शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
3
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
4
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
5
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
6
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
7
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
8
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
9
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
10
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
11
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
12
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
13
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
14
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
15
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
16
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
17
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
18
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
19
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
20
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!

मुंबईचे ओपनर विनोद तावडे?

By admin | Updated: October 30, 2014 00:53 IST

संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या महाराष्ट्राच्या नवनिर्वाचित सरकारच्या शपथविधी सोहळ्यात मुंबईतील केवळ एकाच आमदाराची वर्णी लागणार असल्याचे स्पष्ट संकेत भारतीय जनता पार्टीतील सूत्रंनी दिले आहेत.

राहुल रनाळकर - मुंबई
संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या महाराष्ट्राच्या नवनिर्वाचित सरकारच्या शपथविधी सोहळ्यात मुंबईतील केवळ एकाच आमदाराची वर्णी लागणार असल्याचे स्पष्ट संकेत भारतीय जनता पार्टीतील सूत्रंनी दिले आहेत. बोरीवलीतून विधानसभेवर तब्बल 79 हजारांच्या मताधिक्याने निवडून गेलेले विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार असल्याचे तूर्तास तरी स्पष्ट झाल्याने मुंबईतील ते पहिले मंत्री ठरतील. त्यामुळे क्रिकेटमुळे मुंबईतून जगभरात पोहोचलेल्या खेळाडूंनंतर मुंबईकर तावडे हे पहिले राजकीय फलंदाज ठरतील, असेच म्हणावे लागेल. 
मंत्रिपदाच्या शर्यतीत मुंबईतील अनेक दिग्गज आसुसलेले असताना पहिली संधी कोणाला मिळणार, याकडे अवघ्या मुंबईकरांचे लक्ष लागलेले होते. कारण टीम देवेंद्रच्या पहिल्या फळीत मान मिळावा, यासाठी सर्वच आजी-माजी आमदारांनी चांगलीच फिल्डिंग लावलेली आहे. मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार, ज्येष्ठ आमदार प्रकाश मेहता, कुलाब्यातील आमदार राज पुरोहित यांनी आपापल्या पद्धतीने यासाठी चांगलाच जोर लावला आहे. असे असताना सर्वाना बाजूला सारून तावडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या साक्षीने मंत्रिपदाची शपथ घेण्यात बाजी मारल्याचेच समजते. 
वानखेडे स्टेडियमवर शपथविधीचा कार्यक्रम होणारे हे पहिले सरकार आहे. त्यामुळे या सोहळ्यात मुंबईकरालाही मान मिळावा, अशी सर्वाचीच अपेक्षा होती. कारण हे मैदान अनेक मुंबईकर खेळाडूंनी गाजवले आहे. तसेच सचिन तेंडुलकरच्या निवृत्तीचा सोहळा असो वा वर्ल्डकपचे जेतेपद असो, हे मैदान अशा अनेक ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार राहिले आहे. त्यामुळे भाजपाच्या नव्या राजकीय फलंदाजीची ओपनिंगही मुंबईकर आमदाराच्या सहभागाने व्हावी, अशी अपेक्षा मुंबईकरांना असतानाच तावडे यांच्या नावाने ही इच्छा पूर्ण झाल्याचे भाजपा सूत्रंनी सांगितले. 
विधान परिषदेमध्ये विरोधी पक्षनेते म्हणून पक्षाची भूमिका बजावताना विनोद तावडे यांनी प्रस्थापित सरकारला अस्वस्थ केले होते. त्यामुळे पक्षात त्यांची प्रतिमा गेल्या काही वर्षात उंचावली होती. याच कारणास्तव तसेच कोअर कमिटीचे सदस्य असल्याने 
त्यांची मंत्रिपदी वर्णी लागल्याचे कळते.
  मुंबईतील आणखी किमान 3-4 आमदार मंत्री होणार हे निश्चित आहे. पण शिवसेनेसोबतची बातचीत अजून अंतिम टप्प्यात पोहोचलेली नाही.
 
च्शिवसेनेला किती मंत्रिपदे द्यावी लागतील, याचा अजूनही पुरता अंदाज भाजपा नेत्यांना आलेला नाही. देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपाच्या कोअर कमिटीतील चार सदस्य 31 तारखेला मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. 
च्कोअर कमिटीव्यतिरिक्त एक आदिवासी समाजाचा आमदार तसेच एक अल्पसंख्य समाजाचा आमदारही मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचे सूत्रंनी सांगितले. आता पुढच्या टप्प्यात मुंबईतील कोणत्या आमदाराच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार याकडे लक्ष लागलेले आहे.