शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

डिझेल नाही, तलासरीचे फोन बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2018 03:12 IST

मनमानी पद्धतीने सुरू असलेले वीज भारनियमन, त्यातच जनरेटरचे डिझेल संपल्याने तलासरीचे दूरध्वनी केंद्र चार दिवसांपासून बंद पडल्याने सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत

- सुरेश काटेतलासरी : मनमानी पद्धतीने सुरू असलेले वीज भारनियमन, त्यातच जनरेटरचे डिझेल संपल्याने तलासरीचे दूरध्वनी केंद्र चार दिवसांपासून बंद पडल्याने सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत वरिष्ठ अधिकारी दूरध्वनी केंद्राला साहित्य व डिझेल साठी लागणाऱ्या निधीचा पुरवठा करीत नसल्याने तसेच तांत्रिक समस्या दूर करण्यासाठी तज्ञ पाठवीत नसल्याचे दूरध्वनी केंद्र वारंवार बंद पडत आहे. केंद्राचे अधिकारी हरिनारायण जयस्वाल यांनी तलासरी तहसीलदार स्वाती घोंगडे यांना तहसिल कार्यालयात दूरध्वनी ग्राहकां समोर सांगितल्याने भारत दूर संचार विभागाचा भोंगळ कारभार उघड झाला आहे.गेल्या महिन्यापासून केंद्रातील बिघाडा मुळे तलासरीतील दूरध्वनी बंद आहेत, त्यातच डिझेल नसल्याने भारिनयमन वेळेत जनरेटर बंद असल्याने इंटरनेट सेवाही चार दिवसां पासून बंद पडली त्यामुळे तलासरीतील सर्व व्यवहार कोलमडले आहेत, बँकांचे व्यवहार थांबले आहेत, ग्राहकांना रोकडी ची चणचण जाणवते आहे, तहसिल व पोलीस स्टेशनचे कामकाज थांबल्याने नागरिकांची दाखल्या विना परवड सुरू आहे,तलासरी दूरध्वनी केंद्रा कडे दूरसंचार विभागाच्या अधिकाºयाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष आहे, महिन्यापासून केंद्र बंद पडले असतांना ते दुरुस्त करण्यासाठी एकही जबाबदार अधिकारी तलासरी कडे फिरकला नाही त्यातच चार दिवसा पासून इंटरनेट बंद असल्याने बँकांचे कामकाज थांबले आहे. याबाबत विचारणा करावयास गेलेल्या स्टेट बँकेच्या अधिकाºयांना तुम्ही बीएसएनएलच्या ऐवजी दुसरी नेट सर्व्हिस घ्या असा सल्ला जयस्वाल यांनी दिल्याने संचार निगमचे अधिकारी सरकारचा पगार घेऊन खाजगी नेट कंपन्या चा प्रचार करीत असल्याने यात त्याचा मोठा आर्थिक फायदा अधिकाºयांना होत असावा, अधिकाºयाच्या कामाच्या या पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिजिटल इंडियालाच हरताळ फासला जात आहे.तलासरी दूरध्वनी केंद्र बंद पडल्याने व तलासरीत जबाबदार अधिकारी नसल्याने निगमचे मुख्य व्यवस्थापक सोळंकी यांच्याशी मोबाईल वरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते कोणताच प्रतिसाद देत नाहीत व मेसेज केल्यावरही उत्तर देत नसल्याने आदीवासी व ग्रामीण भागातील दूरसंचारची सेवा बंद करण्याचा घाट अधिकाºयांनी घातल्याचे दिसून येते.अधिकारी प्रतिसाद देत नसल्याने तहसीलदारांनी वसई चे डी जी एम विनोद सोळंकी यांच्याशी मोबाईल वरून संपर्क साधला असता संध्याकाळ पर्यंत दूरध्वनी केंद्र सुरू करण्याचे त्यांनी अश्वासन दिले.संध्याकाळ पर्यंत सुरून झाल्यास दूरध्वनी केंद्राला टाळे ठोकण्याचा इशारा ग्राहकांनी दिला आहे.>पनिशमेंट पोस्टींगमुळे हरीभाऊ आहेत नाराजदूरध्वनी केंद्राला दहा हजाराचे पेट्रो कार्ड येते परंतु नऊ ते दहा तासाच्या भारनियमनामुळे डिझेल लगेच संपते डिझेलचा वाढीव निधी मिळत नसल्याने वीज गेल्यावर जनरेटर डिझेल अभावी बंद ठेवावा लागतो. तलासरी दूरध्वनी केंद्राला दिलेले हरिनारायण जयस्वाल हे ओ एफ सी खात्याचे असून त्यांना दूरध्वनी चे तांत्रिक ज्ञान नाही. दूरध्वनी केंद्राचा अनुभव नाही. या केंद्रात काही बिघाड झाल्यास बोईसर अथवा कल्याण येथून तंत्रज्ञ व अधिकारी आल्यावर हे केंद्र सुरू होते, ओएफ सी त बदली करा असे सांगूनही माझी बदली न करून वरीष्ठांनी मानसिक त्रास देण्यासाठी माझी या दूरध्वनी केंद्राला बदली केली आहे असा आरोप जयस्वाल यांनी केला. निगमच्या अधिकाºयांच्या संघर्षात हाल मात्र ग्राहकांचे होत आहेत.