शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सुप्रीम कोर्टाला विचारले १४ प्रश्न; नेमकं काय घडलं?
2
लष्करी जवानाकडे हेरॉईन सापडले; श्रीनगरहून पंजाबला करत होता तस्करी, अटकेमुळे खळबळ
3
हृदयद्रावक! डोक्यावरती अक्षता पडल्या अन् दुसऱ्याच दिवशी सकाळी नववधूला मृत्यूने गाठलं
4
Maharashtra Politics :'फडणवीसांनी डोनाल्ड ट्रम्प यांनाच कुलदैवत मानावं', संजय राऊतांची भाजपावर टीका
5
Mumbai: मेट्रो-३ च्या प्रवासात मोबाइलला 'नो नेटवर्क', प्रवाशांची उडते तारांबळ, तिकीट काढण्यासाठी मार्गदर्शक सूचना...
6
वेळ काय, तुम्ही बोलता काय...; कर्नल सोफिया यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या विजय शाहंना कोर्टाने फटकारलं
7
४० हजारांचं पॅकेज, ५ तासांची सर्जरी... हेअर ट्रान्सप्लांट करणाऱ्या अनुष्काबद्दल धक्कादायक खुलासे
8
तुर्कीच्या सफरचंदावर घातलेली बंदी पाकिस्तानींना झोंबली; पुण्याच्या सुयोग झेंडेंना धमक्यांचे फोनवर फोन
9
हेअर ट्रांसप्लांटमुळे दोघांचा मृत्यू; ही सर्जरी खरंच सुरक्षित आहे का? जाणून घ्या सविस्तर माहिती...
10
दोन्ही मुलांना मैदानात उतरवलं, भारताचंही नाव घेतलं! इम्रान खानच्या खेळीनं पाकच्या राजकारणात खळबळ  
11
रोहित शर्मा 'भलतेच काहीतरी' वाटावे असे बोलून गेला, मग लगेच असं दिलं स्पष्टीकरण (VIDEO)
12
ट्रम्प यांचं टॅरिफ लागून अवघा काही वेळही झाला नाही आणि भरला सरकारचा खजिना, कुठून आला पैसा?
13
जर एखाद्या देशाने 'Nuclear' हल्ल्याचा निर्णय घेतला तर त्याची प्रक्रिया काय, वेळ किती लागतो? 
14
कोंकणा सेन शर्मा घटस्फोटानंतर पुन्हा प्रेमात? ७ वर्ष लहान अभिनेत्याला डेट करत असल्याच्या चर्चा
15
पाकिस्तानला लोनवर लोन... चीनसोबत अमेरिकेची वाढती मैत्री तर नाही ना कारण? भारताचं टेन्शन काय?
16
Datta Upasana: जगातील एकमेव दत्तहस्त पूजास्थान; जिथे दत्त महाराजांच्या हाताचे छाप उमटले!
17
"ती भारताबाहेर गेली अन्...", दिग्दर्शकाने सांगितलं 'रेड २'मध्ये इलियानाला न घेतल्याचं कारण
18
नेहा पेंडसेच्या लेकींना पाहिलंत का?, फॅमिलीसोबत बालीत करतेय व्हॅकेशन एन्जॉय
19
रुपाली गांगुलीला सेटवर कुत्रा चावला? 'अनुपमा' फेम अभिनेत्रीचा राग अनावर, म्हणाली- "हात जोडून सांगते.."
20
ऑपरेशन सिंदूर: पाकमधील गुप्तहेरांकडून सिग्नल आला, भारतीय सैन्याने पाच दिवस आधीच हल्ला चढवला

पालघरसाठी पुरवठा अधिकारीच नाहीत

By admin | Updated: August 28, 2015 00:10 IST

पालघर जिल्ह्णाच्या पुरवठा विभागासाठी राज्यशासनाकडून अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदे मंजूर व त्यावर नियुक्त्या होऊनही ठाणे जिल्हा कार्यालयातून त्यांना पदमुक्त करण्यास टाळाटाळ

- हितेन नाईक,  पालघरपालघर जिल्ह्णाच्या पुरवठा विभागासाठी राज्यशासनाकडून अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदे मंजूर व त्यावर नियुक्त्या होऊनही ठाणे जिल्हा कार्यालयातून त्यांना पदमुक्त करण्यास टाळाटाळ केली जात असल्याने पालघर जिल्ह्णातील धान्यवितरण व्यवस्था कोलमडून पडली आहे. याचा फायदा घेऊन काळ्याबाजारात धान्याची खुलेआम विक्री केली जात आहे.ठाणे जिल्ह्णात पुरवठा विभागात एकूण ५५ पदे मंजूर असून त्यातील पालघर जिल्ह्णासाठी दोन लेखापर्यवेक्षक, एक साखर वाटप अधिकारी, एक लघु टंकलेखक, आठ अव्वल कारकून, दहा कोठार अधिकारी, आठ लिपीक, शिपाई पाच, चार सफाई कामगार इ. अशी एकूण ३४ पदे जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आली आहेत. परंतु आजही पालघर जिल्हापुरवठा अधिकारी कार्यालय, एक जिल्हापुरवठा अधिकारी व वाहन चालक या दोनच पदे मंजूर करण्यात आली असून ३-४ उधारीच्या कर्मचाऱ्यावर जिल्हापुरवठा कार्यालयाचा कारभार सध्या सुरू आहे. राज्यशासनाच्या आदेशाला ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून केराची टोपली दाखविली जात असून ठाणे कार्यालयाने एकाही अधिकारी, कर्मचाऱ्याला पालघर कार्यालयात रुजू होण्यासाठी मुक्त केले नसल्याने पालघर जिल्ह्णात सुरू असलेला धान्याचा काळाबाजार रोखण्यात प्रभारी जिल्हापुरवठा अधिकाऱ्यांना यश येत नाही. आज पालकमंत्री विष्णू सवरा यांचा वचकही कमी होत असल्याचे दिसत असल्याने पालघर जिल्हाधिकारी कार्यालयातील अनेक पदे रिक्त राहत आहेत. जिल्ह्यात केंद्र व राज्यशासनाच्या वतीने दारिद्र्य रेषेखालील ग्राहकांसाठी प्राधान्य योजनेअंतर्गत तलासरी तालुक्यातील ६३ हजार ७६४ कुटुंबाना १ हजार ९८१ क्विंटल तांदूळ व १ हजार ३२० क्विंटल गहू, जव्हार तालुक्यात ४ हजार ७९१ कुटूंबाना १ हजार ४८८ क्विंटल तांदूळ व ९९२ क्विंटल गहू, मोखाडा तालुक्यात ३३ हजार ८२८ कुटुंबाना १ हजार ५१ क्विंटल तांदूळ व ७०१ क्विंटल गहू, विक्रमगड तालुक्यातील ३६ हजार ३२० कुटुंबांना १ हजार १२८ क्विंटल तांदूळ व १ हजार ८२४ क्विंटल गव्हाचे वाटप होते. परंतु त्यातले लाभर्थ्यांपर्यंत किती पोहचते?शहरी भागापैकी पालघर तालुक्यातील ३ लाख ३६ हजार ५६० कुटुंबासाठी १० हजार ४५४ क्विंटल तांदुळ व ६ हजार ९६८ क्विंटल गहू, वसई तालुक्यातील ५ लाख ७५ हजार ५६ कुटुंबासाठी १७ हजार ८६१ क्विंटल तांदुळ, व ११ हजार ९०६ क्विंटल गहु तर डहाणूतील १ लाख ९३ हजार ५४३ कुटुंबासाठी ६ हजार ११ क्विंटल तांदुळ व ४ हजार ७ क्विंटल धान्याचे वाटप करण्यात येते. जिल्ह्णात एकूण १३ लाख ७५ हजार ५४ कुटुंबाना ४२ हजार ७१० क्विंटल तांदुळ व ९ हजार ७८० क्विंटल गहू प्रत्येक महिन्यात वाटप करण्यात येत आहे.४० टक्के धान्य हे काळ्याबाजारात विक्रीसाठी पाठवले जात असून हे रोखण्यात अपुरे कर्मचारी, अधिकारी यांमुळे जिल्हा पुरवठा कार्यालय अयशस्वी होत आहे. अपुऱ्या मनुष्य बळामुळे ही परिस्थिती असल्याचे जिल्हापुरवठा अधिकारी उमेश बिरारी यांनी सांगितले.