शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

29 गावे वगळून पालिका निवडणूक?; शिवसेना आग्रही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 00:31 IST

उच्च न्यायालयात तत्काळ सुनावणीसाठी सरकारी वकिलांना सूचना

- आशीष राणे वसई : बहुप्रतीक्षित वसई-विरार शहर महापालिकेतून २९ गावे वगळण्याचा अंतिम निर्णय येत्या चार दिवसांत लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील महत्त्वाचा घटक असलेल्या शिवसेनेने मागील निवडणूक प्रचारात वचन दिल्याप्रमाणे शिवसेना गावे वगळण्यावर ठाम असून, एकदा नाही तर दोन वेळा राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. दरम्यान, यासंदर्भात राज्य सरकारच्या अवर सचिव निकेता पांडे यांनी नुकतीच मुंबई उच्च न्यायालयात तत्काळ सुनावणी होण्याकामी सरकारी वकिलांना लेखी निर्देश दिल्याची माहिती याचिकाकर्ते ॲड. जिमी घोन्सालवीस यांनी ‘लोकमत’ला दिली.याचिकाकर्ते व वसईतील शिवसेना नेते विजय पाटील यांच्यासह राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे गावे वगळून निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. यामुळेच कदाचित हा निर्णय लवकरच येण्याची शक्यता आहे. दुसरीकडे राज्य निवडणूक आयोगाने महानगरपालिकांमधील मतदार याद्या अंतिम करण्याबाबत प्रक्रिया सुरू केली आहे. दरम्यान, १६ फेब्रुवारीला वसई-विरार महापालिका मतदार याद्या प्रसिद्ध करणार आहे, त्यामुळे महापालिका प्रशासनदेखील २९ गावे वगळण्यात आलीच तर  गावाशिवाय महापालिका निवडणूक प्रक्रियाही सुरू ठेवण्याची तयारी दर्शविली आहे. पालिकेतून २९ गावे वगळण्याचे हे प्रकरण मागील दहा वर्षांपासून मुंबई उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. राज्य शासनाने सन २०११ मध्ये २९ गावे महापालिकेतून वगळण्याचे आदेश काढले होते. त्या निर्णयाला वसई-विरार महापालिकेने आयुक्तांचे अधिकार वापरून तत्कालीन माजी महापौर राजीव पाटील यांच्यावतीने मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिल्यानंतर या निर्णयाला स्थगिती मिळवली होती.गावे वगळण्यासाठी ठामनिवडणुकीच्या प्रचारात शिवसेनेने वसई-विरार महापालिकेतून २९ गावे वगळण्याचे आश्वासन दिले होते. आता राज्यात मुख्यमंत्री शिवसेनेचेच असल्याने  शासन गावे वगळण्याच्या बाजूने आजही ठाम आहे. वसई-विरार महापालिकेतून गावे वगळण्यात यावीत, यासाठी नगरविकास खात्याने ९ डिसेंबर आणि २१ जानेवारी रोजी दोन प्रतिज्ञापत्र सादर केली होती; मात्र  २८ जानेवारीला न्यायालयात होणारी सुनावणी अचानक स्थगित झाली होती. दरम्यान, राज्य निवडणूक आयोगाने संपूर्ण राज्यात रखडलेल्या महापालिका निवडणुकांची प्रक्रियादेखील सुरू केली व  त्यामुळे गावांचे भवितव्य पुन्हा एकदा लांबणीवर पडले होते.महाराष्ट्र शासनाने २९ गावांबाबत कायदेशीर भूमिका स्पष्टपणे दाेन प्रतिज्ञापत्रांद्वारे उच्च न्यायालयात मांडली आहे, तर वसई-विरार मनपा आयुक्तांनीही दि. ८ ऑक्टाेबर राेजी प्रतिज्ञापत्राद्वारे त्यांची बाजू मांडली. आयुक्तांनी या सर्व कायदेशीर परिस्थितीची माहिती राज्य निवडणूक आयाेगाला दिली असती तर पुढे हाेणार्‍या पेचातून वाचता आले असते.        - ॲड. जिमी घाेन्साल्वीस, याचिकाकर्तेआता याचिका परत सुनावणीसाठी लवकरच लागेल व अंतिम निर्णय २९ गावांच्या बाजूने लागेल असा ठाम विश्वास व अपेक्षा आहे. त्यामुळे राज्य निवडणूक आयाेगामार्फत महापालिका आयुक्तांचा मतदार यादी अंतिम करण्याचा कार्यक्रम हा निव्वळ हुलबाजी करण्यासाठीच आहे असे मी मानतो.- विजय पाटील, शिवसेना नेते.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारShiv Senaशिवसेना