शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
2
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
3
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
4
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
5
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
6
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
7
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
8
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
9
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
10
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
11
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
12
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
13
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
14
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
15
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
16
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
17
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
18
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
19
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
20
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...

ना अपघाताची भीती ना दंडाची; दुचाकी चालविताना मोबाइलवर बोलणारे वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 01:15 IST

वर्षभरात ३८४९ वाहनचालकांवर कारवाई : ६ लाख ६७ हजारांचा दंड वसूल

सुनील घरत लाेकमत न्यूज नेटवर्कपारोळ : मोबाइल ही आज जीवनावश्यक बाब बनली असून ज्याच्याकडे मोबाइल नाही असा माणूस मिळणे दुर्मीळ बनले आहे. दुसरीकडे आज दुचाकी चालवताना मोबाइलवर बोलणे ही एक फॅशन झाली आहे. या जीवघेण्या फॅशनचे अनुकरण दुचाकी चालवताना अनेक जण करत आहेत. ना त्यांना अपघाताची भीती, ना दंडाची, ना कुटुंबाची, अनेकदा ट्रक चालवणारेसुद्धा एका हातात मोबाइल व एका हाताने वाहन चालवतात. त्यामुळे नाहक निरपराध नागरिकांचा बळी जाण्याचा धोकाही वाढला आहे.दरम्यान, वर्षभरात गाडी चालवताना मोबाइलवर बोलणाऱ्यांवर वाहतूक विभागाने मोठी कारवाई  केली असून त्यांच्याकडून दंडही वसूल केला आहे.   वाहन चालवताना मोबाइलवर बोलणे हे धोक्याचे असते. यामुळे अपघात होऊन चालकाचा मृत्यू झाल्याच्या घटना वाढत आहेत. वसई, विरार, नालासोपारा परिसरात अनेक वाहनचालकांना वाहन चालविताना मोबाइलवर बोलताना वाहतूक पोलिसांनी पकडले. त्यात ३ हजार ८४९ वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.  वाहन चालविताना मोबाइलवर बोलल्यास अपघात होण्याची शक्यता असते. हे वाहनचालकांना माहिती असतानाही वाहनचालक वाहने चालवताना हा नियम मोडतात. मोबाइल आजघडीला अत्यावश्यक वस्तू बनली असली तरी काही ठिकाणी मोबाइलचा वापर करणे टाळावे. परंतु जीवाची पर्वा न करता मोबाइलवर सतत लागून राहणे हे अनेकांच्या जीवावर बेतले आहे. यामुळे वाहतूक शाखेच्या पोलिसांनी जानेवारी ते डिसेंबरपर्यंत मोठ्या प्रमाणात कारवाई केली आहे. 

वाहनचालकांची बेफिकिरीवाहन चालविताना मोबाइलवर बोलणाऱ्या ३ हजार ८४९ वाहनचालकांना पकडून त्यांच्याकडून ७ लाख ६७ हजारांचा दंड वसूल केला गेला आहे. मोबाइलवर बोलत असताना वाहन चालवू नये किंवा वाहन चालवताना कुणाचा फोन आला तरीही तो फोन उचलू नये, असे वाहतूक नियम आहेत. मात्र वाहनचालक नियम मोडून आपल्याच धुंदीत वाहन चालवतात. 

प्रवास करीत असताना मोबाइलवर बोलताना आढळल्यास संबंधित वाहनचालकांकडून प्रत्येकी २०० रुपये दंड घेतला जात आहे. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर कारवाईसाठी पोलिसांकडून नाकाबंदी करण्यात येते. वाहन चालवताना मोबाइलवर बोलण्यास बंदी असल्याने अशा वाहनचालकांवर कारवाई करून दंड वसूल केला जातो. ही कारवाई सतत सुरूच असते.- विलास सुपे, वाहतूक पोलीस अधिकारी