शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

ना अपघाताची भीती ना दंडाची; दुचाकी चालविताना मोबाइलवर बोलणारे वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 01:15 IST

वर्षभरात ३८४९ वाहनचालकांवर कारवाई : ६ लाख ६७ हजारांचा दंड वसूल

सुनील घरत लाेकमत न्यूज नेटवर्कपारोळ : मोबाइल ही आज जीवनावश्यक बाब बनली असून ज्याच्याकडे मोबाइल नाही असा माणूस मिळणे दुर्मीळ बनले आहे. दुसरीकडे आज दुचाकी चालवताना मोबाइलवर बोलणे ही एक फॅशन झाली आहे. या जीवघेण्या फॅशनचे अनुकरण दुचाकी चालवताना अनेक जण करत आहेत. ना त्यांना अपघाताची भीती, ना दंडाची, ना कुटुंबाची, अनेकदा ट्रक चालवणारेसुद्धा एका हातात मोबाइल व एका हाताने वाहन चालवतात. त्यामुळे नाहक निरपराध नागरिकांचा बळी जाण्याचा धोकाही वाढला आहे.दरम्यान, वर्षभरात गाडी चालवताना मोबाइलवर बोलणाऱ्यांवर वाहतूक विभागाने मोठी कारवाई  केली असून त्यांच्याकडून दंडही वसूल केला आहे.   वाहन चालवताना मोबाइलवर बोलणे हे धोक्याचे असते. यामुळे अपघात होऊन चालकाचा मृत्यू झाल्याच्या घटना वाढत आहेत. वसई, विरार, नालासोपारा परिसरात अनेक वाहनचालकांना वाहन चालविताना मोबाइलवर बोलताना वाहतूक पोलिसांनी पकडले. त्यात ३ हजार ८४९ वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.  वाहन चालविताना मोबाइलवर बोलल्यास अपघात होण्याची शक्यता असते. हे वाहनचालकांना माहिती असतानाही वाहनचालक वाहने चालवताना हा नियम मोडतात. मोबाइल आजघडीला अत्यावश्यक वस्तू बनली असली तरी काही ठिकाणी मोबाइलचा वापर करणे टाळावे. परंतु जीवाची पर्वा न करता मोबाइलवर सतत लागून राहणे हे अनेकांच्या जीवावर बेतले आहे. यामुळे वाहतूक शाखेच्या पोलिसांनी जानेवारी ते डिसेंबरपर्यंत मोठ्या प्रमाणात कारवाई केली आहे. 

वाहनचालकांची बेफिकिरीवाहन चालविताना मोबाइलवर बोलणाऱ्या ३ हजार ८४९ वाहनचालकांना पकडून त्यांच्याकडून ७ लाख ६७ हजारांचा दंड वसूल केला गेला आहे. मोबाइलवर बोलत असताना वाहन चालवू नये किंवा वाहन चालवताना कुणाचा फोन आला तरीही तो फोन उचलू नये, असे वाहतूक नियम आहेत. मात्र वाहनचालक नियम मोडून आपल्याच धुंदीत वाहन चालवतात. 

प्रवास करीत असताना मोबाइलवर बोलताना आढळल्यास संबंधित वाहनचालकांकडून प्रत्येकी २०० रुपये दंड घेतला जात आहे. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर कारवाईसाठी पोलिसांकडून नाकाबंदी करण्यात येते. वाहन चालवताना मोबाइलवर बोलण्यास बंदी असल्याने अशा वाहनचालकांवर कारवाई करून दंड वसूल केला जातो. ही कारवाई सतत सुरूच असते.- विलास सुपे, वाहतूक पोलीस अधिकारी