शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
2
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
3
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
4
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
5
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
6
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
7
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
8
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
9
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
10
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
11
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
12
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
13
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
14
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
15
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
16
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
17
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
18
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
19
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
20
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका

वसई मनपात १६०० पदांची गरज

By admin | Updated: November 18, 2015 00:11 IST

महानगरपालिकेने कर्मचारी भरतीसंदर्भातील बिंदुनियमावली शासनाकडे पाठवली असून अद्याप त्यास मंजुरी मिळालेली नाही. त्यामुळे महानगरपालिकेच्या प्रशासकीय कामकाजावर

वसई : महानगरपालिकेने कर्मचारी भरतीसंदर्भातील बिंदुनियमावली शासनाकडे पाठवली असून अद्याप त्यास मंजुरी मिळालेली नाही. त्यामुळे महानगरपालिकेच्या प्रशासकीय कामकाजावर परिणाम जाणवू लागला आहे. अनेक विभागाची कामे ठेकेदारीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून करून घेण्यात येत आहेत. ही कामे वेळेवर होत नसल्यामुळे प्रशासकीय अडचणी निर्माण झाल्या आहेत.महानगरपालिकेमध्ये गेली ६ वर्षे हजारो कर्मचारी ठेक्यावर काम करीत आहेत. महानगरपालिका निर्मितीच्या वेळी ज्या ग्रामपंचायतींना महानगरपालिकेत सामावून घेण्यात आले. त्या ग्रामपंचायतीमधील सर्व कर्मचाऱ्यांना महानगरपालिका सेवेत घेण्यात आले. या सर्व कर्मचाऱ्यांना ग्रामपंचायतीच्या कामकाजाचा अनुभव तर दुसरीकडे ठेक्यावरील कामगारांना शून्य अनुभव अशा परिस्थितीमध्ये मनपाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गेली ६ वर्षे महानगरपालिकेचे प्रशासन चालवले. त्याचा काही प्रमाणात विकासकामांवर परिणामही जाणवला. यासंदर्भात महानगरपालिकेने राज्यशासनाकडे प्रस्ताव पाठवला असून १६०० पदे त्वरीत भरणे आवश्यक आहे. परंतु राज्यशासनाच्या नगरविकास विभागाकडून याकामी सतत दिरंगाई होत आहे. सध्या महानगरपालिकेचे कामकाज विस्कळीत झाले असून विकासकामे करणाऱ्या ठेकेदारांची बिले लवकर निघतात परंतु इतर कंपन्यांची बिले मात्र आठ ते नऊ महिने रखडली आहेत. त्यापैकी अनेक बिले हरवल्याचे सांगण्यात येते. महानगरपालिकेचे कामकाज सुचारू पद्धतीने होण्याकरीता महत्वाची पदे त्वरीत भरणे गरजेचे आहे. (प्रतिनिधी)