शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

दीड लाखाहून अधिक नायगावकर तहानले

By admin | Updated: April 18, 2017 06:44 IST

नायगाव पूर्वेला असलेल्या सुमारे दीड लाखांहून अधिक लोकवस्तीला अद्याप पाणी पुरवठ्याची कोणतीच व्यवस्था नसल्याने गेल्या दहा वर्षांहून अधिक

शशी करपे , वसईनायगाव पूर्वेला असलेल्या सुमारे दीड लाखांहून अधिक लोकवस्तीला अद्याप पाणी पुरवठ्याची कोणतीच व्यवस्था नसल्याने गेल्या दहा वर्षांहून अधिक लोकांना दररोज टँकरच्या पाण्यावर दिवस काढावे लागत आहे. याठिकाणी दररोज किमान तीनशेहून अधिक टँकर पाणी पुरवठा होतो. तर पिण्यासाठी बाटली बंद पाणी घ्यावे लागत आहे. त्यापोटी येथील लोक दरदिवसी साडेतीन लाखांहून अधिक रुपये खर्च करीत आहे. पण, आता पाण्याची वाट पाहून थकलेल्या मी नायगावकरांनी पाणी आमच्या हक्काचे असा नारा लगावत बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे. गेल्या दहा वर्षात नायगाव पूर्वेकडे मोठ्या प्रमाणावर नागरीकरण झाले आणि लोकसंख्येने दीड लाखांचा आकडाही पार केला. मुंबई आणि वसई विरार परिसरातील बिल्डरांनी २४ तास पाण्याच्या जाहिराती करीत चढ्या भावाने घरे विकली. आताही २४ तास पिण्याचे पाणी अशी जाहिरात बाजी करीत चक्क १४-१४ मजली टॉवरची कामे वेगाने सुुरु आहेत. पण, पाण्याचे वास्तव मात्र भयावह आहे.नायगाव पूर्वेचा भाग खारटण असल्याने याठिकाणी भूगर्भात खारे पाणी आहे. त्यामुळे बोअरिंगचे पाणी वापरण्यालायक नाही. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून या परिसरातील लोक टँकरच्या पाण्यावरच अवलंबून आहेत. पिण्यासाठी बाटली बंद पाणी घ्यावे लागते. येथील लोकसंख्या पाहता या परिसरात दिवसाला तीनशेहून अधिक टँकर पाणी लागते. सध्या एका टँकरचा दर बाराशे रुपये असून नायगावकर पाण्यापोटी दिवसाला साडेतीन लाखांहून अधिक पैसे खर्च करीत आहेत, अशी माहिती उपोषणाचे नेतृत्व करणाऱ्या प्रवीण गवस यांनी दिली.याठिकाणी मोठी कॉम्पलेक्स समजल्या जाणाऱ्या रश्मी स्टार सिटीत दिवसाला वीस, रिलायबल मध्ये ८, गोकुळ मध्ये २०, मथुरामध्ये ७, वृदांवन टॉवरमध्ये ८, नालंदा टाऊनशिपमध्ये १८, वृदांवन-२मध्ये ८, अजंठामध्ये ६, सिटीझनमध्ये ६४, परेरानगरात २५, रश्मी पिंक सिटीमध्ये १६, ग्लोबल आरेनामध्ये ५ टँकरचा पाणी पुरवठा होतो. तर बाराशे खोल्या असलेल्या गणेश नगर चाळीत दिवसाला १५ टँकर पाणी लागते. ही फक्त कॉम्पलेक्ससाठी लागणाऱ्या टंँकरची आकडेवारी आहे. त्याचबरोबर आणखी किमान शंभर इमारती असून त्यांनाही दरदिवसी शंभर टँकर पाणी लागते. दुसरीकडे, टँकरचे पाणी पिण्यालायक नसल्याने लोकांना पिण्यासाठी महागडे बाटली बंद पाणी विकत घ्यावे लागत आहे, अशी माहिती आंदोलनकर्ते आमरेंद्र गोगटे यांनी दिली. नायगावचा समावेश ६९ गाव पाणी पुरवठा योजनेत करण्यात आला आहे. या योजनेचा शुभारंभ २००७ साली अजीत पवार यांच्या हस्ते झाला होता. त्यावेळी पवार यांनी दीड वर्षांत ६९ गावांना पाणी पुरवठा सुरु होईल, असे आश्वासन दिले होते. त्यानंतर ४५ लाख रुपये खर्चून याठिकाणी पाच वर्षांपूर्वी पाण्याची टाकीही बांधण्यात आली होती. पण, नायगावकरांना अद्याप नळ अथवा इतर पद्धतीने पाणी पुरवठा सुरु करण्यात आलेला नाही. पाणी नसताना महापालिका चौदा-चौदा मजली टॉवरना परवानगी देऊन अजूनही लोकांची फसवणुक करीत असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेश सचिव विजय पाटील यांनी केला आहे. वाढीव १०० एमएलडी पाणी पुरवठा योजनेतून पाणी देऊ असे आश्वासन आता दिले गेले आहे. मात्र, १०० एमएलडी पाणी महापालिकेला पुरणार नसल्याने ६९ गावांना पाण्यावाचून पुन्हा वंचित ठेवले जाणार आहे, असाही पाटील यांनी आरोप केला आहे.