शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

नालासोपारा-ठाणे प्रवास २ तासांचा

By admin | Updated: December 26, 2016 05:56 IST

नालासोपारा-ठाणे विना वाहक वाहतूक करण्याचा एसटीचा निर्णय फुकट्या प्रवाशांचा पथ्यावर पडला असून, तिकीट काढून प्रवास करणाऱ्यांच्या त्रासात मात्र भर पडली आहे.

वसई : नालासोपारा-ठाणे विना वाहक वाहतूक करण्याचा एसटीचा निर्णय फुकट्या प्रवाशांचा पथ्यावर पडला असून, तिकीट काढून प्रवास करणाऱ्यांच्या त्रासात मात्र भर पडली आहे. तर दीड तासाचा प्रवास दोन तासाचा झाला आहे. नालासोपारा-ठाणे एसटी वाहतूक दर अर्ध्यातासाच्या अंतराने सुरु आहे. भरगच्च प्रवासी असलेल्या या फेऱ्यांमधून चांगला नफा होत असला तरी प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा मिळण्याऐवजी त्रासच होत आहे. याकडे आगार व्यवस्थापकांचे लक्ष नाही. या मार्गावरील गाड्यांमध्ये असलेले वाहक हटवण्यात आले आहेत. नालासोपारा डेपोत ठाणे गाडी लागल्यावर आतील सर्व प्रवाशांची तिकीटे काढण्याचे काम वाहकाकडून केले जाते. त्यानंतर वाहकाला उतरवून विनावाहक फेरी सुरु होते.तुळींज, वर्तक टॉवर, संतोष भवन,बिलालपाडा अशा चार थांब्यावरील प्रवासी घेतल्यानंतर पेल्हार फाट्यावर एसटी थांबवण्यात येते. त्या ठिकाणी उभा असलेला वाहक बसमध्ये चढून उर्वरीत प्रवाशांची तिकीटे काढतो. त्यानंतर पुन्हा विना वाहक प्रवास सुरु होतो. वसई फाटा, बर्माशेल, तुंगारेश्वर, कामण फाटा अशा महामार्गावरील थांब्यावर प्रवाशांची चढ उतार झाल्यानंतर एसटी ठाण्याच्या मार्गाला लागते. या सर्व थांब्यादरम्यान वाहक नसल्यामुळे अनेक फुकटे प्रवासी आपल्या इच्छित स्थळावरून विनातिकीट प्रवास करीत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे विनावाहक फेऱ्यांमधून एसटीचे नुकसान होऊ लागले आहे. पूर्वी नालासोपारा-ठाणे हा प्रवास दिड तासाचा होता. वाहक एसटीतच असल्यामुळे वेळ न दवडता गाड्या धावत होत्या. या धावत्या गाडीतच तिकीटे काढली जात होती. तिकीटे काढणारा वाहक गाडीतच शेवटपर्यंत असल्यामुळे कोणत्या प्रवाशाने तिकीट घेतले नाही. कोणत्या प्रवाशाने कुठले तिकीट घेतले. कोणाला कुठे उतरायचे आहे. याची त्याला माहिती असायची त्यामुळे प्रवासादरम्यानचा वेळही वाचत होता आणि फुकट्या प्रवाशांनाही चाप बसत होता. एखाद्या नवख्या प्रवाशाला इच्छितस्थळी उतरण्यासही मदत होत होती. (प्रतिनिधी)