शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
4
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
5
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
6
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
7
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
8
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
12
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
13
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
14
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
15
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
16
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
17
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
18
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
19
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
20
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

By admin | Updated: January 10, 2017 05:34 IST

रिझर्व्ह बँकेनी जिल्हा सहकारी बँकांवर घातलेल्या अनेक निर्बंधामुळे ग्रामीण सहकारी संस्था, पतपेढ्याचा व्यवहार ढासळला

पालघर : रिझर्व्ह बँकेनी जिल्हा सहकारी बँकांवर घातलेल्या अनेक निर्बंधामुळे ग्रामीण सहकारी संस्था, पतपेढ्याचा व्यवहार ढासळला असून रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा न झाल्याने त्यांना लागवडी पासून वंचित राहावे लागत असल्याच्या निषेधार्थ आज पालघर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.पंतप्रधान मोदींनी ८ नोव्हेंबर रोजी पाचश व एक हजाराच्या नोटा चलनातून बाद केल्यानंतर कोलमडलेली अर्थव्यवस्था सुरळीत होण्यासाठी त्यांनी ५० दिवसांचा कालावधी जनते कडून मागितला होता. मात्र आज ६१ दिवसाचा कालावधी उलटल्यानंतरही चलन तुटवड्याची गंभीर परिस्थिती कायम आहे. रिझर्व्ह बँकेने ग्रामीण भागातील गरीब जनतेची बँक समजल्या जाणाऱ्या सर्व सहकारी जिल्हा बँका, पतपेढ्या यांच्या व्यवहारावर अनेक निर्बंध घातल्याचा परिणाम सर्वसामान्य जनतेला भोगावा लागत आहे. शेतकऱ्यांना चलन तुटवड्या मुळे कर्जाची रक्कम वेळेवर मिळू न शकल्याने त्यांना रब्बीहंगामा पासून वंचित रहावे लागले आहे.कोणतीही पूर्व तयारी न करता घाईघाईनी नोटाबंदी घोषित केल्याचा परिणाम देशातील कोट्यवधी जनता भोगीत आहे.त्यामुळे जनतेला उद्ध्वस्त करू पाहणाऱ्या आणि तिला आणीबाणी सदृश्य परिस्थिती मध्ये लोटणाऱ्या भाजपा सरकारचा ह्यावेळी निषेध करण्यात आला. आज जिल्हाधिकारी कार्यालयावर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित केलेले आंदोलन आचारसंहितेच्या कारणाने रद्द करण्यात आले. राष्ट्रवादीचे जिल्हा निरीक्षक संजय वढावकर, सरचिटणीस अनिल गावड,तालुकाध्यक्ष सुभाष पाटील,दामोदर पाटील,महिला जिल्हाध्यक्ष निलम राऊत,मकरंद पाटील, नगरसेवक सचिन पाटील,विरेन्द्र पाटील आदींनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादरकेले. (प्रतिनिधी)