शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

चार वर्षांपासून पर्यावरण अहवालच नाही, प्रशासनाची उदासीनता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2019 01:00 IST

दिल्लीसह मुंबईत प्रदूषणाची समस्या गंभीर आहे. तसेच महानगरपालिका क्षेत्राच्या बाजूलाच असलेले तारापूर सर्वाधिक प्रदूषित आहे.

विरार : दिल्लीसह मुंबईत प्रदूषणाची समस्या गंभीर आहे. तसेच महानगरपालिका क्षेत्राच्या बाजूलाच असलेले तारापूर सर्वाधिक प्रदूषित आहे. असे असताना वसई - विरार महानगरपालिकेने मात्र चार वर्षापासून पर्यावरण अहवालच काढला नसल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे पालिका शहरातील पर्यावरणाच्या समस्येबाबत किती जागरु क आहे, ते उघड झाले आहे. पालिकेच्या या कारभारावर आता पर्यावरणप्रेमींकडून कडाडून टीका केली जात आहे.शहरातील वाढती अनधिकृत बांधकामे, वाहनांची संख्या आणि वाहतूक कोंडी ही कारणेही पर्यावरण ºहासाला मोठ्या प्रमाणात कारणीभूत ठरत आहेत. त्यातच शहरातील केमिकल कंपन्यांमुळे होणाऱ्या प्रदूषणाची देखील चर्चा असते. शहरात प्रदूषणासंदर्भात इतके गंभीर विषय असतानाही पालिकेच्या संकेत स्थळावर मात्र पर्यावरण सद्यस्थिती अहवाल २०१३-१४ व २०१४-१५ चाच अहवाल दाखवला जात आहे. तर आतापर्यंत म्हणजेच पर्यावरण सद्यस्थिती अहवाल २०१५-१६, २०१६-१७, २०१७-१८, २०१८-१९ चा अहवाल पालिकेने काढलाच नसल्याचे समोर आले आहे.वास्तविक, पालिकेकडून दरवर्षी जाहीर होणारा पर्यावरण अहवाल हा शहरातील पर्यावरणाची सध्याची स्थिती दर्शवत असतो. पर्यावरणाची हानी करणाऱ्यांवर पालिकेने काय कारवाई केली, या संदर्भातील माहितीही या अहवालातून मिळत असते. त्यामुळे शहरात पर्यावरणाची हानी करणाºयांमध्ये कायद्याचे पालन करण्याची मानसिकता वाढू शकते. मात्र पालिका दरवर्षी हा अहवालच काढत नसल्याने महापालिका या विषयाप्रती किती गंभीर आहे, हे लक्षात येते.पालिका पर्यावरणासारख्या गंभीर प्रश्नाबाबत इतकी बेजबाबदार असूच कशी शकते असा सवाल पर्यावरणप्रेमींकडून उपस्थित केला जात आहे.>शहरातील पर्यावरण सद्यस्थिती अहवालाबाबत आमची चौकशी सुरु आहे. तसेच पर्यावरण विभागाच्या अधिकाºयांशी बोलणे झाले असून दोन ते तीन दिवसात हा अहवाल प्राप्त होणार आहे.- बी.जी.पवार, आयुक्त, वसई-विरार महापालिका