शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
3
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
4
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
5
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
6
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
7
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
8
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
9
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
10
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
11
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
12
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
13
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
14
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
15
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
16
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
17
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
18
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
19
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
20
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस

कर वसुली करण्याकरिता नवीन उपाययोजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2019 23:24 IST

विरार वसई महानगरपालिकेने कर वसुलीची मोहीम हाती घेतली असून महापालिकेने कर न भरणाऱ्यांची नावे फलकावर लिहून ते फलक रस्त्याच्या मध्यभागी लावले आहे.

विरार : विरार वसई महानगरपालिकेने कर वसुलीची मोहीम हाती घेतली असून महापालिकेने कर न भरणाऱ्यांची नावे फलकावर लिहून ते फलक रस्त्याच्या मध्यभागी लावले आहे. तसेच थकबाकी न भरल्यास पाणी पुरवठा खंडित केला जाईल असा इशारा देखील पालिकेने दिला आहे.महापालिकेने नागरिकांना गेल्या अनेक वर्षात बºयाच सुविधा पुरवल्या आहेत तर या बदल्यात योग्य ती रक्कम कर म्हणून नागरिकांकडून घेतली आहे. पण काही नागरिकांनी अजूनही नियमित कर भरलेला नाही. अशा नागरिकांकडून कर वसूली करण्याकरीता शक्य असेल ती मोहीम महापालिका राबवत आहे. करांची उर्वरीत रक्कम नागरिकांकडून वसूल करण्याकरिता महापालिका शक्य असलेले सर्व प्रयत्न करत आहेत.२०१८-१९ मध्ये ९४७ जप्ती वसुली झालेल्या आहेत. २०१६-१७ मध्ये १२७ कोटींचा कर वसूल करण्यात आला तर २०१७-१८ मध्ये १६५ कोटींची कर वसूली झाली होती. यावर्षी महापालिकेने १८० कोटींचा आकडा पार केलेला आहे व ३०० कोटींचे उद्दीष्ट ठेवलेले आहे. आता पर्यंत कर वसुली करण्याबाबत व त्या बद्दल लोकांची मानसिकता बदलावी यासाठी महापालिका अधिकाºयांनी घरोघरी जाऊन जनजागृती केली, बाईक रॅली देखील काढली होती. सर्व प्रयत्न झाले तरी ज्याची जास्तच कर रक्कम बाकी आहे, अशा नागरिकांची नावे फलकावर लिहिण्यात आली आहेत. तसेच आचोळे, पेल्हार, चंदनसार, अर्नाळा, नवघर, माणिकपूर, वसई, बोळींज, वालीव या ९ प्रभागसमिती मधील थकबाकी असलेल्या नागरिकांची नावे फलकावर लिहून ते मुख्य रस्त्यावर देखील लावण्यात आले आहे. तर काही ठिकाणी कायदेशीर कारवाई करीत असताना शेवटचा टप्पा हा पाणी पुरवठा खंडित करण्याचा असतो तर महापालिकेने हे पाऊल देखील उचलले आहे. आतापर्यंत पालिकेने २०० नळ जोडण्या तोडल्या आहेत. ज्या नागरिकांची सर्वात जास्त कर थकबाकी आहे किंवा ज्यांना थोडीही मुदत दिली जाऊ शकत नाही अशा नागरिकांवर महापालिका अशा प्रकारे कारवाई करीत आहे.याचप्रमाणे महापालिका कर्मचारी मोठ मोठ्या इमारतींखाली टेबल लावून बसतात जेणे करून नागरिकांना महापालिकेत जावे लागणार नाही. नागरिकांनी या उपक्रमाला देखील चांगला प्रतिसाद दिला आहे. ज्यांना कर कुठे भरायचे हे माहित नाही किंवा कर कोणाकडे जमा करायचे हे माहित नाही त्यांच्यासाठी हा उपक्रम उपयुक्त आहे. तसेच शनिवार, रविवार देखील मालमत्ता कर विभाग सुरु ठेवण्यात आला आहे. नोकरी करणाºया नागरिकांना रविवारी सुट्टी असते, अशा नागरिकांसाठी देखील पालिकने उपाय योजना केली आहे.कर वसूल करण्याकरिता जे लागेल ते कायदेशीर प्रयत्न पालिकेकडून केले जात आहेत. नागरिकांनी लवकरात लवकर या प्रयत्नांना प्रतिसाद देऊन उर्वरीत थकबाकी भरावी असे आवाहन महापालिका मालमत्ता कर विभागा कडून केली जात आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळण्याची चिन्हे आहेत.आम्ही जे काही उपक्र म राबवत आहोत ते सगळे कायदेशीर आहेत आणि जे नवीन उपक्रम सुरु केले आहेत त्यांना देखील नागरिक प्रतिसाद देत आहेत. नागरिक इतर सर्व गोष्टींचे पैसे लगेच भरतात पण महापालिके कडे दुर्लक्ष करतात त्यामुळे नागरिकांची मानसिकता बदलणे गरजेचे आहे. - संजय हेरवाडे, मनपा उपआयुक्त

टॅग्स :Vasai Virarवसई विरार