शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगे राहुल गांधींना म्हणाले 'दिल्लीचा लाल्या', काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया, पाटलांना दिलं असं नाव  
2
VIDEO: पंतप्रधान मोदी नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनावेळी मराठीत काय बोलले? ऐका...
3
थायलंडमध्ये मसाज घेण्यासाठी जाणं होणार महाग, जाणून घ्यावा हा नियम, अन्यथा ऐनवेळी बसेल भुर्दंड   
4
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
5
रोहित शर्मा पुन्हा बनला कर्णधार, मिळाला नवा 'ओपनिंग पार्टनर'; Playing XI मध्ये आणखी कोण?
6
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
7
AUS W vs PAK W : वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलिया टॉपला; पराभवाच्या हॅटट्रिकसह पाकिस्तान रसातळाला!
8
VIDEO: शत्रूवरही अशी वेळ नको रे देवा... नवरदेवाची भर लग्नमंडपात होणाऱ्या बायकोसमोर 'फजिती'
9
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
10
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
11
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
12
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
13
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
14
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
15
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
16
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
17
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
18
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
19
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
20
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री

पालघरमध्ये ईव्हीएम विरोधात आंदोलन

By admin | Updated: March 31, 2017 05:25 IST

अनेक राज्यात झालेल्या निवडणुकांमध्ये वापरण्यात आलेल्या ईव्हिएम मशीनमध्ये गोलमाल झाल्याच्या आरोपाच्या पार्श्वभूमीवर मतपत्रिकेद्वारे

पालघर : अनेक राज्यात झालेल्या निवडणुकांमध्ये वापरण्यात आलेल्या ईव्हिएम मशीनमध्ये गोलमाल झाल्याच्या आरोपाच्या पार्श्वभूमीवर मतपत्रिकेद्वारे निवडणुका घेण्यात याव्यात या मागणीसाठी आज भारत मुक्ती मोर्चाद्वारे पालघर तहसीलदार कार्यालया समोर ‘राष्ट्रव्यापी लोकतंत्र बचाव’ धरणे धरण्यात आले.ईव्हीएम मशीनला आंतरराष्ट्रीय मान्यता नसून आताच झालेल्या अनेक राज्यातील निवडणुकांमध्ये वापरण्यात आलेल्या ईव्हीएम मशीनमध्ये गडबड करण्यात आल्याच्या तक्र ारी होत आहेत. त्याबाबत न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आल्या आहेत. ह्या मशिन्समध्ये सेटींग करण्यात आल्याने मतदारांची वास्तव मते नोंदविण्यात आलेली नाहीत. मतदारांनी नोंदवलेली मते पुन्हा तपासण्याची सोय ह्या मशीन मध्ये नसते.मात्र बॅलेट पेपर मध्ये अशी व्यवस्था असल्याने पारदर्शकता राहते. सुप्रीम कोर्टाने ८ आॅक्टोबर २०१३ मध्ये निवडणूक आयोगाला पेपर ट्रेल लावण्याचे आदेश दिले होते. मात्र तीन वर्षांचा कालावधी उलटूनही निवडणूक आयोगाने त्या आदेशाची अमलबजावणी न करता त्या वादग्रस्त ईव्हीएम मशीनचा वापर सुरू ठेवल्यामुळे निवडणूक आयोगा विरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे. आज अनेक देशात ईव्हीएम मशीनचा वापर केला जात नाही. मात्र आपल्या देशातच ईव्हीएम मशीनचा आग्रह केला जात असल्याने मतदार आपल्या मतदानाने आश्वस्त असल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे देशात मुक्त, निष्पक्ष, आणि पारदर्शी निवडणुका करायच्या असल्यास बॅलेट पेपर च्या आधारेच निवडणूक होणे गरजेचे असल्याच्या मागणीसाठी भारत मुक्ती मोर्चाच्या वतीने आज पालघर मध्ये आंदोलन करण्यात आले. त्यात ईव्हीएम हटाओ, बॅलेट पेपर लाओ, लोकतंत्र बचाओ आदी घोषणा देण्यात आल्यात. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. (वार्ताहर)