शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
2
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
3
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
4
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
5
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
6
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
7
क्रिश का गाना सुनेगा..? अचानक २० वर्षांनी रंगली तुफान चर्चा, 'ले बेटा' वाला Video Viral
8
श्रीमंत व्हायचंय? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा गुंतवणुकीचा नवा 'मंत्र', चांदी विषयी केलं मोठं भाकित
9
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
10
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
11
“महानगरपालिकांमध्ये ‘वंचित’बरोबर आघाडी करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू”: हर्षवर्धन सपकाळ
12
नवीन वर्षात करा नवीन भाषा शिकण्याचा संकल्प, मिळेल आयुष्याला कलाटणी; पाहा सोप्या टिप्स
13
३१ डिसेंबरला अयोध्येतील राम मंदिर खरोखरच बंद राहणार का? महत्त्वाची माहिती आली समोर
14
विधानसभेला संधी हुकली कृष्णराज महाडिक आता महापालिका निवडणूक लढवणार, प्रभागही ठरला!
15
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये मविआ-मनसेतील ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
16
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
17
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
18
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
19
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
20
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
Daily Top 2Weekly Top 5

डिझेल नाही, तलासरीचे फोन बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2018 03:12 IST

मनमानी पद्धतीने सुरू असलेले वीज भारनियमन, त्यातच जनरेटरचे डिझेल संपल्याने तलासरीचे दूरध्वनी केंद्र चार दिवसांपासून बंद पडल्याने सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत

- सुरेश काटेतलासरी : मनमानी पद्धतीने सुरू असलेले वीज भारनियमन, त्यातच जनरेटरचे डिझेल संपल्याने तलासरीचे दूरध्वनी केंद्र चार दिवसांपासून बंद पडल्याने सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत वरिष्ठ अधिकारी दूरध्वनी केंद्राला साहित्य व डिझेल साठी लागणाऱ्या निधीचा पुरवठा करीत नसल्याने तसेच तांत्रिक समस्या दूर करण्यासाठी तज्ञ पाठवीत नसल्याचे दूरध्वनी केंद्र वारंवार बंद पडत आहे. केंद्राचे अधिकारी हरिनारायण जयस्वाल यांनी तलासरी तहसीलदार स्वाती घोंगडे यांना तहसिल कार्यालयात दूरध्वनी ग्राहकां समोर सांगितल्याने भारत दूर संचार विभागाचा भोंगळ कारभार उघड झाला आहे.गेल्या महिन्यापासून केंद्रातील बिघाडा मुळे तलासरीतील दूरध्वनी बंद आहेत, त्यातच डिझेल नसल्याने भारिनयमन वेळेत जनरेटर बंद असल्याने इंटरनेट सेवाही चार दिवसां पासून बंद पडली त्यामुळे तलासरीतील सर्व व्यवहार कोलमडले आहेत, बँकांचे व्यवहार थांबले आहेत, ग्राहकांना रोकडी ची चणचण जाणवते आहे, तहसिल व पोलीस स्टेशनचे कामकाज थांबल्याने नागरिकांची दाखल्या विना परवड सुरू आहे,तलासरी दूरध्वनी केंद्रा कडे दूरसंचार विभागाच्या अधिकाºयाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष आहे, महिन्यापासून केंद्र बंद पडले असतांना ते दुरुस्त करण्यासाठी एकही जबाबदार अधिकारी तलासरी कडे फिरकला नाही त्यातच चार दिवसा पासून इंटरनेट बंद असल्याने बँकांचे कामकाज थांबले आहे. याबाबत विचारणा करावयास गेलेल्या स्टेट बँकेच्या अधिकाºयांना तुम्ही बीएसएनएलच्या ऐवजी दुसरी नेट सर्व्हिस घ्या असा सल्ला जयस्वाल यांनी दिल्याने संचार निगमचे अधिकारी सरकारचा पगार घेऊन खाजगी नेट कंपन्या चा प्रचार करीत असल्याने यात त्याचा मोठा आर्थिक फायदा अधिकाºयांना होत असावा, अधिकाºयाच्या कामाच्या या पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिजिटल इंडियालाच हरताळ फासला जात आहे.तलासरी दूरध्वनी केंद्र बंद पडल्याने व तलासरीत जबाबदार अधिकारी नसल्याने निगमचे मुख्य व्यवस्थापक सोळंकी यांच्याशी मोबाईल वरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते कोणताच प्रतिसाद देत नाहीत व मेसेज केल्यावरही उत्तर देत नसल्याने आदीवासी व ग्रामीण भागातील दूरसंचारची सेवा बंद करण्याचा घाट अधिकाºयांनी घातल्याचे दिसून येते.अधिकारी प्रतिसाद देत नसल्याने तहसीलदारांनी वसई चे डी जी एम विनोद सोळंकी यांच्याशी मोबाईल वरून संपर्क साधला असता संध्याकाळ पर्यंत दूरध्वनी केंद्र सुरू करण्याचे त्यांनी अश्वासन दिले.संध्याकाळ पर्यंत सुरून झाल्यास दूरध्वनी केंद्राला टाळे ठोकण्याचा इशारा ग्राहकांनी दिला आहे.>पनिशमेंट पोस्टींगमुळे हरीभाऊ आहेत नाराजदूरध्वनी केंद्राला दहा हजाराचे पेट्रो कार्ड येते परंतु नऊ ते दहा तासाच्या भारनियमनामुळे डिझेल लगेच संपते डिझेलचा वाढीव निधी मिळत नसल्याने वीज गेल्यावर जनरेटर डिझेल अभावी बंद ठेवावा लागतो. तलासरी दूरध्वनी केंद्राला दिलेले हरिनारायण जयस्वाल हे ओ एफ सी खात्याचे असून त्यांना दूरध्वनी चे तांत्रिक ज्ञान नाही. दूरध्वनी केंद्राचा अनुभव नाही. या केंद्रात काही बिघाड झाल्यास बोईसर अथवा कल्याण येथून तंत्रज्ञ व अधिकारी आल्यावर हे केंद्र सुरू होते, ओएफ सी त बदली करा असे सांगूनही माझी बदली न करून वरीष्ठांनी मानसिक त्रास देण्यासाठी माझी या दूरध्वनी केंद्राला बदली केली आहे असा आरोप जयस्वाल यांनी केला. निगमच्या अधिकाºयांच्या संघर्षात हाल मात्र ग्राहकांचे होत आहेत.