शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

विरारच्या पापडखिंड धरणात तेलाचे तवंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2018 06:09 IST

हजारो दिवे कारणीभूत : दूषित पाण्यामुळे आरोग्यसमस्या

वसई : येथील पापडखिंड धरणात पालिकेचा विरोध असतानाही करण्यात आलेल्या छटपूजेमुळे येथील पाणी दूषित झाले आहे. तेलाचे हजारो दिवे पाण्यात सोडण्यात आल्याने धरणाच्या पाण्यावर तेलाचा तवंग पसरला आहे. या धरणातून नागरिकांना पाणीपुरवठा केला जात असल्याने आता आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

शहरात मंगळवारी छटपूजा करण्यात आली. मात्र फूलपाडा येथील पापडखिंड धरणात हजारो नागरिकांनी उतरून छटपूजा केली. यावेळी तेलाचे दिवे, निर्माल्य धरणाच्या पाण्यात सोडण्यात आले. यामुळे पाणी दूषित झाले. बुधवारी धरणाच्या पाण्यावर तेलाचे तवंग साचल्याचे आढळून आले. छटपूजेमुळे धरण परिसरात कचऱ्याचे साम्राज्य पसरले होते. पूजेनिमित्त आणलेले साहित्य, निर्माल्याचा कचरा जागोजागी पडलेला होता. बुधवारी महापालिकेने धरण परिसराची स्वच्छता मोहीम हाती घेतली. महापालिकेने धरणातील पाणी पिण्याच्या वापरासाठी बंद केल्याचे जाहीर केले होते. मात्र प्रत्यक्ष हे पाणी अजूनही नागरिकांना पिण्यासाठी दिले जात असल्याचे उघड झाले आहे. पाणी दूषीत झाल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.तालुक्यातील अनेक तलावांत छटपूजाच्जुचंद्र येथील गोडे तलावातही छटपूजा करण्यात आल्याने या तलावाचे पाणी प्रदूषित झाले आहे. नायगाव पूर्व भागातील परप्रांतीयांची लोकसंख्या वाढत आहे. मंगळवारी रात्री व बुधवारी पहाटे हजारोंच्या संख्येने उत्तर भारतीय नागरिकांनी येथील जुचंद्र गोडे तलावाला घेराव घालून रात्री उशिरापर्यंत फटाक्यांची आतषबाजी केली. गोडे तलावाला हजारो परप्रांतीय नागरिकांचा वेढा पडला होता.च्त्यामुळे स्थानिक नागरिकांची गोची झाली. प्रचंड वाहतूक कोंडीला त्यांना सामोरे जावे लागले. तसेच छटपूजेनंतर मोठ्या प्रमाणात गोडे तलावाजवळ कचरा टाकण्यात आला आहे. ध्वनी मर्यादेचे उल्लंघन हा कायद्यने गुन्हा असतानादेखील फटाके वाजवण्यात आले.बोळींज येथील तलाव तसेच विरार पूर्व मोरेगाव तलाव,नालासोपारा आचोळा येथील तलाव तसेच चक्रेश्वर तलावेतही हिच परिस्थिती होती.गेल्या काही वर्षांपासून या छटपूजेला विरोध करत आहोत.आजही हे पाणी आम्हाला पिण्यासाठी पालिका देते. तेलाचे दिवे, निर्माल्य पाण्यात सोडून छटपूजा केली जात आहे. छटपूजेला विरोध नाही, मात्र पिण्याचे पाणी अशुद्ध करण्यास आमचा कायम विरोध राहील.-विलास चोरघे, सामाजिक कार्यकर्ते,विरार

टॅग्स :Vasai Virarवसई विरार