शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईचे ओपनर विनोद तावडे?

By admin | Updated: October 30, 2014 00:53 IST

संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या महाराष्ट्राच्या नवनिर्वाचित सरकारच्या शपथविधी सोहळ्यात मुंबईतील केवळ एकाच आमदाराची वर्णी लागणार असल्याचे स्पष्ट संकेत भारतीय जनता पार्टीतील सूत्रंनी दिले आहेत.

राहुल रनाळकर - मुंबई
संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या महाराष्ट्राच्या नवनिर्वाचित सरकारच्या शपथविधी सोहळ्यात मुंबईतील केवळ एकाच आमदाराची वर्णी लागणार असल्याचे स्पष्ट संकेत भारतीय जनता पार्टीतील सूत्रंनी दिले आहेत. बोरीवलीतून विधानसभेवर तब्बल 79 हजारांच्या मताधिक्याने निवडून गेलेले विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार असल्याचे तूर्तास तरी स्पष्ट झाल्याने मुंबईतील ते पहिले मंत्री ठरतील. त्यामुळे क्रिकेटमुळे मुंबईतून जगभरात पोहोचलेल्या खेळाडूंनंतर मुंबईकर तावडे हे पहिले राजकीय फलंदाज ठरतील, असेच म्हणावे लागेल. 
मंत्रिपदाच्या शर्यतीत मुंबईतील अनेक दिग्गज आसुसलेले असताना पहिली संधी कोणाला मिळणार, याकडे अवघ्या मुंबईकरांचे लक्ष लागलेले होते. कारण टीम देवेंद्रच्या पहिल्या फळीत मान मिळावा, यासाठी सर्वच आजी-माजी आमदारांनी चांगलीच फिल्डिंग लावलेली आहे. मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार, ज्येष्ठ आमदार प्रकाश मेहता, कुलाब्यातील आमदार राज पुरोहित यांनी आपापल्या पद्धतीने यासाठी चांगलाच जोर लावला आहे. असे असताना सर्वाना बाजूला सारून तावडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या साक्षीने मंत्रिपदाची शपथ घेण्यात बाजी मारल्याचेच समजते. 
वानखेडे स्टेडियमवर शपथविधीचा कार्यक्रम होणारे हे पहिले सरकार आहे. त्यामुळे या सोहळ्यात मुंबईकरालाही मान मिळावा, अशी सर्वाचीच अपेक्षा होती. कारण हे मैदान अनेक मुंबईकर खेळाडूंनी गाजवले आहे. तसेच सचिन तेंडुलकरच्या निवृत्तीचा सोहळा असो वा वर्ल्डकपचे जेतेपद असो, हे मैदान अशा अनेक ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार राहिले आहे. त्यामुळे भाजपाच्या नव्या राजकीय फलंदाजीची ओपनिंगही मुंबईकर आमदाराच्या सहभागाने व्हावी, अशी अपेक्षा मुंबईकरांना असतानाच तावडे यांच्या नावाने ही इच्छा पूर्ण झाल्याचे भाजपा सूत्रंनी सांगितले. 
विधान परिषदेमध्ये विरोधी पक्षनेते म्हणून पक्षाची भूमिका बजावताना विनोद तावडे यांनी प्रस्थापित सरकारला अस्वस्थ केले होते. त्यामुळे पक्षात त्यांची प्रतिमा गेल्या काही वर्षात उंचावली होती. याच कारणास्तव तसेच कोअर कमिटीचे सदस्य असल्याने 
त्यांची मंत्रिपदी वर्णी लागल्याचे कळते.
  मुंबईतील आणखी किमान 3-4 आमदार मंत्री होणार हे निश्चित आहे. पण शिवसेनेसोबतची बातचीत अजून अंतिम टप्प्यात पोहोचलेली नाही.
 
च्शिवसेनेला किती मंत्रिपदे द्यावी लागतील, याचा अजूनही पुरता अंदाज भाजपा नेत्यांना आलेला नाही. देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपाच्या कोअर कमिटीतील चार सदस्य 31 तारखेला मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. 
च्कोअर कमिटीव्यतिरिक्त एक आदिवासी समाजाचा आमदार तसेच एक अल्पसंख्य समाजाचा आमदारही मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचे सूत्रंनी सांगितले. आता पुढच्या टप्प्यात मुंबईतील कोणत्या आमदाराच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार याकडे लक्ष लागलेले आहे.