शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
6
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
7
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
8
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
10
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
11
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
12
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
14
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
15
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
16
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
17
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
18
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
19
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
20
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...

वैतरणा उपखोरे जलआराखडाप्रकरणी आता सुनावणी १५ फेब्रु.ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2018 02:37 IST

सध्या जव्हार मोखाडा तालुक्यावर पाणीबाणीचे संकट घोंघावत असतांना नुकतेच कोकण प्रदेशांतर्गत वैतरणा उपखोºयाच्या प्रारूप जल आराखड्यावर जनसुनावणी घेण्यात आली.

जव्हार : सध्या जव्हार मोखाडा तालुक्यावर पाणीबाणीचे संकट घोंघावत असतांना नुकतेच कोकण प्रदेशांतर्गत वैतरणा उपखोºयाच्या प्रारूप जल आराखड्यावर जनसुनावणी घेण्यात आली. मात्र त्याची कल्पना स्थानिक जनतेला आणि लोकप्रतिनिधींना देण्यात आलेली नसल्याने याबाबत तीव्र असंतोष तीमध्येच व्यक्त करण्यता आला. जलसंपदा विभाग, कोकण पाटबंधारे विकास महामंडळ आणि ठाणे पाटबंधारे मंडळ यांनी दमणगंगा उपखोरे, वैतरणा उपखोरे तसेच समुद्राला मिळणारे उपखोरे या भागांची जल आराखड्याची सुनावणी नुकतीच मनोर येथे ठेवण्यात आली होती.यामुळे ही सुनावणी आता जव्हार येथे १५ फेब्रुवारीला होणार आहे. मात्र त्या अगोदर हा आराखडा नेमका काय आहे याची माहीती जव्हार मोखाडयातील नागरीकांना व्हावी यासाठी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य दिनेश भट जि. प. सदस्य रतन बुधर यांच्या मागणी नुसार ७ फेब्रुवारीला ही माहीती जव्हार येथे देण्यात येणार आहे. हा सगळा प्रकार होत असताना महत्वाचा मुद्दा हा आहे कि मोखाडा येथील तुळयाचापाडा धरण, मध्यवैतरणा प्रकल्पातील पळसपाडा धरण, खोच येथील वनराई बंधारा तर जव्हार येथील खडखड धरण, काम सुरू असलेले लेंडी धरण यांचा आजवर या भागाला नेमका काय फायदा झाला हा संशोधनाचा विषय बनला आहे कारण जमीनी इथल्या भूमिपुत्रांच्या अधिग्रहीत करायच्या त्यांना कायमचे विस्थापित करायचे अन पाणी मात्र शहरी भागाकडे न्यायचे असाच प्रकार सुरू असल्याने हे तालुके बिनकामी जलाशयाचे ठरण्याची भीती व्यक्त होत आहे.याच पार्श्वभूमीवर शासनाकडून या आराखाड्याच्या निमित्ताने पाणी पळविण्याचा प्रयत्न पुन्हा तर होत नाही ना, अशी भीती या भागातील सर्वांना वाटू लागली आहे. कारण की येथील पाण्याचा उपयोग आधी इथल्या सिंचनासाठी व जनतेच्या पिण्याच्या पाण्याची गरज भागविण्यासाठी व्हायला हवा त्यानंतरच पाणी अन्य प्रदेशाला देण्याचा निर्णय झाला पाहिजे. हे पाणी आमच्या हक्काचे असून कुणाच्याही बापाचे नाही अशी हाक येथील नागरिकांनी आता द्यायला हवी कारण असे आराखडे म्हणजे जनतेला मूर्ख बनविण्याचे साधनच बनले आहे. त्यामुळेच ते इंग्रजीत करणे त्याला प्रसिद्धी न देणे येथील जनतेला त्याची माहिती न देणे, हरकती आणि सुनावणी याबाबतही अनभिज्ञ ठेवणे असे प्रकार सुरू आहेत. त्यामुळे त्याची सांद्यंत माहिती घेऊन आपल्या हरकती मांडून त्यात आवश्यक ते बदल करवून घेणे आवश्यक आहेत. अन्यथा आपलेच पाणी आपल्यापासून हिरावले जाईल. अशी सांशंकता आहे. याशिवाय नुसतीच याभागात मोठ मोठी धरणे होत असताना जव्हार भागाला हादरे बसणेही याचाच एक भाग असल्याचा आरोपही होतो आहे.>पाण्यासाठी महिलांचा मोर्चावसई : पिण्याच्या पाण्यासह विविध समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी विरारजवळील चंदनसार कातकरी पाड्यातील महिलांनी दुपारी वसई विरार महापालिकेच्या मुख्यालयावर मोर्चा नेला होता. चंदनसार कातकरी पाड्याची लोकसंख्या पाच हजारांहून अधिक असून त्याठिकाणी सरकारी दवाखान्याच्या आवारात असलेल्या पाण्याच्या टाकीतून अवघ्या चारशे लोकांनाच पाणी पुरवठा केला जातो. या टाकीचा क्षमता १ लाख २० हजार लिटर असतांनाही कातकरी पाड्यातील जनता पाण्यासाठी वणवण भटकत आहे. पाणी पुरवठ्याकडे महापालिका दुर्लक्ष करीत असल्याने ह्युमन्स डेव्हलपमेंट फाऊंडेशनच्या वतीने दुपारी मुख्यालयावर धडक मोर्चा नेला होता. पाणी द्या, पाणी द्या अशी घोषणाबाजी करीत महिलांनी दीड तास ठिय्या दिला होता. शिष्टमंडळाने शहर अभियंत्यांची भेट घेतली असता महासभेत प्रस्ताव आणून पाण्याचा प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन त्यांनी दिले.>आता जागरुक अभ्यास हवा: यामुळे जमीन आमची विस्थापित आम्ही व्हायचे अन पाणी मात्र अन्य भागात हे आता इथली जनता सहन करणारी नाही यामुळे आता या येवू घातलेल्या आराखड्याच्या अभ्यास करून यावर ठोस पाउले उचलणे काळाची गरज आहे.