शहरं
Join us  
Trending Stories
1
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
2
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
3
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
4
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
5
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
6
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
7
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
8
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
9
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
10
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय
11
पत्नीकडे फोन, बँक खात्याचे पासवर्ड मागणे हा घरगुती हिंसाचार, छत्तीसगड उच्च न्यायालय
12
व्यवस्थापन कोट्यातील जागांसाठी विद्यार्थ्यांची लूट; विद्यापीठाने देखरेख समिती नेमावी : युवा सेना
13
व्हिजन डाॅक्युमेंटसाठीचा मसुदा इंग्रजीत! शिक्षणतज्ज्ञांमध्ये आश्चर्य; इंग्रजीला देण्यात आलेल्या प्राधान्याबद्दल आता टीका
14
नवी मुंबई महापालिका राज्यात पहिली; मीरा-भाईंदर देशातले ‘सर्वांत स्वच्छ शहर’
15
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
16
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
17
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
18
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
19
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
20
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी

प्रदूषणकारी कारखान्यांबाबत खासदार करणार हस्तक्षेप; फायद्याबरोबरच आरोग्याला प्राधान्य द्यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 23:30 IST

स्थानिकांची अपेक्षा

- हितेन नाईकपालघर : तारापूर एमआयडीसीमधील कारखान्यांमधून प्रदूषण करून मानवी जीवितास धोका निर्माण करणाऱ्या बोईसर एमआयडीसीतील प्रदूषणकारी कारखान्यांना १६० कोटी ४ लाखांचा दंड हरित लवादाने ठोठावल्याने कंपनी मालकांची झोप उडाली आहे. यात खासदारांनी हस्तक्षेपाची तयारी दर्शवली असली तरी एके ठिकाणी रोजगार देणाऱ्या या कंपन्या दुसऱ्या ठिकाणी स्थानिकांच्या जीविताशी खेळत असल्याचे वास्तव खासदारांनी कारखानदारांना प्रथम दाखवून द्यावे. त्यांनी फायद्याबरोबरच स्थानिकांच्या आरोग्याला प्राधान्य द्यावे, असे कारखानदारांच्या प्रतिनिधींना बजावावे, अशी माफक अपेक्षा स्थानिकांमधून व्यक्त केली जात आहे.

रोजगार निर्मिती व्हावी या उदात्त हेतूने इथल्या स्थानिकांनी आपल्या जमिनी एमआयडीसीला दिल्यानंतर त्यावर सुमारे दीड हजार छोट्या-मोठ्या कंपन्यांची निर्मिती होऊन परिसरातील स्थानिकांना नोकऱ्यांद्वारे रोजगार निर्मिती झाली. दुसरीकडे तारापूर एमआयडीसीची देशातील सर्वात जास्त प्रदूषण करणारी अशी ओळख आहे.

काही कारखानदार आपल्या कारखान्यातील प्रदूषित रसायने सीईटीपीमध्ये नेणे अपेक्षित असताना काही लाख रुपये वाचविण्यासाठी चोरट्या मार्गाने हे प्रदूषित पाणी नाल्यावाटे परिसरातील शेती, बागायती, नदी, नाले, समुद्रात सोडले जाऊ लागले. यावरच काही कारखानदार थांबले नाहीत, तर कारखानदारांनी काही टँकर आणि भंगारमाफियांच्या संगनमताने हे रसायन धरण क्षेत्रात सोडून पिण्याच्या पाण्याद्वारे लोकांच्या जीविताशी खेळ सुरू केल्याचे वास्तवही सर्वांसमोर आले. खासदारांनी मुख्यंमंत्री, पर्यावरणमंत्र्यांची भेट घेत लवादाने ठोठावलेल्या दंडाची रक्कम भरण्यासाठी हप्ते पाडून देण्याबाबत चर्चा करण्याचे आश्वासन दिल्याचे ‘लोकमत’ला सांगितले.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार