शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
2
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
3
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
4
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
5
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
6
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
7
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
8
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
9
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
10
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
11
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
12
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी
13
बापासमोरच दोन वर्षाच्या मुलाला जबड्यात धरून बिबट्या पसार; १५० जवानांकडून शोधमोहिम, मृतदेह सापडला
14
आपली मुलगी राजकारणात येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले, म्हणाले...
15
लवकरच बाजारात येतेय Toyota ची Mini Fortuner! महाराष्ट्रातल्या 'या' शहरात होणार उत्पादन; किती असू शकते किंमत? जाणून घ्या
16
तंत्रज्ञानाची किमया! सॅमसंगने AI Home केलं लाँच; आता घर होईल स्मार्ट, फक्त एक क्लिक अन्...
17
तांत्रिक बिघाड की मोसादचा हात? संयुक्त राष्ट्रांत पॅलेस्टाईनवर चर्चा होताच ४ बड्या नेत्यांचा माईक बंद  
18
पद्मश्री ज्येष्ठ लेखक एस. एल. भैरप्पा काळाच्या पडद्याआड; पंतप्रधान मोदींसह राष्ट्रपतींनी वाहिली श्रद्धांजली
19
लडाखमधील आंदोलनाला हिंसक वळण, जाळपोळ, लेहमध्ये ४ जणांचा मृत्यू, ७० जण जखमी 
20
हलगर्जीपणाचा कळस! सरकारी रुग्णालयात दुसऱ्याच पायाची सर्जरी, ऑक्सिजन मास्क काढला अन्...

अनेक वनराई बंधा-यांची गरज, विक्रमगड तालुक्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2017 02:37 IST

विक्रमगड : महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेस विक्रमगड तालुक्यात चांगला प्रतिसाद असून संभाव्य पाणी टंचाईवर मात करण्यासाठी शासनाने विक्रमगड पंचायत समितीतर्फे प्रस्तावानुसार वनराई बंधा-यांची कामे हाती घ्यावी अशी मागणी राष्ट्रवादी कॉग्रेसचे तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर(शिवा) सांबरे यांनी केली आहे़

विक्रमगड : महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेस विक्रमगड तालुक्यात चांगला प्रतिसाद असून संभाव्य पाणी टंचाईवर मात करण्यासाठी शासनाने विक्रमगड पंचायत समितीतर्फे प्रस्तावानुसार वनराई बंधा-यांची कामे हाती घ्यावी अशी मागणी राष्ट्रवादी कॉग्रेसचे तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर(शिवा) सांबरे यांनी केली आहे़भात शेती हंगाम हा संपला असल्याने आता मजुरांच्या हाताला काम नाही व त्यांचे इतर शहराच्या ठिकाणी कामासाठी स्थलांतर होण्यापूर्वी त्यांना स्थानिक पातळीवर काम देणे गरजेचे आहे़ तसेच सध्या पावसाचे पाणी ओहोळ, छोटी नदी, नाले, यामध्ये अद्यापही आहे. ते वाहून जाऊ नये त्याचा आणखी काही महिने उपयोग व्हावा यासाठी राजगार हमी योजनेतून वनराई बंधा-यांची कामे हाती घेणे आवश्यक आहे़गेल्या काही वर्षांपासून विक्रमगड तालुक्यातील वनराई बंधा-याची कामे मंदावली आहेत़ यंदा बंधा-यांची कामे कधी चालू करणार असा सवाल मजुराकडून विचारला जात आहे़ कारण पाण्याचे साठे कमी झाल्यावर बंधारे बांधून उपयोग काय? इतर तालुक्यात वनराई बंधाºयांची कामे कधीच सुरू झाली आहेत.विक्रमगड तालुक्यात रोजगार हमी योजनेेंतर्गत गेल्यावर्षीच्या नोंदणीनुसार ६७ हजार मजुर कुंटुंबाची नोंदणी करण्यांत आली आहे़ तर त्यांना शंभरटक्के जॉबकार्ड देण्यांत आले आहेत तर त्याप्रमाणे लाभार्थ्यांची खातीही उघडण्यांत आली आहेत़पर्जन्याचे प्रमाण कमी झाल्याने दिवसेंदिवस भूजल पातळी कमी होऊन सर्वत्र पाणी टंचाईची समस्या तीव्र होत चाललेली आहे़ त्यामुळे पडणाºया पावसाचे पाणी योग्य रितीने अडविल्यास त्याचा उपयोग शेतीसाठी, गुरांना पिण्यासाठी होईलच, परंतु भूजलाची पातळी ही वाढून पाणी टंचाईवर मात करता येईल़ यामुळे पंचायत समितीकडून ग्रामपंचायत हद्दीतील प्रस्ताव मागवून ओहोळ, छोटी नदी, नाले यावर वनराई बंधाºयांची कामे हाती घेतली जावी अशी मागणी आहे़>वनराई बंधाºयांचे असंख्य फायदेरोजगार हमी योजनेतून मजुरांना स्थानिक पातळीवरच कामे उपलब्ध होतात़ भुजल पातळी वाढवुन पाणी टंचाईच्या समस्या कमी होण्यास मदत होते, या पाण्यातून शेतक-यांना हंगामी भाजीपाला लागवडीसाठी उपयोग होतो. गुरांना पिण्याच्या पाण्याची सोंय होते़कसे तयार होतांत वनराई बंधारेयासाठी सिमेंटच्या रिकाम्या गोण्यांची आवश्यकता असते, या रिकाम्या गोण्यांमध्ये रेती व माती भरुन हे वनराई बंधारे बांधले जातात़ त्यामुळे या वनराई बंधा-यांवर रोजगार हमीतून मजुरांना स्थानिक पातळीवरच रोजगाराची संधी उपलब्ध होत असते़ तसेच त्यांच्या बांधकामावर होणारा खर्चही अत्यंत अल्प असतो. त्यामुळे ते कितीही मोठ्या संख्येने बांधता येतात.