शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
3
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
4
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
5
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
8
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
9
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
10
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
11
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
12
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
13
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
14
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
15
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
16
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
17
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
18
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
19
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
20
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
Daily Top 2Weekly Top 5

नालासोपारा-ठाणे प्रवास २ तासांचा

By admin | Updated: December 26, 2016 05:56 IST

नालासोपारा-ठाणे विना वाहक वाहतूक करण्याचा एसटीचा निर्णय फुकट्या प्रवाशांचा पथ्यावर पडला असून, तिकीट काढून प्रवास करणाऱ्यांच्या त्रासात मात्र भर पडली आहे.

वसई : नालासोपारा-ठाणे विना वाहक वाहतूक करण्याचा एसटीचा निर्णय फुकट्या प्रवाशांचा पथ्यावर पडला असून, तिकीट काढून प्रवास करणाऱ्यांच्या त्रासात मात्र भर पडली आहे. तर दीड तासाचा प्रवास दोन तासाचा झाला आहे. नालासोपारा-ठाणे एसटी वाहतूक दर अर्ध्यातासाच्या अंतराने सुरु आहे. भरगच्च प्रवासी असलेल्या या फेऱ्यांमधून चांगला नफा होत असला तरी प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा मिळण्याऐवजी त्रासच होत आहे. याकडे आगार व्यवस्थापकांचे लक्ष नाही. या मार्गावरील गाड्यांमध्ये असलेले वाहक हटवण्यात आले आहेत. नालासोपारा डेपोत ठाणे गाडी लागल्यावर आतील सर्व प्रवाशांची तिकीटे काढण्याचे काम वाहकाकडून केले जाते. त्यानंतर वाहकाला उतरवून विनावाहक फेरी सुरु होते.तुळींज, वर्तक टॉवर, संतोष भवन,बिलालपाडा अशा चार थांब्यावरील प्रवासी घेतल्यानंतर पेल्हार फाट्यावर एसटी थांबवण्यात येते. त्या ठिकाणी उभा असलेला वाहक बसमध्ये चढून उर्वरीत प्रवाशांची तिकीटे काढतो. त्यानंतर पुन्हा विना वाहक प्रवास सुरु होतो. वसई फाटा, बर्माशेल, तुंगारेश्वर, कामण फाटा अशा महामार्गावरील थांब्यावर प्रवाशांची चढ उतार झाल्यानंतर एसटी ठाण्याच्या मार्गाला लागते. या सर्व थांब्यादरम्यान वाहक नसल्यामुळे अनेक फुकटे प्रवासी आपल्या इच्छित स्थळावरून विनातिकीट प्रवास करीत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे विनावाहक फेऱ्यांमधून एसटीचे नुकसान होऊ लागले आहे. पूर्वी नालासोपारा-ठाणे हा प्रवास दिड तासाचा होता. वाहक एसटीतच असल्यामुळे वेळ न दवडता गाड्या धावत होत्या. या धावत्या गाडीतच तिकीटे काढली जात होती. तिकीटे काढणारा वाहक गाडीतच शेवटपर्यंत असल्यामुळे कोणत्या प्रवाशाने तिकीट घेतले नाही. कोणत्या प्रवाशाने कुठले तिकीट घेतले. कोणाला कुठे उतरायचे आहे. याची त्याला माहिती असायची त्यामुळे प्रवासादरम्यानचा वेळही वाचत होता आणि फुकट्या प्रवाशांनाही चाप बसत होता. एखाद्या नवख्या प्रवाशाला इच्छितस्थळी उतरण्यासही मदत होत होती. (प्रतिनिधी)