शहरं
Join us  
Trending Stories
1
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
2
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
3
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
4
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
5
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
6
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
7
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
8
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
9
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
10
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
11
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
12
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
13
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
14
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
15
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
16
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
17
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
18
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
19
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
20
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
Daily Top 2Weekly Top 5

निरी, आय.आय.टी. अहवाल थातूर-मातूर, कारवाई नाहीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 22:39 IST

करोडो रुपयांचा खर्च वाया; गतवर्षीची वसई-विरार नालासोपाऱ्याची पूरस्थिती

- आशिष राणे वसई : महानगरपालिकेने करोडो रु पये खर्च करून आय.आय.टी आणि निरीकडून महानगरपालिका क्षेत्रात पुन्हा पूरपरिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून पाहणी करून सूचना मागवल्या होत्या. विशेष म्हणजे केंद्र सरकार प्राधिकृत या दोन संस्थांनी २०१९ च्या पावसाळयापूर्वी प्राथमिक स्वरुपाच्या कोणत्या उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्या स्वरुपाचा प्राथमिक अहवाल महानगरपालिकेला दिला, परंतु या अहवालानुसार थातुरमातूर काम करण्याव्यतिरिक्त वसई-विरार महानगरपालिकेने या अहवालाला वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत, असा गंभीर आरोप शिवसेना उपशहर मिलिंद चव्हाण यांनी केला आहे.दरम्यान चव्हाण यांच्या सांगण्यानुसार हा अहवाल येण्यापूर्वीच तत्कालीन आयुक्त सतीश लोखंडे आणि आता सध्याचे आयुक्त बी.जी.पवार यांच्याशी संपर्क साधून नालासोपारा शहराचे सांडपाणी ज्या सोपारा खाडीतून वसई शहरात येते त्या खाडीचा मार्ग बदलून तिथे खाडीत भराव टाकून मैदानाचे आरक्षण टाकले असल्याचे निदर्शनास आणून दिले. परंतु याबाबत महानगरपालिकेतर्फे आजमितीला काहीच केले गेले नाही.विशेष म्हणजे आता प्रसिध्द झालेल्या या निरी तथा सत्यशोधन समितीच्या अहवालात पान क्र.२१ व २२ मध्ये देखील हा जो बदललेला मार्ग यंदाही पूरपरिस्थिती आमंत्रण देणारा असल्याचे नमूद केले आहे आणि २०१९ च्या पावसाळयापूर्वी तो पाणी जाण्यासाठी पूरक करावा, अशी सूचना असतांना देखील महानगरपालिका झोपेचे सोंग घेत आहे. कारण खाडीचा हा मार्ग महानगरपालिकेनेच भराव टाकून बंद केला आणि तिथे अनधिकृत मैदान कोणत्या लोकप्रतिनिधीच्या सांगण्याप्रमाणे केले हे एक कोडेच आहे. एकूणच या अशा कृत्यामुळे वसईच्या जनतेला पुन्हा पुरात ढकलले जाते आहे का नाही? ते महानगरपालिका आयुक्त सांगणार का? जनतेचा पैसा खर्च करून जो अहवाल मागवला आहे त्यावर अंमलबजावणी कधी व कशी करणार हे स्पष्ट होणे आवश्यक आहे. किंबहुना महानगरपालिकेने शहरात गाळ काढण्याचे कामही पूर्णपणे केले नसून तो काढून तिथेच ठेऊन पुढच्या वर्षासाठी ठेकेदारांची आर्थिक सोय करून ठेवली असल्याची टीकाही चव्हाण यांनी केली आहे.