शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

डांबरयुक्त तवंगाने मासेमारी व्यवसायावर परिणाम, किनारा काळवंडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2019 00:14 IST

किनारी भागात काळपट रंगाचा डांबराचा तवंग पसरल्याने किनारा विद्रुपीकरणासह मासेमारीवर त्याचा परिणाम होतो आहे.

- अनिरु द्ध पाटीलडहाणू/बोर्डी - तालुक्यातील किनारी भागात काळपट रंगाचा डांबराचा तवंग पसरल्याने किनारा विद्रुपीकरणासह मासेमारीवर त्याचा परिणाम होतो आहे. दरम्यान, वाढत्या समुद्री प्रदूषणाचा मच्छिमार, व्यवसायिक आणि ग्राहक या साखळीला फटका बसत आहे तर पर्यटन व्यवसायावरही त्याचा परिणाम जाणवत आहे.१ जून ते ३१ जुलै ही शासकीय मासेमारी बंदी नुकतीच उठली आहे. शिवाय आॅगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मुसळधार पाऊस आणि जोराच्या वाऱ्यामुळे मच्छीमारी नौका समुद्रात गेल्या नाहीत. तर किनाºयालगत पारंपरिक मासेमारीला प्राधान्य देण्यात येत आहे. मात्र लाटांसह काळपट रंगाचा डांबराचा तवंग किनारा आणि काही नॉटिकल क्षेत्रात पसरल्याने मासेमारी जाळी प्रभावित होऊन मासे गावण्याची संख्या घटल्याचे मच्छीमारांचे म्हणणे आहे. तर त्वचेला या तवंगाचा स्पर्श होऊन दुष्परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे.पूर्वीही या काळात हा तवंग पाण्यावर पसरायचा मात्र त्याचे प्रमाण कमी होते. मात्र, गेल्या काही वर्षांपासून प्रदूषणामुळे त्यात वाढ झाली असून माशांची संख्याही घटल्याने किनाºयालगत मासेमारी करणाऱ्यांना त्याच्या झळा बसत आहेत. तर काहीवेळा माशांना तेलकट वास येत असल्याचे दिसून येते. त्यामुळे मच्छीमार, मासे विक्री करणारे व्यावसायिक आणि खवय्ये या साखळीवर त्याचा परिणाम होत आहे. यामुळे औद्योगिक कारखान्यातील फिल्टर न केलेले रसायनयुक्त पाणी, प्लास्टिक पॉलिथिनचा कचरा समुद्रात टाकण्याविरुद्ध नियमांची कठोर अंमलबजावणीची आवश्यकता आहे. तर पाण्यातील दूषित घटकांचे प्रमाण कमी करून समुद्री पर्यावरणाला पोषक वातावरण निर्माण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाºया कांदळवनाचे क्षेत्र किनारी भागात वाढविणे अत्यावश्यक आहे.काळपट तवंग मासेमारी साहित्य आणि मच्छिमारांच्या शरीराला लागल्याने नुकसान होते. किनारा विद्रुपीकरणामुळे पर्यटक चौपाट्यांकडे पाठ फिरवत असून व्यवसायावर परिणाम होतो. पाण्यातील रसायनयुक्त प्रमाण वाढत राहिल्यास समुद्री पर्यावरण धोक्यात येण्याची शक्यता तज्ञांकडून व्यक्त होत आहे.औद्योगिकरणामुळे समुद्र प्रदूषित झाल्याने हे थांबले पाहिजे. जीवसृष्टीला वाचवण्यासाठी तत्काळ पाऊल उचलणे गरजेचे आहे.- अ‍ॅड. गिरीश राऊत, पर्यावरणतज्ज्ञ

टॅग्स :Vasai Virarवसई विरार