शहरं
Join us  
Trending Stories
1
Womens World Cup 2025 : W W W W..! श्रीलंकेच्या अटापट्टूनं शेवटच्या षटकात फिरवली मॅच! बांगलादेश स्पर्धेतून 'आउट'
2
उमेदवारी अर्ज दाखल करताच त्याच क्षणी २१ वर्ष जुन्या प्रकरणात RJD उमेदवाराला झाली अटक, कारण...
3
Asrani Death: 'अंग्रेजों के जमाने का जेलर' काळाच्या पडद्याआड; ज्येष्ठ अभिनेते असरानी यांचे निधन
4
अभिनेते असरानींची शेवटची पोस्ट, ७ दिवसांपूर्वी या अभिनेत्यासाठी इंस्टाग्रामवर लिहिले होते - "मिस यू..."
5
"आमदाराला कापा बोललो तर राग येतो, रोज शेतकरी मरतोय त्याचा राग का येत नाही?"; बच्चू कडू आक्रमक
6
चीनवर लावलेले १०० टक्के टॅरिफ अमेरिका कमी करणार?; ट्रम्प यांनी शी जिनपिंग यांच्यासमोर ठेवली अट
7
असरानी यांंचं महाराष्ट्राशी होतं विशेष नातं, वेळ मिळेल तेव्हा पुण्यात जाऊन करायचे 'ही' खास गोष्ट
8
'शोले'तील जेलरची भूमिका साकारण्यासाठी असरानींना हिटलरकडून कशी मिळालेली प्रेरणा? वाचा हा किस्सा
9
जवळच्या लोकांच्या उपस्थितीत असरानी यांच्यावर अंत्यसंस्कार, कुटुंबाने पूर्ण केली अभिनेत्याची 'ही' इच्छा
10
भारताचा 'छोटा पॅकेट' पुन्हा करणार 'बडा धमाका'! वैभव सूर्यवंशी आता 'या' स्पर्धेत खेळणार...
11
पुतिन-ट्रम्प यांच्या मोठी बैठक होणार; युक्रेनचे झेलेन्स्की म्हणतात- "मीही यायला तयार पण..."
12
ODI Cricket Record: चामारी अटापट्टूचा मोठा विक्रम; देशासाठी 'अशी' कामगिरी करणारी पहिलीच!
13
बिहारमध्ये महाआघाडीला आणखी एक धक्का, मित्रपक्षाची निवडणुकीतून माघार, आरजेडी- काँग्रेसवर केले गंभीर आरोप 
14
उपोषणकर्त्याला घरी का बोलवलं? संजय शिरसाट म्हणाले, "माझा आणि त्याचा प्रवासाचा वेळ सारखा होता"
15
"विरोधकांच्या ‘लवंग्या-सुरसुरी’चा धुरळा, महायुतीचा ‘ॲटम बॉम्ब’ फुटला की..."; एकनाथ शिंदेंचा इशारा
16
LPG घेऊन जाणाऱ्या जहाजावर भीषण स्फोट; 23 भारतीयांना वाचवले, 2 बेपत्ता
17
Kawasaki: कावासाकीनं लॉन्च केली खतरनाक बाइक; किंमत महिंद्रा थारपेक्षाही जास्त!
18
21 वर्षे जुन्या दरोडा प्रकरणात RJD उमेदवाराला अटक; अर्ज दाखल करताच पोलिसांनी घेतले ताब्यात
19
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांच्या कार्यक्रमात १० जण पडले आजारी, समोर आलं असं कारण
20
पुतण्याच्या प्रेमात आंधळी झाली दोन मुलांची आई; पोलीस ठाण्यातच कापली हाताची नस!

पाच धरणे असलेल्या मोखाडा तालुक्यात फेब्रुवारीतच जाणवतेय भीषण पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 00:02 IST

मोखाडा तालुक्यात मोठमोठी पाच धरणे असताना दरवर्षीच आदिवासींच्या पाचवीला पुजलेली पाणीटंचाई अद्यापही दूर झालेली नाही.

रवींद्र साळवेमोखाडा : पालघर जिल्ह्यातील अतिदुर्गम डोंगराळ मोखाडा तालुक्यात फेब्रुवारी महिन्यातच पाणीटंचाईला सुरुवात झाली असून दापटी १/२ येथून १५ दिवसांपूर्वी टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी करण्यात आली आहे. परंतु अद्यापपर्यत टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आलेला नाही. तालुक्यात मुबलक पाणीसाठा असूनही नियोजनाअभावी ‘धरण उशाला अन् कोरड घशाला’ अशी अवस्था झाली आहे. 

मोखाडा तालुक्यात मोठमोठी पाच धरणे असताना दरवर्षीच आदिवासींच्या पाचवीला पुजलेली पाणीटंचाई अद्यापही दूर झालेली नाही. तालुक्याची लोकसंख्या लाखांवर पोहोचली असून तालुक्यात खोच, पळसपाडा, मारुतीची वाडी, कारेगाव, मोरहंडा अशी पाच मोठी धरणे आहेत. परंतु प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांचा नाकर्तेपणा कायम आहे. 

या धरणांवर कोट्यवधींचा खर्च होऊनदेखील याचा काहीच फायदा येथील आदिवासी बांधवांना झालेला नाही. येथील परिस्थिती बघता दरवर्षीच फेब्रुवारीपासूनच पाणीटंचाईची समस्या तोंड वर काढून एप्रिल-मेमध्ये पाणीटंचाईचा प्रश्न अधिकच तीव्र होतो. येथील टंचाईग्रस्त आदिवासींना हातातली कामे सोडून घोटभर पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. 

टंचाईग्रस्त गावपाड्यांना पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीपासून टंचाईग्रस्त गावपाडे २० ते २५ किलोमीटर अंतरावर विखुरलेले असल्याने टँकरचालकांनाही चांगलीच कसरत करावी लागते. डोळ्यात तेल घालून चातक पक्ष्याप्रमाणे आदिवासींना टँकरची दिवसभर वाट बघावी लागते. 

दरवर्षी या ठिकाणी प्रचंड पाऊस होऊनदेखील शून्य नियोजनामुळे पाणीटंचाईचा प्रश्न उग्र होत आहे. कोचाळे येथील मध्य वैतरणा प्रकल्पातून १२० कि.मी. अंतरावर मुंबईला शासनाने पाणी पोहोचवले आहे, परंतु धरणालगतच्या ४ ते ५ कि.मी. अंतरावरच्या गावांना उन्हाळ्यात हंडाभर पाण्यासाठी वणवण करावी लागते. 

टॅग्स :Vasai Virarवसई विरार