शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
2
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
3
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
4
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
5
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
6
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
7
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
8
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
9
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
10
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
11
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
12
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
13
क्रिश का गाना सुनेगा..? अचानक २० वर्षांनी रंगली तुफान चर्चा, 'ले बेटा' वाला Video Viral
14
श्रीमंत व्हायचंय? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा गुंतवणुकीचा नवा 'मंत्र', चांदी विषयी केलं मोठं भाकित
15
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
16
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
17
“महानगरपालिकांमध्ये ‘वंचित’बरोबर आघाडी करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू”: हर्षवर्धन सपकाळ
18
नवीन वर्षात करा नवीन भाषा शिकण्याचा संकल्प, मिळेल आयुष्याला कलाटणी; पाहा सोप्या टिप्स
19
३१ डिसेंबरला अयोध्येतील राम मंदिर खरोखरच बंद राहणार का? महत्त्वाची माहिती आली समोर
20
विधानसभेला संधी हुकली कृष्णराज महाडिक आता महापालिका निवडणूक लढवणार, प्रभागही ठरला!
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टर नव्हे, वेठबिगारच

By admin | Updated: July 25, 2015 04:04 IST

आदिवासी व दुर्गम भागातील आरोग्य केंद्रांत कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या डॉक्टरांवर वेठबिगारीची पाळी आली आहे. गेल्या १२ वर्षांपासून अस्थायी स्वरूपात काम

शशिकांत ठाकूर , कासाआदिवासी व दुर्गम भागातील आरोग्य केंद्रांत कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या डॉक्टरांवर वेठबिगारीची पाळी आली आहे. गेल्या १२ वर्षांपासून अस्थायी स्वरूपात काम करणाऱ्या या डॉक्टरांना यासाठी वारंवार आंदोलने, अर्ज, विनंत्या कराव्या लागल्या आहेत. एवढे करूनही शासन सेवेत सामावून घेत नसल्याने नोकरीच्या अनिश्चिततेमुळे कुटुंबाचा गाडा कसा चालवावा, असा प्रश्न त्यांच्यासमोर आ वासून उभा आहे. पालघर जिल्ह्यातील आदिवासी भागातील आरोग्य केंद्रांत काम करणाऱ्या कंत्राटी डॉक्टरांची संख्या २७ आहे. तर राज्यात ती ७९१ असल्याचे संघटना प्रतिनिधींकडून सांगण्यात आले. गेल्या १२ वर्षांपासून सदर कंत्राटी डॉक्टर काम करत आहेत. त्यापैकी बऱ्याच डॉक्टरांकडे ते कार्यरत असलेल्या आरोग्य केंद्रांत प्रभारी वैद्यकीय अधिकारीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. काही ठिकाणी एकच डॉक्टर कार्यरत असल्याने त्यांना २४ तास काम करावे लागत आहे. त्यामुळे साप्ताहिक रजा घेता येत नसल्याने त्यांच्या कौटुंबिक व्यवस्थेवर परिणाम झाल्याचे अनेक डॉक्टरांनी लोकमतला सांगितले. कायमस्वरूपी झालेले बहुतेक डॉक्टर आदिवासी दुर्गम भाग तसेच नक्षलग्रस्त भागात वैद्यकीय सेवेसाठी जाण्यास तयार होत नाहीत. त्यामुळे अशा ग्रामीण भागात कंत्राटी डॉक्टरांची नेमणूक शासनस्तरावरून करण्यात आली आहे. आदिवासी भागातील एका आरोग्य केंद्रांतर्गत ३० ते ३५ गावांचा समावेश होतो तसेच ८ ते १० उपकेंद्रांचा समावेश होत असून सदर गावे आरोग्य केंद्रापासून दूरवर व डोंगरदऱ्याखोऱ्यांत आहेत. त्यामुळे विविध आरोग्यविषयक योजना राबविण्यासाठी डॉक्टरांना खेड्यापाड्यांतील सदर गावांना भेटी द्याव्या लागतात. आदिवासी व ग्रामीण भागात बालमृत्यू, मातामृत्यू, कुपोषण आदी समस्या भीषण आहेत. तसेच पावसाळ्यात निर्माण होणारे साथीचे आजार यांचे प्रमाणही मोठे असल्याने त्यावर नियंत्रण ठेवावे लागते. त्यामुळे शासनस्तरावरून उत्तम आरोग्य सुविधा पुरविणे गरजेचे आहे. दुर्गम भागातील बऱ्याच आरोग्य केंद्रांत डॉक्टर व कर्मचाऱ्यांच्या निवासाची सोय नाही. तसेच अपुरा कर्मचारीवर्ग अशा परिस्थितीत सदर कंत्राटी डॉक्टरांना काम करावे लागते. त्यामुळे उत्तम आरोग्य सेवेसाठी खेड्यापाड्यांत व आदिवासी भागात काम करणाऱ्या डॉक्टरांना कायमस्वरूपी सेवा नसल्याने आर्थिक व कौटुंबिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याने सेवेत सामावून घेण्याची मागणी या डॉक्टरांकडून होत आहे.