शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत आधी लढाई, आता नरमाई; भाजप-शिंदेसेनेत आता होणार चर्चा
2
२० वर्षांचा ईएमआय १५ वर्षांत संपणार, घर-वाहन कर्ज झाले आणखी स्वस्त, ‘आरबीआय’कडून रेपो दरात कपात
3
इंडिगो नव्हे, इंडि-नो-गो! दिवसभरात १ हजार उड्डाणे, ३ दिवसांत २ हजारांपेक्षा जास्त विमानसेवा रद्द
4
IndiGo: विमानाला १२ तास विलंब, मदन लाल इंडिगोवर भडकले, विमानतळाला 'फिश मार्केट' म्हणाले!
5
Netflix-Warner Bros Deal: नेटफ्लिक्सनं वॉर्नर ब्रदर्सच्या खरेदीची केली घोषणा; पाहा किती कोटींना झाली ही धमाकेदार डील
6
मारायचं होतं एकीला, हत्या केली दुसऱ्याच शिक्षिकेची, धक्कादायक माहिती आली समोर  
7
इंडिगो विमान संकट, रेल्वेने मोर्चा सांभाळला, ३७ ट्रेनमध्ये वाढवले ११६ डबे, या दोन स्टेशनदरम्यान धावणार विशेष ट्रेन
8
RBI नं रेपो दरात कपात करताच 'या' दोन सरकारी बँकांनी कर्ज केली स्वस्त; पाहा काय आहेत नवे दर?
9
आजचे राशीभविष्य, ०६ डिसेंबर २०२५: कुटुंबात मतभेदाचे प्रसंग उद्भवतील, नवीन कामात अपयशी होण्याची शक्यता
10
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम निमिष कुलकर्णी अडकला विवाहबंधनात, पत्नीचं मराठी कलाविश्वाशी आहे खास कनेक्शन
11
रशिया भारताला अखंड तेलपुरवठा करत राहणार; आर्थिक सहकार्याचा ५ वर्षांचा आराखडा निश्चित
12
अजबच! अचानक खेळपट्टीने गिळला चेंडू आणि सामनाच करावा लागला रद्द, WBBL मध्ये नेमकं काय घडलं?   
13
आरक्षण देणाऱ्या मुख्यमंत्र्यांप्रति अनाथ कृतज्ञ होतात तेव्हा...; वर्षा निवासस्थानी पार पडला भावुक सोहळा
14
विशेष लेख: ‘आधी, नंतर आणि शेवटीही फक्त भारतीयच!’  
15
वर्षात चार वेळा ईएमआय झाला कमी!घर, कार घेणे स्वस्त; आरबीआयचा सर्वसामान्यांना दिलासा
16
मध्य रेल्वे मनी लाँड्रिंग: ‘क्लोजर रिपोर्ट’ विशेष न्यायालयाने स्वीकारला, आठ अधिकाऱ्यांचे प्रकरण काय?
17
‘नगरां’च्या निवडणुकीची २१ डिसेंबरलाच मतमोजणी; खंडपीठाचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून कायम
18
शाकाहारी असाल तरच तुम्हाला फ्लॅट देणार! मराठी माणसाला नाकारले घर?
19
“४० वर्षीय तरुणाला लाजवणारी कार्यक्षमता, २०२९ ला मोदीच PM असतील”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
20
शिक्षकांचे संच मान्यता निकष, टीईटी सक्तीविरोधात आंदोलन; मुंबईमध्ये शाळा बंदला संमिश्र प्रतिसाद
Daily Top 2Weekly Top 5

अनेक वनराई बंधा-यांची गरज, विक्रमगड तालुक्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2017 02:37 IST

विक्रमगड : महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेस विक्रमगड तालुक्यात चांगला प्रतिसाद असून संभाव्य पाणी टंचाईवर मात करण्यासाठी शासनाने विक्रमगड पंचायत समितीतर्फे प्रस्तावानुसार वनराई बंधा-यांची कामे हाती घ्यावी अशी मागणी राष्ट्रवादी कॉग्रेसचे तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर(शिवा) सांबरे यांनी केली आहे़

विक्रमगड : महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेस विक्रमगड तालुक्यात चांगला प्रतिसाद असून संभाव्य पाणी टंचाईवर मात करण्यासाठी शासनाने विक्रमगड पंचायत समितीतर्फे प्रस्तावानुसार वनराई बंधा-यांची कामे हाती घ्यावी अशी मागणी राष्ट्रवादी कॉग्रेसचे तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर(शिवा) सांबरे यांनी केली आहे़भात शेती हंगाम हा संपला असल्याने आता मजुरांच्या हाताला काम नाही व त्यांचे इतर शहराच्या ठिकाणी कामासाठी स्थलांतर होण्यापूर्वी त्यांना स्थानिक पातळीवर काम देणे गरजेचे आहे़ तसेच सध्या पावसाचे पाणी ओहोळ, छोटी नदी, नाले, यामध्ये अद्यापही आहे. ते वाहून जाऊ नये त्याचा आणखी काही महिने उपयोग व्हावा यासाठी राजगार हमी योजनेतून वनराई बंधा-यांची कामे हाती घेणे आवश्यक आहे़गेल्या काही वर्षांपासून विक्रमगड तालुक्यातील वनराई बंधा-याची कामे मंदावली आहेत़ यंदा बंधा-यांची कामे कधी चालू करणार असा सवाल मजुराकडून विचारला जात आहे़ कारण पाण्याचे साठे कमी झाल्यावर बंधारे बांधून उपयोग काय? इतर तालुक्यात वनराई बंधाºयांची कामे कधीच सुरू झाली आहेत.विक्रमगड तालुक्यात रोजगार हमी योजनेेंतर्गत गेल्यावर्षीच्या नोंदणीनुसार ६७ हजार मजुर कुंटुंबाची नोंदणी करण्यांत आली आहे़ तर त्यांना शंभरटक्के जॉबकार्ड देण्यांत आले आहेत तर त्याप्रमाणे लाभार्थ्यांची खातीही उघडण्यांत आली आहेत़पर्जन्याचे प्रमाण कमी झाल्याने दिवसेंदिवस भूजल पातळी कमी होऊन सर्वत्र पाणी टंचाईची समस्या तीव्र होत चाललेली आहे़ त्यामुळे पडणाºया पावसाचे पाणी योग्य रितीने अडविल्यास त्याचा उपयोग शेतीसाठी, गुरांना पिण्यासाठी होईलच, परंतु भूजलाची पातळी ही वाढून पाणी टंचाईवर मात करता येईल़ यामुळे पंचायत समितीकडून ग्रामपंचायत हद्दीतील प्रस्ताव मागवून ओहोळ, छोटी नदी, नाले यावर वनराई बंधाºयांची कामे हाती घेतली जावी अशी मागणी आहे़>वनराई बंधाºयांचे असंख्य फायदेरोजगार हमी योजनेतून मजुरांना स्थानिक पातळीवरच कामे उपलब्ध होतात़ भुजल पातळी वाढवुन पाणी टंचाईच्या समस्या कमी होण्यास मदत होते, या पाण्यातून शेतक-यांना हंगामी भाजीपाला लागवडीसाठी उपयोग होतो. गुरांना पिण्याच्या पाण्याची सोंय होते़कसे तयार होतांत वनराई बंधारेयासाठी सिमेंटच्या रिकाम्या गोण्यांची आवश्यकता असते, या रिकाम्या गोण्यांमध्ये रेती व माती भरुन हे वनराई बंधारे बांधले जातात़ त्यामुळे या वनराई बंधा-यांवर रोजगार हमीतून मजुरांना स्थानिक पातळीवरच रोजगाराची संधी उपलब्ध होत असते़ तसेच त्यांच्या बांधकामावर होणारा खर्चही अत्यंत अल्प असतो. त्यामुळे ते कितीही मोठ्या संख्येने बांधता येतात.