंडाच्या मालकीचामुद्दा न्यायप्रविष्टपालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यात आर्.टी.ओ. कार्यालयासाठी गवराईपाडा, गोखिवरे पूर्व येथे राज्यशासनाने भूखंड दिलेला आहे. परंतु आज ही ह्या जागेच्या मालकीचा विषय न्यायप्रविष्ट आहे. अशा परिस्थीतीत पालघर जिल्ह्यातील वाहन चालकां वरती या समस्येची कुºहाड किती दिवस टांगती राहणार आहे. असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याचे उत्तर मात्र आरटीओकडे नाही.आरटीओ अनिल पाटीलांची चलाखी(या मोबाईल क्रमांकावर इनकमिंग कॉल्स ची सुविधा उपलब्ध नाही .)वसईतील विविध माध्यमाच्या पत्रकारांकडून विरार आर.टी.ओ संदर्भात प्रतिक्रि या विचारण्यासाठी काही वेळा मोबाईलवर फोन केले जातात. मात्र आता विरार आर टीओ अनिल पाटील यांनी आपला मोबाईल हा केवळ आऊटगोर्इंग मध्ये ठेवला असून फक्त पत्रकारांचे येणारे फोन हे बंद केलेल्या इनकमिंग मोडमध्ये ठेवले आहेत.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार