शहरं
Join us  
Trending Stories
1
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
2
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
3
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
4
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
5
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
6
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
7
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
8
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
9
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
10
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
11
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
12
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
13
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
14
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
15
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
16
बाबो! क्रिती सनॉनने मुंबईत खरेदी केलं पेंटहाऊस, किंमत ऐकून पायाखालची जमीनच सरकेल
17
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
18
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
19
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
20
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य

बोर्डीत मक्षिकापालनातून मधूक्रांतीकडे वाटचाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2019 22:44 IST

कोसबाड कृषी विज्ञान केंद्राचा स्तुत्य उपक्रम; प्रशिक्षणार्थीस स्वयं रोजगाराची संधी

- अनिरुद्ध पाटीलबोर्डी : नव्याने मधमाशापालन व्यवसाय सुरू करू इच्छिणारे व आधीपासून या व्यवसायात असणाऱ्यांकरिता कृषी विज्ञान केंद्र, कोसबाड येथे मधमाशापालन कार्यशाळा आयोजित करण्यात येते. या व्यवसायातून रोजगार निर्मितीसह शेती उत्पादनात वाढ आणि नागरिकांना दर्जेदार मध उपलब्ध होऊ शकते. शिवाय पंतप्रधानांच्या स्वप्नातील मधूक्रांती कार्यक्रमाला त्यामुळे बळकटी मिळणार आहे.या प्रशिक्षणातून मधमाशीपालन हा शेतीला पूरक व जोडव्यवसाय असून शुद्ध नैसर्गिक मधाचे उत्पादन घेता येते. मधमाशांद्वारे परागीभवन घडवून अन्नधान्याच्या व फळबागामध्ये उत्पादनात लक्षणीय वाढ कशी करावी याबाबत माहिती देण्यात येते. त्यानंतर सातेरी, मेलिफेरा आणि डंखरहित जातीच्या पाळीव मधमाशांची योग्य प्रकारे हाताळणी प्रात्यक्षिकासह दाखविण्यात येते. निसर्गात आढळणाºया मधमाश्या पेटीत भरण्याची कला व जंगली मधमाशांपासून मधाचे उत्पादन कसे घ्यावे हे प्रशिक्षणार्थ्यांना शिकविण्यात येते. शिवाय मधमाशांचे शत्रू, रोग व त्यापासून संरक्षण यासह शासकीय योजनाविषयी मार्गदर्शन केले जाते. याशिवाय प्रगतीशील शेतकऱ्यांशी थेट संवाद साधून शंका निरसन व समाधान होते. याबरोबरीने फार्म व्हिझीट व प्रात्यक्षिकानंतरप्रत्येक प्रशिक्षणार्थ्यास मधमाशी हाताळण्याची संधी दिली जाते. दरम्यान याकरिता प्रशिक्षण शुल्क ५०० रुपये आकारण्यात येते. त्यानंतर चहा, न्याहारी, जेवण आणि प्रशिक्षण साहित्य व प्रमाणपत्र देण्यात येते. या पूर्वी हे प्रशिक्षण घेतले असेल आणि पुन्हा प्रशिक्षण घ्यायचे असेल त्यांना २०० रुपये फी आकारण्यात येते.खादी ग्रामोद्योग मंडळाचा पुढाकारया मंडळामार्फत मानव विकास मिशन कार्यक्र मांतर्गत तालुक्यातील झारली या आदिवासी पाड्यातील दहा युवकांना प्रत्येकी पाच मधपेट्या मधयंत्र व संरक्षण जाळी इत्यादी साहित्याचे विनामूल्य वाटप केले. तसेच शेती उत्पादन वाढीसाठी ४० ते ६० टक्के परागीभवनाकरिता मधमाशांचे संवर्धन महत्त्वाचे आहे. यादृष्टीने खादी ग्रामोद्योग मंडळ ठाणे यांचेमार्फत जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी पी.पी.सावंत आणि कोसबाड कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ उत्तम सहाणे तसेच खादी ग्रामोद्योग आचे पर्यवेक्षक संजय पाटील यांच्या हस्ते हे वाटप करण्यात आले.आज शेती क्षेत्र कमी होत असून उत्पादन वाढविण्याकरिता चांगले परागीभवन होणे आवश्यक आहे. त्यामुळे मधमाशा वाचल्या पाहिजेत. पिकाच्या उत्पादनात ३० ते ४० टक्के वाढ मधमाशांमुळे सहज शक्य असल्याने त्यांच्या पालन-पोषण, संवर्धन व संरक्षणास अनन्य साधारण महत्व आहे. कृषि विज्ञान केंद्र व खादी ग्रामोद्योग प्रशिक्षणाचे आयोजन करते. कोसबाडला प्रत्येक महिन्याच्या दुसºया गुरूवारी असे प्रशिक्षण आयोजिले जाते.- प्रा. उत्तम सहाणे, किटकशास्त्रज्ञ, कोसबाड कृषी विज्ञान केंद्र