शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

निरी, आय.आय.टी. अहवाल थातूर-मातूर, कारवाई नाहीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 22:39 IST

करोडो रुपयांचा खर्च वाया; गतवर्षीची वसई-विरार नालासोपाऱ्याची पूरस्थिती

- आशिष राणे वसई : महानगरपालिकेने करोडो रु पये खर्च करून आय.आय.टी आणि निरीकडून महानगरपालिका क्षेत्रात पुन्हा पूरपरिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून पाहणी करून सूचना मागवल्या होत्या. विशेष म्हणजे केंद्र सरकार प्राधिकृत या दोन संस्थांनी २०१९ च्या पावसाळयापूर्वी प्राथमिक स्वरुपाच्या कोणत्या उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्या स्वरुपाचा प्राथमिक अहवाल महानगरपालिकेला दिला, परंतु या अहवालानुसार थातुरमातूर काम करण्याव्यतिरिक्त वसई-विरार महानगरपालिकेने या अहवालाला वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत, असा गंभीर आरोप शिवसेना उपशहर मिलिंद चव्हाण यांनी केला आहे.दरम्यान चव्हाण यांच्या सांगण्यानुसार हा अहवाल येण्यापूर्वीच तत्कालीन आयुक्त सतीश लोखंडे आणि आता सध्याचे आयुक्त बी.जी.पवार यांच्याशी संपर्क साधून नालासोपारा शहराचे सांडपाणी ज्या सोपारा खाडीतून वसई शहरात येते त्या खाडीचा मार्ग बदलून तिथे खाडीत भराव टाकून मैदानाचे आरक्षण टाकले असल्याचे निदर्शनास आणून दिले. परंतु याबाबत महानगरपालिकेतर्फे आजमितीला काहीच केले गेले नाही.विशेष म्हणजे आता प्रसिध्द झालेल्या या निरी तथा सत्यशोधन समितीच्या अहवालात पान क्र.२१ व २२ मध्ये देखील हा जो बदललेला मार्ग यंदाही पूरपरिस्थिती आमंत्रण देणारा असल्याचे नमूद केले आहे आणि २०१९ च्या पावसाळयापूर्वी तो पाणी जाण्यासाठी पूरक करावा, अशी सूचना असतांना देखील महानगरपालिका झोपेचे सोंग घेत आहे. कारण खाडीचा हा मार्ग महानगरपालिकेनेच भराव टाकून बंद केला आणि तिथे अनधिकृत मैदान कोणत्या लोकप्रतिनिधीच्या सांगण्याप्रमाणे केले हे एक कोडेच आहे. एकूणच या अशा कृत्यामुळे वसईच्या जनतेला पुन्हा पुरात ढकलले जाते आहे का नाही? ते महानगरपालिका आयुक्त सांगणार का? जनतेचा पैसा खर्च करून जो अहवाल मागवला आहे त्यावर अंमलबजावणी कधी व कशी करणार हे स्पष्ट होणे आवश्यक आहे. किंबहुना महानगरपालिकेने शहरात गाळ काढण्याचे कामही पूर्णपणे केले नसून तो काढून तिथेच ठेऊन पुढच्या वर्षासाठी ठेकेदारांची आर्थिक सोय करून ठेवली असल्याची टीकाही चव्हाण यांनी केली आहे.