शहरं
Join us  
Trending Stories
1
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
2
Air India Plane Crash : क्रॅश झालेल्या एअर इंडियाच्या विमानाचे टीसीएम दोनदा बदलले होते; इंधन नियंत्रण स्विच याचाच एक भाग
3
दुबई अन् नेपाळपर्यंत पसरलं होतं छांगुर बाबाचं जाळं; 'नीतू' करायची डील! कोण आहे 'ही' व्यक्ती?   
4
'दुआ में जरुर याद रखना' मृत्यूपूर्वी अभिनेत्रीचे अखेरचे शब्द; Voice Note पहिल्यांदाच समोर
5
...मग तेव्हा उद्धव ठाकरे २५ मिनिटं मोदीजींचे बूट चाटत होते का?; रामदास कदमांचा राऊतांवर हल्ला
6
बंगालच्या उपसागरात १६ दिवस चिनी जहाज लपून बसलेले; ओळख सांगणारी यंत्रणा चालू-बंद करत होते...
7
आजचे राशीभविष्य, १४ जुलै २०२५: नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल, भविष्यात लाभ होतील
8
इकडे चौकशी सुरू; तिकडे बाळाने मिटले डोळे, अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच रडलेले...
9
संपादकीय: गूढ उकलले की वाढले? एअर इंडियाच्या पायलटांवर संशय, बोईंगला वाचविण्याचे प्रयत्न...
10
पुढील महिन्यापासून संपूर्ण देशात मतदार याद्यांचे सखोल पुनरीक्षण
11
उम्र का तू तमाशा न दिखा, तकाजा कुछ और हैं...; काळाबरोबर खूप काही बदलले...
12
धक्कादायक : बिहारच्या मतदार याद्यांत म्यानमार, नेपाळी, बांगलादेशींचा भरणा
13
नागरिकांना ४ लाखांचे विमा संरक्षण मिळणार? पीएमजेजेबीवाय अंतर्गत विमा संरक्षण दुप्पट करणार
14
विधिज्ञ उज्ज्वल निकम, आणखी तिघे राज्यसभेवर; श्रुंगला, सदानंदन, मीनाक्षी जैन यांचाही समावेश
15
बिहारमध्ये गुंडाराज: १३ दिवसांत ३० हत्या; नेते, अधिकाऱ्यांनाही सोडले नाही
16
उत्तर कोरियाच्या विरोधात जाऊ नका, रशियाचा अमेरिका-जपानला इशारा
17
शनैश्वर बनावट ॲप तयार करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल
18
आंदोलने मजेसाठी नसतात, लोकांचे हक्क महत्वाचे; मद्रास हायकोर्ट : पक्षाची मनमानी चालू शकत नाही
19
‘सुंदर’ फिरकीने भारताचा ‘रूट’ मोकळा; भारताला विजयासाठी १९३ धावांचे लक्ष्य
20
भारताचा पराभव, पण मालिका ३-२ ने जिंकली; शेफाली वर्माची अर्धशतकी खेळी व्यर्थ

डिझेल नाही, तलासरीचे फोन बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2018 03:12 IST

मनमानी पद्धतीने सुरू असलेले वीज भारनियमन, त्यातच जनरेटरचे डिझेल संपल्याने तलासरीचे दूरध्वनी केंद्र चार दिवसांपासून बंद पडल्याने सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत

- सुरेश काटेतलासरी : मनमानी पद्धतीने सुरू असलेले वीज भारनियमन, त्यातच जनरेटरचे डिझेल संपल्याने तलासरीचे दूरध्वनी केंद्र चार दिवसांपासून बंद पडल्याने सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत वरिष्ठ अधिकारी दूरध्वनी केंद्राला साहित्य व डिझेल साठी लागणाऱ्या निधीचा पुरवठा करीत नसल्याने तसेच तांत्रिक समस्या दूर करण्यासाठी तज्ञ पाठवीत नसल्याचे दूरध्वनी केंद्र वारंवार बंद पडत आहे. केंद्राचे अधिकारी हरिनारायण जयस्वाल यांनी तलासरी तहसीलदार स्वाती घोंगडे यांना तहसिल कार्यालयात दूरध्वनी ग्राहकां समोर सांगितल्याने भारत दूर संचार विभागाचा भोंगळ कारभार उघड झाला आहे.गेल्या महिन्यापासून केंद्रातील बिघाडा मुळे तलासरीतील दूरध्वनी बंद आहेत, त्यातच डिझेल नसल्याने भारिनयमन वेळेत जनरेटर बंद असल्याने इंटरनेट सेवाही चार दिवसां पासून बंद पडली त्यामुळे तलासरीतील सर्व व्यवहार कोलमडले आहेत, बँकांचे व्यवहार थांबले आहेत, ग्राहकांना रोकडी ची चणचण जाणवते आहे, तहसिल व पोलीस स्टेशनचे कामकाज थांबल्याने नागरिकांची दाखल्या विना परवड सुरू आहे,तलासरी दूरध्वनी केंद्रा कडे दूरसंचार विभागाच्या अधिकाºयाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष आहे, महिन्यापासून केंद्र बंद पडले असतांना ते दुरुस्त करण्यासाठी एकही जबाबदार अधिकारी तलासरी कडे फिरकला नाही त्यातच चार दिवसा पासून इंटरनेट बंद असल्याने बँकांचे कामकाज थांबले आहे. याबाबत विचारणा करावयास गेलेल्या स्टेट बँकेच्या अधिकाºयांना तुम्ही बीएसएनएलच्या ऐवजी दुसरी नेट सर्व्हिस घ्या असा सल्ला जयस्वाल यांनी दिल्याने संचार निगमचे अधिकारी सरकारचा पगार घेऊन खाजगी नेट कंपन्या चा प्रचार करीत असल्याने यात त्याचा मोठा आर्थिक फायदा अधिकाºयांना होत असावा, अधिकाºयाच्या कामाच्या या पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिजिटल इंडियालाच हरताळ फासला जात आहे.तलासरी दूरध्वनी केंद्र बंद पडल्याने व तलासरीत जबाबदार अधिकारी नसल्याने निगमचे मुख्य व्यवस्थापक सोळंकी यांच्याशी मोबाईल वरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते कोणताच प्रतिसाद देत नाहीत व मेसेज केल्यावरही उत्तर देत नसल्याने आदीवासी व ग्रामीण भागातील दूरसंचारची सेवा बंद करण्याचा घाट अधिकाºयांनी घातल्याचे दिसून येते.अधिकारी प्रतिसाद देत नसल्याने तहसीलदारांनी वसई चे डी जी एम विनोद सोळंकी यांच्याशी मोबाईल वरून संपर्क साधला असता संध्याकाळ पर्यंत दूरध्वनी केंद्र सुरू करण्याचे त्यांनी अश्वासन दिले.संध्याकाळ पर्यंत सुरून झाल्यास दूरध्वनी केंद्राला टाळे ठोकण्याचा इशारा ग्राहकांनी दिला आहे.>पनिशमेंट पोस्टींगमुळे हरीभाऊ आहेत नाराजदूरध्वनी केंद्राला दहा हजाराचे पेट्रो कार्ड येते परंतु नऊ ते दहा तासाच्या भारनियमनामुळे डिझेल लगेच संपते डिझेलचा वाढीव निधी मिळत नसल्याने वीज गेल्यावर जनरेटर डिझेल अभावी बंद ठेवावा लागतो. तलासरी दूरध्वनी केंद्राला दिलेले हरिनारायण जयस्वाल हे ओ एफ सी खात्याचे असून त्यांना दूरध्वनी चे तांत्रिक ज्ञान नाही. दूरध्वनी केंद्राचा अनुभव नाही. या केंद्रात काही बिघाड झाल्यास बोईसर अथवा कल्याण येथून तंत्रज्ञ व अधिकारी आल्यावर हे केंद्र सुरू होते, ओएफ सी त बदली करा असे सांगूनही माझी बदली न करून वरीष्ठांनी मानसिक त्रास देण्यासाठी माझी या दूरध्वनी केंद्राला बदली केली आहे असा आरोप जयस्वाल यांनी केला. निगमच्या अधिकाºयांच्या संघर्षात हाल मात्र ग्राहकांचे होत आहेत.