शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
3
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
4
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
5
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
6
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
7
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
8
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
9
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
10
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
11
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
12
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
13
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
14
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
15
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
16
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
17
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
18
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
19
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
20
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट

कर वसुली करण्याकरिता नवीन उपाययोजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2019 23:24 IST

विरार वसई महानगरपालिकेने कर वसुलीची मोहीम हाती घेतली असून महापालिकेने कर न भरणाऱ्यांची नावे फलकावर लिहून ते फलक रस्त्याच्या मध्यभागी लावले आहे.

विरार : विरार वसई महानगरपालिकेने कर वसुलीची मोहीम हाती घेतली असून महापालिकेने कर न भरणाऱ्यांची नावे फलकावर लिहून ते फलक रस्त्याच्या मध्यभागी लावले आहे. तसेच थकबाकी न भरल्यास पाणी पुरवठा खंडित केला जाईल असा इशारा देखील पालिकेने दिला आहे.महापालिकेने नागरिकांना गेल्या अनेक वर्षात बºयाच सुविधा पुरवल्या आहेत तर या बदल्यात योग्य ती रक्कम कर म्हणून नागरिकांकडून घेतली आहे. पण काही नागरिकांनी अजूनही नियमित कर भरलेला नाही. अशा नागरिकांकडून कर वसूली करण्याकरीता शक्य असेल ती मोहीम महापालिका राबवत आहे. करांची उर्वरीत रक्कम नागरिकांकडून वसूल करण्याकरिता महापालिका शक्य असलेले सर्व प्रयत्न करत आहेत.२०१८-१९ मध्ये ९४७ जप्ती वसुली झालेल्या आहेत. २०१६-१७ मध्ये १२७ कोटींचा कर वसूल करण्यात आला तर २०१७-१८ मध्ये १६५ कोटींची कर वसूली झाली होती. यावर्षी महापालिकेने १८० कोटींचा आकडा पार केलेला आहे व ३०० कोटींचे उद्दीष्ट ठेवलेले आहे. आता पर्यंत कर वसुली करण्याबाबत व त्या बद्दल लोकांची मानसिकता बदलावी यासाठी महापालिका अधिकाºयांनी घरोघरी जाऊन जनजागृती केली, बाईक रॅली देखील काढली होती. सर्व प्रयत्न झाले तरी ज्याची जास्तच कर रक्कम बाकी आहे, अशा नागरिकांची नावे फलकावर लिहिण्यात आली आहेत. तसेच आचोळे, पेल्हार, चंदनसार, अर्नाळा, नवघर, माणिकपूर, वसई, बोळींज, वालीव या ९ प्रभागसमिती मधील थकबाकी असलेल्या नागरिकांची नावे फलकावर लिहून ते मुख्य रस्त्यावर देखील लावण्यात आले आहे. तर काही ठिकाणी कायदेशीर कारवाई करीत असताना शेवटचा टप्पा हा पाणी पुरवठा खंडित करण्याचा असतो तर महापालिकेने हे पाऊल देखील उचलले आहे. आतापर्यंत पालिकेने २०० नळ जोडण्या तोडल्या आहेत. ज्या नागरिकांची सर्वात जास्त कर थकबाकी आहे किंवा ज्यांना थोडीही मुदत दिली जाऊ शकत नाही अशा नागरिकांवर महापालिका अशा प्रकारे कारवाई करीत आहे.याचप्रमाणे महापालिका कर्मचारी मोठ मोठ्या इमारतींखाली टेबल लावून बसतात जेणे करून नागरिकांना महापालिकेत जावे लागणार नाही. नागरिकांनी या उपक्रमाला देखील चांगला प्रतिसाद दिला आहे. ज्यांना कर कुठे भरायचे हे माहित नाही किंवा कर कोणाकडे जमा करायचे हे माहित नाही त्यांच्यासाठी हा उपक्रम उपयुक्त आहे. तसेच शनिवार, रविवार देखील मालमत्ता कर विभाग सुरु ठेवण्यात आला आहे. नोकरी करणाºया नागरिकांना रविवारी सुट्टी असते, अशा नागरिकांसाठी देखील पालिकने उपाय योजना केली आहे.कर वसूल करण्याकरिता जे लागेल ते कायदेशीर प्रयत्न पालिकेकडून केले जात आहेत. नागरिकांनी लवकरात लवकर या प्रयत्नांना प्रतिसाद देऊन उर्वरीत थकबाकी भरावी असे आवाहन महापालिका मालमत्ता कर विभागा कडून केली जात आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळण्याची चिन्हे आहेत.आम्ही जे काही उपक्र म राबवत आहोत ते सगळे कायदेशीर आहेत आणि जे नवीन उपक्रम सुरु केले आहेत त्यांना देखील नागरिक प्रतिसाद देत आहेत. नागरिक इतर सर्व गोष्टींचे पैसे लगेच भरतात पण महापालिके कडे दुर्लक्ष करतात त्यामुळे नागरिकांची मानसिकता बदलणे गरजेचे आहे. - संजय हेरवाडे, मनपा उपआयुक्त

टॅग्स :Vasai Virarवसई विरार