शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
4
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
5
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
6
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
7
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
8
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
9
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
10
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
11
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
12
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
13
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
14
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
15
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
16
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
17
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
18
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
19
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
20
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
Daily Top 2Weekly Top 5

विक्रमगडला होणार नगरपंचायत

By admin | Updated: April 10, 2016 00:56 IST

राज्यातील १३७ पैकी १०९ नगरपंचायती अस्तित्वात आल्या असून उर्वरीत सर्व नगरपंचायती एप्रिल अखेरीस अस्तित्वात येतील अशी घोषणा नगरविकास राज्यमंत्री डॉ़ रणजित पाटील यांनी विधानसभेत

- राहुल वाडेकर, विक्रमगड

राज्यातील १३७ पैकी १०९ नगरपंचायती अस्तित्वात आल्या असून उर्वरीत सर्व नगरपंचायती एप्रिल अखेरीस अस्तित्वात येतील अशी घोषणा नगरविकास राज्यमंत्री डॉ़ रणजित पाटील यांनी विधानसभेत केल्याने विक्रमगड नगरपंचायत स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. असे झाल्यास पालघर जिल्हयातील बोईसर, सरावली, तलासरी, वाडा, या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचे काय असाही प्रश्न निर्माण होत आहे़ अस्तित्वात येणार असलेल्या नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या पदांच्या प्रस्तावास मंत्रीमंडळाच्या पुढील बैठकीत मान्यता देण्यांत येईल अशीही ग्वाही त्यांनी दिली. नव्याने निर्माण झालेल्या नगर परिषद आणि नगरपंचायतींसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे १८५ मुख्याधिकारीपदांसाठी परीक्षा घेण्यात आली़ त्याचा निकाल नुकताच लागला असून येत्या दोन ते तीन महिन्यांत मुख्याधिकाऱ्यांची नेमणूक केली जाईल़ या नवनिर्मित नगरपरिषद आणि नगरपंचायतींसाठी कर्मचारी नियुक्ती करण्यासाठी आकृतिबंध तयार करण्यांत येत असून पदानिर्मितीस मंत्रिमंडळाच्या पुढील बैठकीत मान्यता मिळेल असेही सांगण्यात आले आहे़ दरम्यानच्या काळात या नगरपरिषद आणि नगरपंचायतींसाठी १८६ कोटी रुपयांचे अनुदान उपलब्ध करुन देण्यात आले आहे़ तालुका मुख्यालय आणि तेथे ग्रामपंचायत असल्यास याठिकाणी लोकसंख्येचा निकष न लावता अशा ठिकाणी नगरपंचायत करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे़ २५ हजारावर लोकसंख्या असल्यास त्या ठिकाणी नगरपरिषद तयार करण्यांत येते़ अशा ठिकाणी मुख्याधिकारी नियुक्ती करतांना अव्वल, कारकुन, लेखाधिकारी यांचा अनुभव लक्षात घेवुन त्यांची नियुक्ती करण्याबाबत शासन सकारात्मक निर्णय घेणार आहे.निवडणूकीवर प्रश्नचिन्ह :-ग्रामपंचायतीची निवडणूक १६ एप्रिलला होणार आणि नगरपंचायत एप्रिलच्या अखेरीस अस्तित्वात येणार यामुळे आता निवडणूकीचे करायचे काय? हा प्रश्न कायम आहे. बहिष्कार कायम राहिला तर नगरपंचायतीच्याच निवडणूका होतीलबहिष्कार लागला सार्थकीविक्रमगड ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रुपांतर करण्याचा प्रस्ताव नगरविकास मंत्र्यांकडे प्रस्तावित असतांनाही नगरपंचायतीची घोषणा न झाल्याने व १७ एप्रिल रोजी होणाऱ्या ग्रापंच्या निवडणुकींवर येथील जनतेने बहिष्कार टाकला होता. त्यानुषंगाने हा विषय विधानसभेमध्ये गेल्याने त्यावर तातडीने निर्णय घेण्यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे़ त्यामध्ये प्रस्तावित नगरपंचायती एप्रिल अखेरपर्यत अस्तित्वात येण्याची शक्यता असल्यामुळे विक्रमगड येथील नागरिकांनी ग्रामपंचायत निवडणूक न लढविण्याचा निर्णय सार्थकी लागला आहे़