शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
3
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
4
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
5
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
6
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
7
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
8
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
9
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
10
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
11
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
12
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
13
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
14
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
15
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
16
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
17
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
18
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
19
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
20
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

वसई मनपात १६०० पदांची गरज

By admin | Updated: November 18, 2015 00:11 IST

महानगरपालिकेने कर्मचारी भरतीसंदर्भातील बिंदुनियमावली शासनाकडे पाठवली असून अद्याप त्यास मंजुरी मिळालेली नाही. त्यामुळे महानगरपालिकेच्या प्रशासकीय कामकाजावर

वसई : महानगरपालिकेने कर्मचारी भरतीसंदर्भातील बिंदुनियमावली शासनाकडे पाठवली असून अद्याप त्यास मंजुरी मिळालेली नाही. त्यामुळे महानगरपालिकेच्या प्रशासकीय कामकाजावर परिणाम जाणवू लागला आहे. अनेक विभागाची कामे ठेकेदारीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून करून घेण्यात येत आहेत. ही कामे वेळेवर होत नसल्यामुळे प्रशासकीय अडचणी निर्माण झाल्या आहेत.महानगरपालिकेमध्ये गेली ६ वर्षे हजारो कर्मचारी ठेक्यावर काम करीत आहेत. महानगरपालिका निर्मितीच्या वेळी ज्या ग्रामपंचायतींना महानगरपालिकेत सामावून घेण्यात आले. त्या ग्रामपंचायतीमधील सर्व कर्मचाऱ्यांना महानगरपालिका सेवेत घेण्यात आले. या सर्व कर्मचाऱ्यांना ग्रामपंचायतीच्या कामकाजाचा अनुभव तर दुसरीकडे ठेक्यावरील कामगारांना शून्य अनुभव अशा परिस्थितीमध्ये मनपाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गेली ६ वर्षे महानगरपालिकेचे प्रशासन चालवले. त्याचा काही प्रमाणात विकासकामांवर परिणामही जाणवला. यासंदर्भात महानगरपालिकेने राज्यशासनाकडे प्रस्ताव पाठवला असून १६०० पदे त्वरीत भरणे आवश्यक आहे. परंतु राज्यशासनाच्या नगरविकास विभागाकडून याकामी सतत दिरंगाई होत आहे. सध्या महानगरपालिकेचे कामकाज विस्कळीत झाले असून विकासकामे करणाऱ्या ठेकेदारांची बिले लवकर निघतात परंतु इतर कंपन्यांची बिले मात्र आठ ते नऊ महिने रखडली आहेत. त्यापैकी अनेक बिले हरवल्याचे सांगण्यात येते. महानगरपालिकेचे कामकाज सुचारू पद्धतीने होण्याकरीता महत्वाची पदे त्वरीत भरणे गरजेचे आहे. (प्रतिनिधी)