शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

पोलीस-टवाळखोरांमुळे संपवले जीवन?; १९ वर्षीय तरुणीच्या आत्महत्येने खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2020 00:55 IST

संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी

वसई : उत्तर प्रदेशमधील हाथरसची घटना ताजी असताना नालासोपारा येथे पोलिसांच्या चुकीच्या आणि हेतुपुरस्सर वागणुकीमुळे तसेच परिसरातील टवाळखोरांच्या मानसिक छळामुळे १९ वर्षीय तरुणीने आपले जीवन संपवले असल्याचे उघड होत आहे. या प्रकरणी संबंधित पोलीस आणि टवाळखोरांवर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.प्रियकराने विवाह करण्यास नकार दिल्यामुळे १९ वर्षीय तरुणीने तुळिंज पोलीस ठाण्यामध्ये त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी पोलिसांकडून तिला न्याय मिळाला नाही, उलट तिलाच दोषी धरण्यात येऊन अपमानजनक वागणूक देण्यात आली. त्याच वेळी परिसरातील टवाळखोर तरुणांनाही याची माहिती मिळाल्याने तेही तिची टवाळी करीत असल्याने तिची मानसिक कोंडी झाली. यातूनच शुक्रवारी त्या तरुणीने आत्महत्या केली. या प्रकरणात पोलिसांनी योग्य ते सहकार्य केले नाही, उलट अपमानजनक वागणूक दिली, त्यामुळे त्या मुलीचा मृतदेह ताब्यात घेण्यास कुटुंबीयांनी नकार दिला होता. ही तरुणी राहत असलेल्या परिसरातील काही टवाळखोर तरुणांकडून आणि कायद्याचे रक्षण करणाऱ्या तुळिंज पोलिसांकडूनच तिचा मानसिक छळ झाल्याने या तरुणीने हे टोकाचे पाऊल उचलले असल्याचा गंभीर आरोप तरुणीच्या आई-वडील व कुटुंबीयांनी केला आहे. या तरुणीचे सुनील माने या तरुणासोबत प्रेमसंबंध होते. त्याने लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. मात्र त्याने लग्नाला नकार दिल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे तिच्या लक्षात आले. तिने सुनीलविरोधात १५ सप्टेंबर रोजी बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता.संबंधित तरुणीच्या तक्र ारीवरून पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा दाखल करण्याच्या काही दिवस आधीच हे दोघेही फरार झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर तुळिंज पोलिसांनी या दोघांनाही शोधून मुलीला नातेवाइकांच्या स्वाधीन केले होते. तरुणीचे आणि सुनीलचे असलेले प्रेमसंबंध कुटुंबीयांना मान्य नव्हते. तरीही तिला सुनीलशीच लग्न करायचे होते, असे मुलीने चिठ्ठीत लिहिले आहे. माझ्या या मृत्यूला कोणीही जबाबदार नसल्याचे या मुलीने या पत्रामध्ये लिहिले आहे. तरीही तिच्या कुटुंबीयांनी केलेल्या आरोपाची दखल घेत या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे.- विजयकांत सागर, अप्पर पोलीस अधीक्षक, वसई