शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
3
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
4
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
5
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
6
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
7
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
8
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
9
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
10
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
11
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
12
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
13
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
14
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
15
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
16
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
17
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
18
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
19
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
20
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...

शेतकरी जनजागरण यात्रा पालघरमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2018 03:30 IST

सरकारी धोरणांमुळे हुतात्मा झालेल्या शेतकरी, शेतमजूर व सैनिक यांना अभिवादन करण्यासाठी शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीची शहीद अभिवादन व शेतकरी जन-जागरण यात्रा शनिवारी पालघरमध्ये दाखल झाली.

पालघर : सरकारी धोरणांमुळे हुतात्मा झालेल्या शेतकरी, शेतमजूर व सैनिक यांना अभिवादन करण्यासाठी शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीची शहीद अभिवादन व शेतकरी जन-जागरण यात्रा शनिवारी पालघरमध्ये दाखल झाली.सरकारची उदासीनता आणि निसर्गाची वारंवार येणारी संकटे यामुळे शेतकरी आणखीन संकटात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर सरकारकडून या मागण्या मंजूर करून घेण्यासाठी दबाव वाढविणे आवश्यक आहे. अलीकडेच शेतकऱ्यांनी संप करून अभूतपूर्व इतिहास घडविला होता. या यात्रेतून राज्यभर शेतकरी जागर करण्यात येणार असून २७ एप्रिल रोजी पुणे येथे यात्रेची समाप्ती करताना संपानंतरच्या दुसºया आंदोलनाची घोषणा कारण्यात येईल असे या यात्रेदरम्यान शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ दादा पाटील, सुकाणू समितीच्या सदस्य सुशीलाताई मोराळे तसेच सुकाणूचे कार्यवाह व पदाधिकारी यांनी सांगितले. यात्रेच्या स्वागतासाठी विविध संघटनांचे नेते व कार्यकर्ते जमले होते.यावेळी पालघरमधील विविध संघटनांनी या यात्रेच्या स्वागतानंतर हुतात्मास्तंभ येथे शेतकºयांवर झालेल्या अन्यायाविरोधात सुकाणू समितीने सुरु केलेल्या यात्रेस पाठिंबा देत राज्यासह देशात ज्याप्रमाणे शेतकºयांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे ते, निंदनीय असून त्यासाठी हा लढा उभारलाच पाहिजे. शेतकºयांनी जागरूक होऊन आपल्या न्याय हक्कासाठी लढलेच पाहिजे असे सांगितले.हे सरकार शेतकºयांना समृद्ध करू असे म्हणत असताना दुसरीकडे या जिल्ह्यातील शेतकºयांच्या जमिनी विविध प्रकल्पांमध्ये हस्तांतरित करून त्यांना सुजलाम करणारे पाणी इतरत्र वळवून सिंचनातून बाद केल्या व त्यांना देशोधडीला लावण्याचे काम या सरकारने केले असल्याचे स्पष्ट होत आहे. या विरोधात जिल्ह्यातील प्रत्येक शेतकरी या सुकाणू समितीसोबत असेल अशी ग्वाही शेतकरी संघर्ष समितीचे संतोष पावडे, खरेदी विक्र ी संघाचे महेंद्र अधिकारी, कुणबी सेनेचे जितेंद्र राऊळ, काँग्रेसचे केदार काळे, जनता दलाचे प्रकाश लवेकर,मच्छीमार नेत्या पूर्णिमा मेहेर व सूर्या समितीचे ब्रायन लोबो, रमाकांत पाटील यांनी येथे दिली.२७ एप्रिल रोजी पुण्यात समारोप : शेतकºयांची संपूर्ण कर्जमुक्ती वीजबिलासहित झालीच पाहिजे. शेतमालावरील निर्यात बंदी उठली पाहिजे. शेतमाल उत्पादन खर्च अधिक पन्नास टक्के नफा मिळाला पाहिजे. शेतकरी विरोधी कायदे रद्द झाले पाहिजेत. ही यात्रा सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरमधून २३ मार्च रोजी सुरु झाली असून पुढे बेळगाव, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, मुंबई, ठाणे, पालघर, नासिक, नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, वसीम, हिंगोली, नांदेड, परभणी, जालना, औरंगाबाद, अहमदनगर, बीड, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर सातारा मार्गे २७ एप्रिल रोजी पुणे येथील महात्मा फुलेवाडा येथे पोचून समारोप होणार आहे.

टॅग्स :Schoolशाळा