शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
3
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
4
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
5
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
6
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
7
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
8
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
9
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
10
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
11
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
12
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
13
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
14
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
15
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
16
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
17
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
18
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
19
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
20
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना

कामगारांनीच आता एसटी वाचविण्याच्या लढ्याला बळ द्यावे - विवेक पंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 23:24 IST

तोट्यात जाण्यास सरकार जबाबदार : वसई आगारात एस टी चा ७१ वा वर्धापन दिन संपन्न

वसई : जोपर्यंत महाराष्ट्रात गोरगरीब जनता आहे, तोपर्यंत एसटीची बससेवा चालू राहिल कारण की, ती राज्याची जीवनवाहिनी आहे. एसटी ही प्रवाशांच्या सेवेसाठी चालते, नफा कमावणे हा उद्देश्य नव्हता. मात्र एसटी महामंडळ तोट्यात जाण्याला सरकारची काही धोरणेच जबाबदार आहेत. अशी टिका विवेक पंडीत यांनी केली.

एसटी तर्फे ज्या वेगवेगळ्या सवलती दिल्या जातात त्याचा परतावा शासनाकडून मिळत नसल्याने व कंत्राटदार धार्जिण्या धोरणामुळे एस टी तोट्यात गेली असल्याचे उद्गार राज्य आदिवासी विकास आढावा समितीचे अध्यक्ष माजी आम. विवेक पंडित ह्यांनी शनिवारी वसई येथे एस टी कामगार संघटनेतर्फे आयोजित एसटी च्या ७१ व्या वर्धापनिदन सोहळ्यात बोलताना काढले.

यावेळी पंडित यांना राज्यमंत्री पदाचा दर्जा मिळाल्याबद्दल कविवर्य सायमन मार्टिन व भरत पेंढारी यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. पंडित यांनी विवेचन करतांना सांगितले की, सामान्य माणसाला जगायचे असेल तर खाजगीकरणाविरोधात पेटून उठलेच पाहिजे. एसटी राज्याच्या कानाकोपऱ्यात जात असते. म्हणून कामगारांनीच जनतेचं प्रबोधन करु न एस टी वाचवण्याच्या लढ्याला बळ द्यावे.तसेच सरकारच्या कामगार विरोधी धोरणावर बोलतांना कामगार नेते भरत पेंढारी म्हणाले की, कामगारांना उध्वस्त करुन कुठलेही राज्य प्रगति करू शकत नाही, कष्टकरीच देश घडवत असतात. मात्र दुर्दैवाने सध्याची सरकारी धोरणं कामगार विरोधीच असल्यामुळे सर्वत्र अस्वस्थता आहे.

यावेळी जन आंदोलनाच्या नेत्या कु,डॉमनिका डाबरे, कवी मार्टिन ,भाजपचे दत्ता नर एसटी महामंडळाचे दिलीप मोरे आदींची समयोचित भाषणे झाली. यावेळी सेवानिवृत्तांचा सत्कार करण्यात आला.