शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
4
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
5
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
6
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
7
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
8
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
9
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
10
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
11
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
12
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
13
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
14
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
15
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
16
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
17
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
18
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
19
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
20
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'

निरी, आय.आय.टी. अहवाल थातूर-मातूर, कारवाई नाहीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 22:39 IST

करोडो रुपयांचा खर्च वाया; गतवर्षीची वसई-विरार नालासोपाऱ्याची पूरस्थिती

- आशिष राणे वसई : महानगरपालिकेने करोडो रु पये खर्च करून आय.आय.टी आणि निरीकडून महानगरपालिका क्षेत्रात पुन्हा पूरपरिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून पाहणी करून सूचना मागवल्या होत्या. विशेष म्हणजे केंद्र सरकार प्राधिकृत या दोन संस्थांनी २०१९ च्या पावसाळयापूर्वी प्राथमिक स्वरुपाच्या कोणत्या उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्या स्वरुपाचा प्राथमिक अहवाल महानगरपालिकेला दिला, परंतु या अहवालानुसार थातुरमातूर काम करण्याव्यतिरिक्त वसई-विरार महानगरपालिकेने या अहवालाला वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत, असा गंभीर आरोप शिवसेना उपशहर मिलिंद चव्हाण यांनी केला आहे.दरम्यान चव्हाण यांच्या सांगण्यानुसार हा अहवाल येण्यापूर्वीच तत्कालीन आयुक्त सतीश लोखंडे आणि आता सध्याचे आयुक्त बी.जी.पवार यांच्याशी संपर्क साधून नालासोपारा शहराचे सांडपाणी ज्या सोपारा खाडीतून वसई शहरात येते त्या खाडीचा मार्ग बदलून तिथे खाडीत भराव टाकून मैदानाचे आरक्षण टाकले असल्याचे निदर्शनास आणून दिले. परंतु याबाबत महानगरपालिकेतर्फे आजमितीला काहीच केले गेले नाही.विशेष म्हणजे आता प्रसिध्द झालेल्या या निरी तथा सत्यशोधन समितीच्या अहवालात पान क्र.२१ व २२ मध्ये देखील हा जो बदललेला मार्ग यंदाही पूरपरिस्थिती आमंत्रण देणारा असल्याचे नमूद केले आहे आणि २०१९ च्या पावसाळयापूर्वी तो पाणी जाण्यासाठी पूरक करावा, अशी सूचना असतांना देखील महानगरपालिका झोपेचे सोंग घेत आहे. कारण खाडीचा हा मार्ग महानगरपालिकेनेच भराव टाकून बंद केला आणि तिथे अनधिकृत मैदान कोणत्या लोकप्रतिनिधीच्या सांगण्याप्रमाणे केले हे एक कोडेच आहे. एकूणच या अशा कृत्यामुळे वसईच्या जनतेला पुन्हा पुरात ढकलले जाते आहे का नाही? ते महानगरपालिका आयुक्त सांगणार का? जनतेचा पैसा खर्च करून जो अहवाल मागवला आहे त्यावर अंमलबजावणी कधी व कशी करणार हे स्पष्ट होणे आवश्यक आहे. किंबहुना महानगरपालिकेने शहरात गाळ काढण्याचे कामही पूर्णपणे केले नसून तो काढून तिथेच ठेऊन पुढच्या वर्षासाठी ठेकेदारांची आर्थिक सोय करून ठेवली असल्याची टीकाही चव्हाण यांनी केली आहे.