शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

पावणेतीन कोटींच्या करारावर माझी सही बोगस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2018 23:54 IST

माझी सही बोगस असल्याचा आरोप खुद्द बांधकाम सभापती अतुल पाठक यांनीच सभेत केल्याने नगरपरिषदेवर होणाऱ्या गैरव्यवहाराच्या आरोपात काही अंशी तथ्यता असल्याचे दिसून आले आहे.

पालघर : पालघर नगर परिषद अंतर्गत हुतात्मा स्तंभ ते वळण नाका या २ कोटी ८८ लाख ७९ हजार ४६५ खर्चाच्या रस्त्याच्या निविदेच्या कारारपत्रावर असलेली माझी सही बोगस असल्याचा आरोप खुद्द बांधकाम सभापती अतुल पाठक यांनीच सभेत केल्याने नगरपरिषदेवर होणाऱ्या गैरव्यवहाराच्या आरोपात काही अंशी तथ्यता असल्याचे दिसून आले आहे.पालघर हुतात्मा स्तंभ ते वळण नाका रस्त्याच्या कामाची निविदा मार्च मध्ये काढण्यात आली होती. मात्र या कामाच्या संदर्भात पुरेशा निविदा आल्या नसल्याचे कारण देऊन पुन्हा एप्रिल महिन्यात २ कोटी ८८ लाख ७९ हजार ४६५ रुपये खर्चाच्या १५ मीटर रुंद तर १ हजार ८०० मीटर्स लांबीच्या रस्त्याची फेरनिविदा काढण्यात आली. मात्र निवडणुकांची आचारसंहिता लागल्याने या रस्त्याचे काम थांबून राहिले होते. आॅगस्ट महिन्यात पुन्हा ह्या कामाच्या आलेल्या निविदा उघडण्यात आल्या नंतर कामाचे ठेकेदार आणि बांधकाम सभापती व इतरांच्या सह्यांची आवश्यकता निर्माण झाली आणि सर्वांच्या सह्या झाल्याचे सांगून रस्त्यांचा हा ठेका मंजूर होऊन कामाला सुरुवातही झाली.पालघर नगरपरिषदेच्या बुधवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत नगरपरिषद आणि ठेकेदार याच्या मध्ये झालेल्या या रस्त्याच्या निविदेच्या कराराचा विषय उपस्थित झाला. त्यावर जोरदार चर्चा झाली. या करारपत्रावर बांधकाम सभापती अतुल पाठक, स्थायी समिती सदस्य उत्तम घरत यांच्या सह्या असल्याचे सभागृहात सांगण्यात आले. मात्र असल्या कुठल्याही कागदपत्रांवर आपण सही केली नसल्याचे त्यांनी सांगितल्याने नगरपरिषदेतील कारभाराचे पितळ सर्वांसमोर उघडे पडले. या दरम्यान कारारपत्राची मूळ प्रत सभागृहासमोर मागविण्यात आल्या नंतर करारपत्रातील माझ्या नावासमोरील सही माझी नसल्याचे सभापती अतुल पथक यांनी भर सभागृहात सर्वांसमक्ष सांगितल्याने एकच खळबळ उडाली होती. त्यामुळे माझी सही अन्य व्यक्तीने बनावट पद्धतीने केली असल्याचे सांगून चौकशीची मागणी केली. यावेळी नगरपरिषदेतील उपलब्ध कागदपत्रांवर सभापती पाठक ह्यांच्या सह्या आणि करारपत्रकावरील सह्यांची पडताळणी करण्यात आल्यावर करार पत्रकावर करण्यात आलेली सही बनावट असल्याचे स्पष्ट झाले. नगर पालिकेत सत्ताधाºयांच्या गटातील राजकारण शहराचा विकास रोखू पहात असून नगराध्यक्ष उत्तम पिंपळे विरुद्ध उत्तम घरत, अतुल पाठक ह्यांचे विरोधातील विकास कामांचा निधी, योजनांची अंमलबजावणी बाबतचे द्वंद्व नगरपरिषदेतील अनेक सभामध्ये पहावयास मिळालेले आहे. येत्या मार्च महिन्यात नगरपरिषदेच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता असून आर्थिक गणिताच्या जोरावर आम्ही कसेही निवडून येऊ शकतो या काही नगरसेवकांच्या मानसिकतेला धक्का देण्याचे काम या निवडणुकीत आम्ही करणार असल्याचा इशारा जागरुक मतदार आतापासूनच देत आहेत.>पालिकेच्या सर्वसाधारण सभेतच झालेल्या आरोपाने खळबळया करार पत्रावरील सह्या या सभापती आणि सदस्याच्या असून या कामात कुठलाही गैरव्यवहार झालेला नाही.- उत्तम पिंपळे, नगराध्यक्ष.ठेकेदाराकडून मिळणाºया टक्केवारीत अनेक गणिते अडकली असून नगरपरिषदेतील नगरसेवकांची मिली-जुली आहे.-अरु ण माने, माजी नगरसेवक.