शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
6
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
7
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
8
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
10
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
11
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
12
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
14
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
15
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
16
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
17
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
18
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
19
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
20
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...

डांबरयुक्त तवंगाने मासेमारी व्यवसायावर परिणाम, किनारा काळवंडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2019 00:14 IST

किनारी भागात काळपट रंगाचा डांबराचा तवंग पसरल्याने किनारा विद्रुपीकरणासह मासेमारीवर त्याचा परिणाम होतो आहे.

- अनिरु द्ध पाटीलडहाणू/बोर्डी - तालुक्यातील किनारी भागात काळपट रंगाचा डांबराचा तवंग पसरल्याने किनारा विद्रुपीकरणासह मासेमारीवर त्याचा परिणाम होतो आहे. दरम्यान, वाढत्या समुद्री प्रदूषणाचा मच्छिमार, व्यवसायिक आणि ग्राहक या साखळीला फटका बसत आहे तर पर्यटन व्यवसायावरही त्याचा परिणाम जाणवत आहे.१ जून ते ३१ जुलै ही शासकीय मासेमारी बंदी नुकतीच उठली आहे. शिवाय आॅगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मुसळधार पाऊस आणि जोराच्या वाऱ्यामुळे मच्छीमारी नौका समुद्रात गेल्या नाहीत. तर किनाºयालगत पारंपरिक मासेमारीला प्राधान्य देण्यात येत आहे. मात्र लाटांसह काळपट रंगाचा डांबराचा तवंग किनारा आणि काही नॉटिकल क्षेत्रात पसरल्याने मासेमारी जाळी प्रभावित होऊन मासे गावण्याची संख्या घटल्याचे मच्छीमारांचे म्हणणे आहे. तर त्वचेला या तवंगाचा स्पर्श होऊन दुष्परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे.पूर्वीही या काळात हा तवंग पाण्यावर पसरायचा मात्र त्याचे प्रमाण कमी होते. मात्र, गेल्या काही वर्षांपासून प्रदूषणामुळे त्यात वाढ झाली असून माशांची संख्याही घटल्याने किनाºयालगत मासेमारी करणाऱ्यांना त्याच्या झळा बसत आहेत. तर काहीवेळा माशांना तेलकट वास येत असल्याचे दिसून येते. त्यामुळे मच्छीमार, मासे विक्री करणारे व्यावसायिक आणि खवय्ये या साखळीवर त्याचा परिणाम होत आहे. यामुळे औद्योगिक कारखान्यातील फिल्टर न केलेले रसायनयुक्त पाणी, प्लास्टिक पॉलिथिनचा कचरा समुद्रात टाकण्याविरुद्ध नियमांची कठोर अंमलबजावणीची आवश्यकता आहे. तर पाण्यातील दूषित घटकांचे प्रमाण कमी करून समुद्री पर्यावरणाला पोषक वातावरण निर्माण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाºया कांदळवनाचे क्षेत्र किनारी भागात वाढविणे अत्यावश्यक आहे.काळपट तवंग मासेमारी साहित्य आणि मच्छिमारांच्या शरीराला लागल्याने नुकसान होते. किनारा विद्रुपीकरणामुळे पर्यटक चौपाट्यांकडे पाठ फिरवत असून व्यवसायावर परिणाम होतो. पाण्यातील रसायनयुक्त प्रमाण वाढत राहिल्यास समुद्री पर्यावरण धोक्यात येण्याची शक्यता तज्ञांकडून व्यक्त होत आहे.औद्योगिकरणामुळे समुद्र प्रदूषित झाल्याने हे थांबले पाहिजे. जीवसृष्टीला वाचवण्यासाठी तत्काळ पाऊल उचलणे गरजेचे आहे.- अ‍ॅड. गिरीश राऊत, पर्यावरणतज्ज्ञ

टॅग्स :Vasai Virarवसई विरार