शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

पाच धरणे असलेल्या मोखाडा तालुक्यात फेब्रुवारीतच जाणवतेय भीषण पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 00:02 IST

मोखाडा तालुक्यात मोठमोठी पाच धरणे असताना दरवर्षीच आदिवासींच्या पाचवीला पुजलेली पाणीटंचाई अद्यापही दूर झालेली नाही.

रवींद्र साळवेमोखाडा : पालघर जिल्ह्यातील अतिदुर्गम डोंगराळ मोखाडा तालुक्यात फेब्रुवारी महिन्यातच पाणीटंचाईला सुरुवात झाली असून दापटी १/२ येथून १५ दिवसांपूर्वी टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी करण्यात आली आहे. परंतु अद्यापपर्यत टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आलेला नाही. तालुक्यात मुबलक पाणीसाठा असूनही नियोजनाअभावी ‘धरण उशाला अन् कोरड घशाला’ अशी अवस्था झाली आहे. 

मोखाडा तालुक्यात मोठमोठी पाच धरणे असताना दरवर्षीच आदिवासींच्या पाचवीला पुजलेली पाणीटंचाई अद्यापही दूर झालेली नाही. तालुक्याची लोकसंख्या लाखांवर पोहोचली असून तालुक्यात खोच, पळसपाडा, मारुतीची वाडी, कारेगाव, मोरहंडा अशी पाच मोठी धरणे आहेत. परंतु प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांचा नाकर्तेपणा कायम आहे. 

या धरणांवर कोट्यवधींचा खर्च होऊनदेखील याचा काहीच फायदा येथील आदिवासी बांधवांना झालेला नाही. येथील परिस्थिती बघता दरवर्षीच फेब्रुवारीपासूनच पाणीटंचाईची समस्या तोंड वर काढून एप्रिल-मेमध्ये पाणीटंचाईचा प्रश्न अधिकच तीव्र होतो. येथील टंचाईग्रस्त आदिवासींना हातातली कामे सोडून घोटभर पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. 

टंचाईग्रस्त गावपाड्यांना पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीपासून टंचाईग्रस्त गावपाडे २० ते २५ किलोमीटर अंतरावर विखुरलेले असल्याने टँकरचालकांनाही चांगलीच कसरत करावी लागते. डोळ्यात तेल घालून चातक पक्ष्याप्रमाणे आदिवासींना टँकरची दिवसभर वाट बघावी लागते. 

दरवर्षी या ठिकाणी प्रचंड पाऊस होऊनदेखील शून्य नियोजनामुळे पाणीटंचाईचा प्रश्न उग्र होत आहे. कोचाळे येथील मध्य वैतरणा प्रकल्पातून १२० कि.मी. अंतरावर मुंबईला शासनाने पाणी पोहोचवले आहे, परंतु धरणालगतच्या ४ ते ५ कि.मी. अंतरावरच्या गावांना उन्हाळ्यात हंडाभर पाण्यासाठी वणवण करावी लागते. 

टॅग्स :Vasai Virarवसई विरार