शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच घेतली
2
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
3
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
4
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
5
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
6
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
7
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
8
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
9
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
10
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
11
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
12
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
13
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
14
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
15
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?
16
युक्रेनसाठी सर्वात भयावह रात्र! रशियाने केला सर्वात मोठा ड्रोन हल्ला, अनेक शहरे उद्ध्वस्त
17
99 टक्क्यांहूनही अधिकने घसरून थेट 60 पैशांवर आला होता हा पॉवर शेअर, आता 2857 टक्क्यांची तुफान तेजी!
18
लॉस एंजेलिसमध्ये भडकला हिंसाचार, पत्रकाराला अचानक लागली गोळी; अंगावर शहारा आणणारं दृष्य कॅमेऱ्यात कैद
19
"पतीला मारले, मग माझं अपहरण करून..." सोनमच्या कहाणीनं राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट

वसई मनपात १६०० पदांची गरज

By admin | Updated: November 18, 2015 00:11 IST

महानगरपालिकेने कर्मचारी भरतीसंदर्भातील बिंदुनियमावली शासनाकडे पाठवली असून अद्याप त्यास मंजुरी मिळालेली नाही. त्यामुळे महानगरपालिकेच्या प्रशासकीय कामकाजावर

वसई : महानगरपालिकेने कर्मचारी भरतीसंदर्भातील बिंदुनियमावली शासनाकडे पाठवली असून अद्याप त्यास मंजुरी मिळालेली नाही. त्यामुळे महानगरपालिकेच्या प्रशासकीय कामकाजावर परिणाम जाणवू लागला आहे. अनेक विभागाची कामे ठेकेदारीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून करून घेण्यात येत आहेत. ही कामे वेळेवर होत नसल्यामुळे प्रशासकीय अडचणी निर्माण झाल्या आहेत.महानगरपालिकेमध्ये गेली ६ वर्षे हजारो कर्मचारी ठेक्यावर काम करीत आहेत. महानगरपालिका निर्मितीच्या वेळी ज्या ग्रामपंचायतींना महानगरपालिकेत सामावून घेण्यात आले. त्या ग्रामपंचायतीमधील सर्व कर्मचाऱ्यांना महानगरपालिका सेवेत घेण्यात आले. या सर्व कर्मचाऱ्यांना ग्रामपंचायतीच्या कामकाजाचा अनुभव तर दुसरीकडे ठेक्यावरील कामगारांना शून्य अनुभव अशा परिस्थितीमध्ये मनपाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गेली ६ वर्षे महानगरपालिकेचे प्रशासन चालवले. त्याचा काही प्रमाणात विकासकामांवर परिणामही जाणवला. यासंदर्भात महानगरपालिकेने राज्यशासनाकडे प्रस्ताव पाठवला असून १६०० पदे त्वरीत भरणे आवश्यक आहे. परंतु राज्यशासनाच्या नगरविकास विभागाकडून याकामी सतत दिरंगाई होत आहे. सध्या महानगरपालिकेचे कामकाज विस्कळीत झाले असून विकासकामे करणाऱ्या ठेकेदारांची बिले लवकर निघतात परंतु इतर कंपन्यांची बिले मात्र आठ ते नऊ महिने रखडली आहेत. त्यापैकी अनेक बिले हरवल्याचे सांगण्यात येते. महानगरपालिकेचे कामकाज सुचारू पद्धतीने होण्याकरीता महत्वाची पदे त्वरीत भरणे गरजेचे आहे. (प्रतिनिधी)