शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
3
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
4
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
5
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
6
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
7
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
8
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
9
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
10
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
11
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
12
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
13
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
14
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
15
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
16
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
17
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
18
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
19
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
20
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!

तर नायगाव पूलाचे उदघाटन रोखू, जूचंद्र रिक्षा चालक-मालक संघटनेचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2018 23:46 IST

जूचंद्र परिसरात उड्डाणपुल बांधण्याचे काम सुरू होत नाही तोपर्यंत पुलाचे उद्घाटन होऊ देणार नाही असा इशारा जूचंद्र रिक्षा चालक-मालक संघटनेने दिला आहे.

वसई : नायगावला जोडणाऱ्या उड्डाणपुलाचा मार्ग डिसेंबर २०१८ पर्यंत मोकळा होण्याची चिन्हे दिसू लागली असतांना दुसरीकडे जूचंद्र स्थानकातील वाढती रेल्वे वाहतूक आणि त्याठिकाणी निर्माण झालेली वाहतूकीची कोंडी लक्षात घेता जोपर्यंत रेल्वेरूळावर जूचंद्र परिसरात उड्डाणपुल बांधण्याचे काम सुरू होत नाही तोपर्यंत पुलाचे उद्घाटन होऊ देणार नाही असा इशारा जूचंद्र रिक्षा चालक-मालक संघटनेने दिला आहे.नायगाव उड्डाणपुलाचा उद्घाटनाचा मुहूर्त डिसेंबर महिन्याचा असला तरी पुलाचे काम मार्गी लागण्या बरोबरच जूचंद्र परिसरातील रेल्वे रूळांवरील उड्डाणपुलाचा प्रश्न हि तितक्याच जोमाने मार्गी लागावा यासाठी परिसरातील नागरिकांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे.दरम्यान नायगाव पूर्व-पश्चिम जोडणाºया पुलाचे काम सध्या अंितम टप्प्यात असून माहे डिसेंबर २०१८ पर्यंत पुलाचे काम पूर्ण होऊन तो वाहतुकीस खुला होण्याचे संकेत नुकतेच एमएमआरडीएकडून मिळाले. तत्पूर्वी हा पूल वाहतुकीसाठी खुला झाला तर प्रचंड वाहतूककोंडीला सामोरे जावे लागण्याची भीती ग्रामस्थांना आहे.जूचंद्र रेल्वे स्थानकात वाढत्या रेल्वे वाहतूकीमुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागून वाहतुकीचा खोळंबा तर होणार मात्र हि समस्या लक्षात घेता जूचंद्र रेल्वे फाटक उड्डाणपूलाला मंजूरी मिळाली असली तरी अजून प्रत्यक्ष कामास सुरूवात झालेली नाही.परिणामी नायगाव पुलाच्या उद्घाटनाला तूर्तास जूचंद्र रिक्षा चालक-मालक संघटनेने विरोध केला असून जोपर्यंत जूचंद्र येथील वाढत्या वाहतुककोंडीवर प्रशासन योग्यरित्या उपाययोजना करत नाही तोपर्यंत उड्डाणपुलाचा मुहूर्त कार्यक्रम भविष्यात होऊ देणार नसल्याचा गंभीर इशारा रिक्षा चालक-मालक संघटनेचे अध्यक्ष एकनाथ पाटील यांनी दिला..जूचंद्र रेल्वे रुळावरचे प्रस्तावित काम मार्गी लावा !जूचंद्र स्थित बापाणे ते नायगाव असा मुख्य रस्ता असून वसई-दिवा लोहमार्ग येथूनच गेला आहे. त्यामुळे या ठिकाणी रेल्वे फाटक बसवण्यात आले आहेत. ज्यावेळी रेल्वेगाडी येते, तेव्हा हे फाटक बंद होते, त्यावेळी मोठी वाहतुककोंडी होते.साधारण दिवसातून ३० ते ४० वेळा हे फाटक बंद होते.या परिस्थितीत जर नायगाव पूर्व-पश्चिम उड्डाणपुलाचे उद्घाटन झाले तर त्याचा फटका वाहनचालक आणि नागरिकांना बसेल, त्यामुळे एमएमआरडीए प्रशासनाने आधी फाटकाजवळ उड्डाणपुलाचे प्रस्तावित काम पूर्ण करण्यास प्राधान्य देण्याची मागणी संघटनेने केली आहे.