शहरं
Join us  
Trending Stories
1
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
2
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
3
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
4
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
5
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
6
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
7
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
8
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 
9
MI vs GT : 'पॉवरप्ले'मध्ये DSP सिराजचा धाक! पहिल्याच ओव्हरमध्ये साधला विकेट्सचा डाव
10
मशिदीत होता हजारोंचा जमाव, मौलानाने विचारलं भारताविरोधात कोण लढणार? हात वर करा, मग घडलं असं काही...
11
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप
12
चीनला मोठा धक्का; iPhone चे सर्व मॉडेल्स भारतात तयार होणार, केंद्रीय मंत्र्यांची माहिती...
13
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
14
वैभव सूर्यवंशी नंतर आणखी एका 14 वर्षीय स्फोटक खेळाडूने झळकावले द्विशतक, कोण आहे तो?
15
जीवघेण्या फंगसचा अलर्ट! वाढत्या तापमानामुळे येईल नवं संकट; तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा
16
पाकिस्तानने मर्यादा ओलांडल्या, आता अद्दल घडवावी लागेल..; काश्मीरमधून ओवेसींचा निशाणा
17
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
18
कोहलीच्या पोस्टरसमोर बकऱ्याचा बळी, आरसीबीच्या ३ चाहत्यांना अटक, कारण ऐकूण पोलीसही चक्रावले
19
चीनचा पाकिस्तानसोबत डबल गेम! UN परिषदेत भेटी-गाठींचा देखावा; पण बाजूने एक शब्दही नाही बोलला
20
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...

भरवादळात ‘गंगा’ने वाचवली न्यू धवल

By admin | Updated: August 7, 2016 03:35 IST

सातपाटी बंदरातून मासेमारी साठी गेलेली न्यूधवल ही नौका १४ खलाशांसह तुफानी वादळ, वाऱ्यामध्ये खोल समुद्रात तीन दिवसा पासून बंद अवस्थेत अडकून पडलेली होती.

- हितेन नाईक, पालघर

पालघर : सातपाटी बंदरातून मासेमारी साठी गेलेली न्यूधवल ही नौका १४ खलाशांसह तुफानी वादळ, वाऱ्यामध्ये खोल समुद्रात तीन दिवसा पासून बंद अवस्थेत अडकून पडलेली होती. कोस्ट गार्ड ही समुद्राचे रौद्र रूप पाहून वेळीच मदतीसाठी धाव घेत नसताना, मच्छीमारांच्या मदतीसाठी नेहमीच अग्रेसर असलेल्या अनिल चौधरी यांनी आपल्या सात साथीदारासह हरहर गंगा ही नौका समुद्रात उतरवून त्या संकटग्रस्त नौकेसह १४ खलाशांना किनाऱ्यावर सुखरूप आणण्यात यश मिळविले. गेल्या सहा दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असून नदी, नाले, धरण, भरभरून वाहत असताना समुद्रानेही रौद्र रूप धारण केले होते. ह्या ओढवलेल्या प्रलयाने सर्वत्र एकच हाहा:कार माजला होता. या प्रलयकारी वातावरणा मध्ये मदतकार्य पोहचविण्यासाठी प्रशासनही प्रयत्न करीत होते तरी या निसर्गाच्या रु द्रावतारा पुढे ते कमी पडत असल्याचे दिसून येत होते. ४ आॅगस्टपासून पावसाळी बंदी कालावधी संपून मासेमारीला परवानगी मिळाल्या नंतर मुसळधार पावसामुळे पालघर जिल्ह्यातील नौका समुद्रात जाऊ शकल्या नव्हत्या. समुद्र खवळलेला असल्याने माशांचे एकत्र फिरणारे थवे आपापल्या जाळ्यात पकडण्यासाठी सर्वच मच्छीमाराचे हात शिवशिवत होते. परंतु समद्रात उसळणाऱ्या महाकाय लाटा आणि वादळी वाऱ्यामुळे वातावरण शांत होण्याची वाट मच्छीमार पाहत होते. गुरूवारी वातावरण थोडे शांत झाल्या नंतर दुपारी ‘न्यू धवल’ नौकेसह अन्य ९ नौका मासेमारी साठी निघाल्या. समुद्रात ८ ते ९ नॉटिकल गेल्यावर न्यू धवल ही नौका रात्री इंजिन नादुरुस्त झाल्याने बंद पडली. तसा निरोप वायरलेस सेटद्वारे मालक धनजी मेहेर याना दिल्या नंतर त्यांचा संपर्क तुटला.त्यामुळे त्यांच्या घरासह गावात चिंतेचे वातावरण पसरले. त्यातच हवामान खात्याने मच्छीमारांनी समुद्रात मासेमारिला जाऊ नये असा इशारा दिल्याने सर्वांच्या चिंतेत वाढ झाली. गुरुवारी रात्रीपासून इंजिन बंद पडलेल्या नौकेची बॅटरी ही उतरल्याने न्यू धवल नौकेचा सर्वांशी संपर्क तुटला होता. अशा वेळी नौकेवरील लोयली (अँकर) समुद्रात टाकून सर्व लोक २ दिवस उपाशी तापाशी देवांचा धावा करीत पडून होते. चंदू नावाचा खलाशी आजारी पडल्याने तो मोठमोठ्याने रडत होता. परंतु सर्वा पुढे हातबलतेने पाहण्याशिवाय गत्यंतर नसल्याचे प्रशांत देव यांनी सांगितले. रात्रीच्या काळोखात तीन महाकाय लाटा आमच्या नौकेवर आदळल्या नंतर आम्ही जगण्याची आशाच सोडून दिल्याचे नौकेचे प्रमुख तांडेल चंदन देव यांनी लोकमतला सांगितले.शेवटी मच्छीमारच ठरले त्यांच्यासाठी देवदूतशुक्र वार, शनिवार दोन दिवस पावसाने पुन्हा रोद्र रूप धारण केल्याने सातपाटी सागरी पोलीस स्टेशन चे सहा.पोलीस निरीक्षक केदार शिंदे यांनी कोस्ट गार्ड शी संपर्क साधून मदत उपलब्ध करून देण्याचे कळविले होते. मात्र त्यांच्या कडून ती वेळीच उपलब्ध होत नसल्याचे दिसून आल्या नंतर नातेवाईक असलेल्या पंढरी भास्कर मेहेर यांनी आपली हरहर गंगे ही नौका दिली. अनेक वेळा संकटग्रस्त मच्छीमारांच्या मदतीसाठी धावून जाणारे अनिल चौधरी यांनी भूषण मेहेर, सुंदर पाटील,राम केणी,संदीप पाटील,धीरज मेहेर,मिलन तांडेल यांनी त्या नौकेसह समुद्रात शुक्रवारी रात्री २ वाजता काळोखात झेप घेतली. वादळी वारे आणि तुफानी लाटाना छेदत ही नौका ५ तासांनी न्यूधवलजवळ पोहोचली. १५ ते २० फुटांच्या लाटांना थोपवित बंद पडलेल्या नौकेला दोरखंडाने बांधून आणणे खूप जोखमीचे होते.या सर्व प्रतिकूल परिस्थितीशी सामना करीत शेवटी न्यू धवल नौका आज दुपारी १४ खलशासह सुखरूप सातपाटी बंदरात शिरली आणि सर्वांनी सुटकेचा एकच निश्वास टाकला.