शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
2
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
4
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
5
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
6
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
7
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
8
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
9
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
10
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
11
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
12
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
13
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
14
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
15
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
16
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
17
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
18
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
19
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
20
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

By admin | Updated: January 10, 2017 05:34 IST

रिझर्व्ह बँकेनी जिल्हा सहकारी बँकांवर घातलेल्या अनेक निर्बंधामुळे ग्रामीण सहकारी संस्था, पतपेढ्याचा व्यवहार ढासळला

पालघर : रिझर्व्ह बँकेनी जिल्हा सहकारी बँकांवर घातलेल्या अनेक निर्बंधामुळे ग्रामीण सहकारी संस्था, पतपेढ्याचा व्यवहार ढासळला असून रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा न झाल्याने त्यांना लागवडी पासून वंचित राहावे लागत असल्याच्या निषेधार्थ आज पालघर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.पंतप्रधान मोदींनी ८ नोव्हेंबर रोजी पाचश व एक हजाराच्या नोटा चलनातून बाद केल्यानंतर कोलमडलेली अर्थव्यवस्था सुरळीत होण्यासाठी त्यांनी ५० दिवसांचा कालावधी जनते कडून मागितला होता. मात्र आज ६१ दिवसाचा कालावधी उलटल्यानंतरही चलन तुटवड्याची गंभीर परिस्थिती कायम आहे. रिझर्व्ह बँकेने ग्रामीण भागातील गरीब जनतेची बँक समजल्या जाणाऱ्या सर्व सहकारी जिल्हा बँका, पतपेढ्या यांच्या व्यवहारावर अनेक निर्बंध घातल्याचा परिणाम सर्वसामान्य जनतेला भोगावा लागत आहे. शेतकऱ्यांना चलन तुटवड्या मुळे कर्जाची रक्कम वेळेवर मिळू न शकल्याने त्यांना रब्बीहंगामा पासून वंचित रहावे लागले आहे.कोणतीही पूर्व तयारी न करता घाईघाईनी नोटाबंदी घोषित केल्याचा परिणाम देशातील कोट्यवधी जनता भोगीत आहे.त्यामुळे जनतेला उद्ध्वस्त करू पाहणाऱ्या आणि तिला आणीबाणी सदृश्य परिस्थिती मध्ये लोटणाऱ्या भाजपा सरकारचा ह्यावेळी निषेध करण्यात आला. आज जिल्हाधिकारी कार्यालयावर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित केलेले आंदोलन आचारसंहितेच्या कारणाने रद्द करण्यात आले. राष्ट्रवादीचे जिल्हा निरीक्षक संजय वढावकर, सरचिटणीस अनिल गावड,तालुकाध्यक्ष सुभाष पाटील,दामोदर पाटील,महिला जिल्हाध्यक्ष निलम राऊत,मकरंद पाटील, नगरसेवक सचिन पाटील,विरेन्द्र पाटील आदींनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादरकेले. (प्रतिनिधी)