शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
2
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
3
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
4
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
5
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
6
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
7
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
8
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
9
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
10
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
11
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
12
मुत्सद्देगिरी हेच औषध! ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'ने भारतीय फार्मा कंपन्यांचे काय होणार?
13
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
14
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
15
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
16
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
17
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
18
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
19
कोस्टल रोडवर पुन्हा अपघात; कारच्या धडकेत दोघे जखमी
20
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं

वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाकाळात वाढली डासांची पैदास! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2021 02:20 IST

प्रशासनाचे डास निर्मूलनाकडे दुर्लक्ष : नागरिकांमध्ये मोठी नाराजी 

विरार : कोरोनाचे रुग्ण पुन्हा मोठ्या संख्येने वाढत असताना वसई-विरार महापालिकेची आरोग्य यंत्रणा कोरोना प्रादुर्भाव वाढू नये, यासाठीच्या कामात व्यस्त आहे. दुसरीकडे मात्र  महापालिका क्षेत्रामध्ये सध्या मोठ्या प्रमाणात डासांची पैदास झाली असून महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून डास निर्मूलनाकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी शासनाने दिलेल्या नियमांचे, अटींचे पालन करून जनजागृतीबरोबर नागरिकांना सोयी-सुविधा देण्यात आरोग्य प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे. मात्र सध्या मच्छरांचे साम्राज्यही महापालिका परिसरात ठिकठिकाणी वाढू लागल्याने नव्या रोगांना आमंत्रण दिल्यासारखे होत आहे. ताप, डेंग्यू, मलेरिया अशा प्रकारच्या रोगांची लागण होणार असल्याची भीती व्यक्त होत आहे. 

महापालिका आरोग्यासाठी लाखो रुपयांचा खर्च करीत असताना तो खर्च जातो कुठे, असा प्रश्न जनतेने उपस्थित केला आहे. कोरोनामुळे अनेक जणांचा रोजगार गेला आहे. नोकऱ्या सुटल्या आहेत. त्यामुळे जनता हतबल झाली आहे. एकीकडे कोरोनाची भीती तर दुसरीकडे मच्छरांचा वाढता प्रादुर्भाव यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. वसई-विरारमध्ये मलेरिया, डेंग्यूसारख्या भयानक आजाराने डोके वर काढायला सुरुवात केली, तर महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना याचा मनस्ताप होऊ शकतो. महापालिकेने औषध फवारणी करून मच्छरांचा नायनाट केला पाहिजे, असे नागरिकांनी सांगितले.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारdengueडेंग्यू