शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टर नव्हे, वेठबिगारच

By admin | Updated: July 25, 2015 04:04 IST

आदिवासी व दुर्गम भागातील आरोग्य केंद्रांत कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या डॉक्टरांवर वेठबिगारीची पाळी आली आहे. गेल्या १२ वर्षांपासून अस्थायी स्वरूपात काम

शशिकांत ठाकूर , कासाआदिवासी व दुर्गम भागातील आरोग्य केंद्रांत कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या डॉक्टरांवर वेठबिगारीची पाळी आली आहे. गेल्या १२ वर्षांपासून अस्थायी स्वरूपात काम करणाऱ्या या डॉक्टरांना यासाठी वारंवार आंदोलने, अर्ज, विनंत्या कराव्या लागल्या आहेत. एवढे करूनही शासन सेवेत सामावून घेत नसल्याने नोकरीच्या अनिश्चिततेमुळे कुटुंबाचा गाडा कसा चालवावा, असा प्रश्न त्यांच्यासमोर आ वासून उभा आहे. पालघर जिल्ह्यातील आदिवासी भागातील आरोग्य केंद्रांत काम करणाऱ्या कंत्राटी डॉक्टरांची संख्या २७ आहे. तर राज्यात ती ७९१ असल्याचे संघटना प्रतिनिधींकडून सांगण्यात आले. गेल्या १२ वर्षांपासून सदर कंत्राटी डॉक्टर काम करत आहेत. त्यापैकी बऱ्याच डॉक्टरांकडे ते कार्यरत असलेल्या आरोग्य केंद्रांत प्रभारी वैद्यकीय अधिकारीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. काही ठिकाणी एकच डॉक्टर कार्यरत असल्याने त्यांना २४ तास काम करावे लागत आहे. त्यामुळे साप्ताहिक रजा घेता येत नसल्याने त्यांच्या कौटुंबिक व्यवस्थेवर परिणाम झाल्याचे अनेक डॉक्टरांनी लोकमतला सांगितले. कायमस्वरूपी झालेले बहुतेक डॉक्टर आदिवासी दुर्गम भाग तसेच नक्षलग्रस्त भागात वैद्यकीय सेवेसाठी जाण्यास तयार होत नाहीत. त्यामुळे अशा ग्रामीण भागात कंत्राटी डॉक्टरांची नेमणूक शासनस्तरावरून करण्यात आली आहे. आदिवासी भागातील एका आरोग्य केंद्रांतर्गत ३० ते ३५ गावांचा समावेश होतो तसेच ८ ते १० उपकेंद्रांचा समावेश होत असून सदर गावे आरोग्य केंद्रापासून दूरवर व डोंगरदऱ्याखोऱ्यांत आहेत. त्यामुळे विविध आरोग्यविषयक योजना राबविण्यासाठी डॉक्टरांना खेड्यापाड्यांतील सदर गावांना भेटी द्याव्या लागतात. आदिवासी व ग्रामीण भागात बालमृत्यू, मातामृत्यू, कुपोषण आदी समस्या भीषण आहेत. तसेच पावसाळ्यात निर्माण होणारे साथीचे आजार यांचे प्रमाणही मोठे असल्याने त्यावर नियंत्रण ठेवावे लागते. त्यामुळे शासनस्तरावरून उत्तम आरोग्य सुविधा पुरविणे गरजेचे आहे. दुर्गम भागातील बऱ्याच आरोग्य केंद्रांत डॉक्टर व कर्मचाऱ्यांच्या निवासाची सोय नाही. तसेच अपुरा कर्मचारीवर्ग अशा परिस्थितीत सदर कंत्राटी डॉक्टरांना काम करावे लागते. त्यामुळे उत्तम आरोग्य सेवेसाठी खेड्यापाड्यांत व आदिवासी भागात काम करणाऱ्या डॉक्टरांना कायमस्वरूपी सेवा नसल्याने आर्थिक व कौटुंबिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याने सेवेत सामावून घेण्याची मागणी या डॉक्टरांकडून होत आहे.