शहरं
Join us  
Trending Stories
1
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
2
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
3
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
4
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
5
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
6
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
7
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
8
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
9
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
10
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
11
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
12
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
13
इंडिया आघाडीला मोठा धक्का, बड्या पक्षाने सोडली साथ, विरोधी पक्षांचं ऐक्य कमकुवत होणार?  
14
इशान किशनला टीम इंडियापाठोपाठ आणखी एका संघातूनही डच्चू मिळण्याची शक्यता
15
बाजार गडगडला! एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे २.५७ लाख कोटी बुडाले, फक्त 'हे' ५ शेअर्स वाढले
16
चीनकडून कोण चोरतंय रेअर अर्थ मेटल? का उडालीये ड्रॅगनची झोप, काय आहे प्रकरण?
17
आरोग्याशी नको खेळ! मीठापासून साखरेपर्यंत... 'या' पांढऱ्या गोष्टी तुमच्यासाठी ठरू शकतात विष
18
"पटोलेंनी उल्लेख केलेली व्यक्ती काँग्रेसचीच"; हनी ट्रॅपची कुठलीही तक्रार नसल्याचे CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
19
"ये लातों के भूत हैं, बातों से मानेंगे नहीं...!"; मोहरम आणि श्रावणाचा उल्लेख करत मुख्यमंत्री योगींचं मोठं विधान
20
"विधानसभेतील राडा हा जाणीवपूर्वक दहशत निर्माण करण्याचा प्रकार’’, बाळासाहेब थोरात यांची टीका 

पालघरमध्ये ईव्हीएम विरोधात आंदोलन

By admin | Updated: March 31, 2017 05:25 IST

अनेक राज्यात झालेल्या निवडणुकांमध्ये वापरण्यात आलेल्या ईव्हिएम मशीनमध्ये गोलमाल झाल्याच्या आरोपाच्या पार्श्वभूमीवर मतपत्रिकेद्वारे

पालघर : अनेक राज्यात झालेल्या निवडणुकांमध्ये वापरण्यात आलेल्या ईव्हिएम मशीनमध्ये गोलमाल झाल्याच्या आरोपाच्या पार्श्वभूमीवर मतपत्रिकेद्वारे निवडणुका घेण्यात याव्यात या मागणीसाठी आज भारत मुक्ती मोर्चाद्वारे पालघर तहसीलदार कार्यालया समोर ‘राष्ट्रव्यापी लोकतंत्र बचाव’ धरणे धरण्यात आले.ईव्हीएम मशीनला आंतरराष्ट्रीय मान्यता नसून आताच झालेल्या अनेक राज्यातील निवडणुकांमध्ये वापरण्यात आलेल्या ईव्हीएम मशीनमध्ये गडबड करण्यात आल्याच्या तक्र ारी होत आहेत. त्याबाबत न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आल्या आहेत. ह्या मशिन्समध्ये सेटींग करण्यात आल्याने मतदारांची वास्तव मते नोंदविण्यात आलेली नाहीत. मतदारांनी नोंदवलेली मते पुन्हा तपासण्याची सोय ह्या मशीन मध्ये नसते.मात्र बॅलेट पेपर मध्ये अशी व्यवस्था असल्याने पारदर्शकता राहते. सुप्रीम कोर्टाने ८ आॅक्टोबर २०१३ मध्ये निवडणूक आयोगाला पेपर ट्रेल लावण्याचे आदेश दिले होते. मात्र तीन वर्षांचा कालावधी उलटूनही निवडणूक आयोगाने त्या आदेशाची अमलबजावणी न करता त्या वादग्रस्त ईव्हीएम मशीनचा वापर सुरू ठेवल्यामुळे निवडणूक आयोगा विरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे. आज अनेक देशात ईव्हीएम मशीनचा वापर केला जात नाही. मात्र आपल्या देशातच ईव्हीएम मशीनचा आग्रह केला जात असल्याने मतदार आपल्या मतदानाने आश्वस्त असल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे देशात मुक्त, निष्पक्ष, आणि पारदर्शी निवडणुका करायच्या असल्यास बॅलेट पेपर च्या आधारेच निवडणूक होणे गरजेचे असल्याच्या मागणीसाठी भारत मुक्ती मोर्चाच्या वतीने आज पालघर मध्ये आंदोलन करण्यात आले. त्यात ईव्हीएम हटाओ, बॅलेट पेपर लाओ, लोकतंत्र बचाओ आदी घोषणा देण्यात आल्यात. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. (वार्ताहर)