शहरं
Join us  
Trending Stories
1
Pooja Khedkar Mother: ट्रकचालकाचे अपहरण करणारे पूजा खेडकरचे आई वडील फरार; गेटवरून उड्या मारून पोलीस पोहोचले घरात
2
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसा; चुराचांदपूरमध्ये कुकी नेत्यांची घरं जाळली! दोनच दिवसांपूर्वी मोदींनी केला होता दौरा
3
सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचा भाव
4
होय... ५० हजारांच्या पगारात २ कोटींचा फंड शक्य आहे! फोलो करा ५०-३०-१०-१० चा गुंतवणूक फॉर्म्युला
5
Urban Company IPO तुम्हाला लागलाय का, कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस?
6
“भारत-पाकिस्तान सामना फिक्स होता; PCB ला 1000 कोटी मिळाले’’, संजय राऊतांचा गंभीर आरोप
7
भय इथले संपत नाही! मंकीपॉक्सनंतर नव्या व्हायरसचं संकट; 'ही' आहेत लक्षणं, 'या' लोकांना धोका
8
7 वर्षांच्या वॉरंटीसह Royal Enfield ने लॉन्च केली नवीन Meteor 350; GST कपातीनंतर किंमत फक्त...
9
चीनचं शटर होऊ लागलंय बंद! सरकारनं वाजवली धोक्याची घंटा; नक्की काय आहे प्रकरण, जाणून घ्या
10
भारताविरुद्ध पाकिस्तानला दिली साथ, आता 'या' देशावर भीतीचं सावट; इस्रायली हल्ल्याची सतावतेय भीती
11
राहुची महादशा, अशुभच घडतेय? ‘हे’ ८ उपाय करून तर पाहा, शुभ-लाभ; दोषमुक्ती, भरपूर भरभराट!
12
निष्पाप सान्वीचा जीव गेला; शाळांचा सुरक्षेपेक्षा 'प्रॉफिट'वर डोळा, कंत्राटदाराच्या कामामुळे दोघे जिवाला मुकले
13
एकमेकांसोबत आयुष्य जगण्याचं स्वप्न अधुरेच राहिले; नाशिकमध्ये प्रेमीयुगुलाने 'हावडा' एक्स्प्रेसवर मारल्या उड्या
14
बाथरुममधील बादली खूपच खराब झालीय? एकही रुपया खर्च न करता 'अशी' दिसेल नव्यासारखी
15
कतरिना कैफ प्रेग्नंट, 'या' महिन्यात देणार बाळाला जन्म; विकी कौशल लवकरच होणार बाबा
16
ITR Filing मध्ये Gen Z नं बनवला नवा विक्रम; शेअर बाजारातील गुंतवणूक बनली कमाईचं नवं साधन
17
शेअर आहे की तुफान! ५ वर्षात तब्बल ६६,००० टक्के नफा! आज पुन्हा ९ टक्के वाढ; किंमत २५ पेक्षाही कमी
18
डिझेलवाले सुटले...? नाही, पेट्रोलसारखेच इथेनॉल मिसळायचे होते, पण...; नितीन गडकरींच्या मनात चाललेय तरी काय...
19
"तू जाताच पूजा यायची अन् पूर्ण दिवस आम्ही..."; नंदिनी हत्याकांडात ऑडिओ क्लीपनं नवा ट्विस्ट
20
चांगली भूमिका, चांगल्या सिनेमाचं आमिष, अभिनेत्रीवर बलात्कार, प्रसिद्ध अभिनेता अटकेत

विरार कार्यालयात टेस्ट ट्रॅक अभावी जुन्या वाहनांचे पासिंग बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2018 02:58 IST

पालघर जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या प्रवासी व मालवाहतूक करणाऱ्या जुन्या वाहनांची पासिंग विरार आर्.टी.ओ. कार्यालयात टेस्ट ट्रॅक नसल्याने बंद करण्यात आलेली असून त्यासाठी त्यांना ५० किमीवर असलेल्या कल्याण येथील कार्यालयात पाठविले जात आहे.

वसई : पालघर जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या प्रवासी व मालवाहतूक करणाऱ्या जुन्या वाहनांची पासिंग विरार आर्.टी.ओ. कार्यालयात टेस्ट ट्रॅक नसल्याने बंद करण्यात आलेली असून त्यासाठी त्यांना ५० किमीवर असलेल्या कल्याण येथील कार्यालयात पाठविले जात आहे.या संदर्भात राज्य सरकारने त्वरीत लक्ष घालून जुन्या वाहन चालकांना दिलासा द्यावा असे निवेदन महाराष्ट्र शिव वाहतूक सेनेचे पालघर जिल्हाध्यक्ष विनायक निकम आणि त्यांच्या शिष्टमंडळाने उप- प्रादेशिक अधिकारी अनिल पाटील यांना दिले आहे.हा प्रश्न त्वरीत मार्गी लागला नाही, तर पालघर जिल्ह्यातील सर्व वाहनचालक तीव्र आंदोलन छेडतील, असा इशारा हि निकम यांच्या वतीने आर.टी.ओ ला नुकताच देण्यात आला.पासिंगसाठी कल्याण गाठावे लागत असल्याने जिल्हावासियांच्या वेळ, पैसा याचा अपव्यय हो असून त्यांना मानसिक आणि शारीरिक त्रासही होत असून त्यांची मोठी दमछाक होते आहे.आधीच कल्याण हे शहर वसई सारखेच मोठ्या महापालिकेचे शहर असल्याने याठिकाणी सुद्धा हजारो वाहने पासींग करण्यासाठी गर्दी करत असतात, त्यामुळे एकदा त्याठिकाणी गेल्यावर साधारण पंधरा ते वीस दिवसां नंतरची तारीख मिळते. परिणामी वाहनचालकास एका खेपेच्या कामासाठी तब्बल दोन ते तीन वेळा हेलपाटे मारावे लागतात.कल्याण येथे वाहने पासींग करण्यासाठी आठवडयातून एकच रविवारचा दिवस मिळत असल्यामुळे वाहनांची पासिंग वेळीच होऊ शकत नाही. आणि ती वेळीच झाली नाही तर अशी वाहने रस्त्यावर येऊ शकत नाहीत. त्यामुळे त्यांचा व्यवसाय बंद ठेवावा लागतो.वाहनांच्या दैनंदिन धंद्यावर या टेस्ट ट्रॅक बंदचा परिणाम होत असून वाहनचालक स्वत:च्या गाडीच्या कर्जाचा हप्ता ही वेळेवर भरू शकत नाही, त्यामुळे त्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. दुहेरी कात्रीत सापडलेल्या वाहन चालकाने गाडी रस्त्यावर आणल्यास अपघात झाल्यास कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई अथवा विमा त्यास मिळू शकणार नाही.त्यामुळे या समस्येस नेमके जबाबदार कोण? असा सवालच चालकांनी विचारला आहे.भूखंडाच्या मालकीचामुद्दा न्यायप्रविष्टपालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यात आर्.टी.ओ. कार्यालयासाठी गवराईपाडा, गोखिवरे पूर्व येथे राज्यशासनाने भूखंड दिलेला आहे. परंतु आज ही ह्या जागेच्या मालकीचा विषय न्यायप्रविष्ट आहे. अशा परिस्थीतीत पालघर जिल्ह्यातील वाहन चालकां वरती या समस्येची कुºहाड किती दिवस टांगती राहणार आहे. असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याचे उत्तर मात्र आरटीओकडे नाही.आरटीओ अनिल पाटीलांची चलाखी(या मोबाईल क्रमांकावर इनकमिंग कॉल्स ची सुविधा उपलब्ध नाही .)वसईतील विविध माध्यमाच्या पत्रकारांकडून विरार आर.टी.ओ संदर्भात प्रतिक्रि या विचारण्यासाठी काही वेळा मोबाईलवर फोन केले जातात. मात्र आता विरार आर टीओ अनिल पाटील यांनी आपला मोबाईल हा केवळ आऊटगोर्इंग मध्ये ठेवला असून फक्त पत्रकारांचे येणारे फोन हे बंद केलेल्या इनकमिंग मोडमध्ये ठेवले आहेत.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार