शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

वैतरणा उपखोरे जलआराखडाप्रकरणी आता सुनावणी १५ फेब्रु.ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2018 02:37 IST

सध्या जव्हार मोखाडा तालुक्यावर पाणीबाणीचे संकट घोंघावत असतांना नुकतेच कोकण प्रदेशांतर्गत वैतरणा उपखोºयाच्या प्रारूप जल आराखड्यावर जनसुनावणी घेण्यात आली.

जव्हार : सध्या जव्हार मोखाडा तालुक्यावर पाणीबाणीचे संकट घोंघावत असतांना नुकतेच कोकण प्रदेशांतर्गत वैतरणा उपखोºयाच्या प्रारूप जल आराखड्यावर जनसुनावणी घेण्यात आली. मात्र त्याची कल्पना स्थानिक जनतेला आणि लोकप्रतिनिधींना देण्यात आलेली नसल्याने याबाबत तीव्र असंतोष तीमध्येच व्यक्त करण्यता आला. जलसंपदा विभाग, कोकण पाटबंधारे विकास महामंडळ आणि ठाणे पाटबंधारे मंडळ यांनी दमणगंगा उपखोरे, वैतरणा उपखोरे तसेच समुद्राला मिळणारे उपखोरे या भागांची जल आराखड्याची सुनावणी नुकतीच मनोर येथे ठेवण्यात आली होती.यामुळे ही सुनावणी आता जव्हार येथे १५ फेब्रुवारीला होणार आहे. मात्र त्या अगोदर हा आराखडा नेमका काय आहे याची माहीती जव्हार मोखाडयातील नागरीकांना व्हावी यासाठी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य दिनेश भट जि. प. सदस्य रतन बुधर यांच्या मागणी नुसार ७ फेब्रुवारीला ही माहीती जव्हार येथे देण्यात येणार आहे. हा सगळा प्रकार होत असताना महत्वाचा मुद्दा हा आहे कि मोखाडा येथील तुळयाचापाडा धरण, मध्यवैतरणा प्रकल्पातील पळसपाडा धरण, खोच येथील वनराई बंधारा तर जव्हार येथील खडखड धरण, काम सुरू असलेले लेंडी धरण यांचा आजवर या भागाला नेमका काय फायदा झाला हा संशोधनाचा विषय बनला आहे कारण जमीनी इथल्या भूमिपुत्रांच्या अधिग्रहीत करायच्या त्यांना कायमचे विस्थापित करायचे अन पाणी मात्र शहरी भागाकडे न्यायचे असाच प्रकार सुरू असल्याने हे तालुके बिनकामी जलाशयाचे ठरण्याची भीती व्यक्त होत आहे.याच पार्श्वभूमीवर शासनाकडून या आराखाड्याच्या निमित्ताने पाणी पळविण्याचा प्रयत्न पुन्हा तर होत नाही ना, अशी भीती या भागातील सर्वांना वाटू लागली आहे. कारण की येथील पाण्याचा उपयोग आधी इथल्या सिंचनासाठी व जनतेच्या पिण्याच्या पाण्याची गरज भागविण्यासाठी व्हायला हवा त्यानंतरच पाणी अन्य प्रदेशाला देण्याचा निर्णय झाला पाहिजे. हे पाणी आमच्या हक्काचे असून कुणाच्याही बापाचे नाही अशी हाक येथील नागरिकांनी आता द्यायला हवी कारण असे आराखडे म्हणजे जनतेला मूर्ख बनविण्याचे साधनच बनले आहे. त्यामुळेच ते इंग्रजीत करणे त्याला प्रसिद्धी न देणे येथील जनतेला त्याची माहिती न देणे, हरकती आणि सुनावणी याबाबतही अनभिज्ञ ठेवणे असे प्रकार सुरू आहेत. त्यामुळे त्याची सांद्यंत माहिती घेऊन आपल्या हरकती मांडून त्यात आवश्यक ते बदल करवून घेणे आवश्यक आहेत. अन्यथा आपलेच पाणी आपल्यापासून हिरावले जाईल. अशी सांशंकता आहे. याशिवाय नुसतीच याभागात मोठ मोठी धरणे होत असताना जव्हार भागाला हादरे बसणेही याचाच एक भाग असल्याचा आरोपही होतो आहे.>पाण्यासाठी महिलांचा मोर्चावसई : पिण्याच्या पाण्यासह विविध समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी विरारजवळील चंदनसार कातकरी पाड्यातील महिलांनी दुपारी वसई विरार महापालिकेच्या मुख्यालयावर मोर्चा नेला होता. चंदनसार कातकरी पाड्याची लोकसंख्या पाच हजारांहून अधिक असून त्याठिकाणी सरकारी दवाखान्याच्या आवारात असलेल्या पाण्याच्या टाकीतून अवघ्या चारशे लोकांनाच पाणी पुरवठा केला जातो. या टाकीचा क्षमता १ लाख २० हजार लिटर असतांनाही कातकरी पाड्यातील जनता पाण्यासाठी वणवण भटकत आहे. पाणी पुरवठ्याकडे महापालिका दुर्लक्ष करीत असल्याने ह्युमन्स डेव्हलपमेंट फाऊंडेशनच्या वतीने दुपारी मुख्यालयावर धडक मोर्चा नेला होता. पाणी द्या, पाणी द्या अशी घोषणाबाजी करीत महिलांनी दीड तास ठिय्या दिला होता. शिष्टमंडळाने शहर अभियंत्यांची भेट घेतली असता महासभेत प्रस्ताव आणून पाण्याचा प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन त्यांनी दिले.>आता जागरुक अभ्यास हवा: यामुळे जमीन आमची विस्थापित आम्ही व्हायचे अन पाणी मात्र अन्य भागात हे आता इथली जनता सहन करणारी नाही यामुळे आता या येवू घातलेल्या आराखड्याच्या अभ्यास करून यावर ठोस पाउले उचलणे काळाची गरज आहे.