शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
2
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
3
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
4
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान
5
१९५४ पासून पाकला शस्त्रांची मदत करतोय अमेरिका, भारतीय लष्कराने ट्रम्पना आरसा दाखवला
6
विदर्भ-मराठवाड्यातील माल जाणार समुद्रमार्गे, समृद्धी महामार्गाला जोडणार वाढवण बंदर
7
‘माधुरी’ला परत आणण्यासाठी सरकार सुप्रीम कोर्टात जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही
8
‘खरा भारतीय’ ठरविण्याचे अधिकार न्यायमूर्तींना नाहीत; प्रियांका गांधी म्हणाल्या, राहुल गांधी सैन्याविरोधात बोलले नाहीत
9
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
10
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
11
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
12
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
13
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
14
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
15
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
16
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
17
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
18
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
19
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
20
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात

पोलीस-टवाळखोरांमुळे संपवले जीवन?; १९ वर्षीय तरुणीच्या आत्महत्येने खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2020 00:55 IST

संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी

वसई : उत्तर प्रदेशमधील हाथरसची घटना ताजी असताना नालासोपारा येथे पोलिसांच्या चुकीच्या आणि हेतुपुरस्सर वागणुकीमुळे तसेच परिसरातील टवाळखोरांच्या मानसिक छळामुळे १९ वर्षीय तरुणीने आपले जीवन संपवले असल्याचे उघड होत आहे. या प्रकरणी संबंधित पोलीस आणि टवाळखोरांवर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.प्रियकराने विवाह करण्यास नकार दिल्यामुळे १९ वर्षीय तरुणीने तुळिंज पोलीस ठाण्यामध्ये त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी पोलिसांकडून तिला न्याय मिळाला नाही, उलट तिलाच दोषी धरण्यात येऊन अपमानजनक वागणूक देण्यात आली. त्याच वेळी परिसरातील टवाळखोर तरुणांनाही याची माहिती मिळाल्याने तेही तिची टवाळी करीत असल्याने तिची मानसिक कोंडी झाली. यातूनच शुक्रवारी त्या तरुणीने आत्महत्या केली. या प्रकरणात पोलिसांनी योग्य ते सहकार्य केले नाही, उलट अपमानजनक वागणूक दिली, त्यामुळे त्या मुलीचा मृतदेह ताब्यात घेण्यास कुटुंबीयांनी नकार दिला होता. ही तरुणी राहत असलेल्या परिसरातील काही टवाळखोर तरुणांकडून आणि कायद्याचे रक्षण करणाऱ्या तुळिंज पोलिसांकडूनच तिचा मानसिक छळ झाल्याने या तरुणीने हे टोकाचे पाऊल उचलले असल्याचा गंभीर आरोप तरुणीच्या आई-वडील व कुटुंबीयांनी केला आहे. या तरुणीचे सुनील माने या तरुणासोबत प्रेमसंबंध होते. त्याने लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. मात्र त्याने लग्नाला नकार दिल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे तिच्या लक्षात आले. तिने सुनीलविरोधात १५ सप्टेंबर रोजी बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता.संबंधित तरुणीच्या तक्र ारीवरून पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा दाखल करण्याच्या काही दिवस आधीच हे दोघेही फरार झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर तुळिंज पोलिसांनी या दोघांनाही शोधून मुलीला नातेवाइकांच्या स्वाधीन केले होते. तरुणीचे आणि सुनीलचे असलेले प्रेमसंबंध कुटुंबीयांना मान्य नव्हते. तरीही तिला सुनीलशीच लग्न करायचे होते, असे मुलीने चिठ्ठीत लिहिले आहे. माझ्या या मृत्यूला कोणीही जबाबदार नसल्याचे या मुलीने या पत्रामध्ये लिहिले आहे. तरीही तिच्या कुटुंबीयांनी केलेल्या आरोपाची दखल घेत या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे.- विजयकांत सागर, अप्पर पोलीस अधीक्षक, वसई